शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चांगल्या पावसाने जतमधील शेतकऱ्यांच्या आपेक्षा उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

मार्च २०१९ पासून कोरोनाच्या संक्रमणामुळे अवघे जग वेठीस धरले गेले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागही कोरोनाच्या आजारामुळे मेटाकुटीस आला ...

मार्च २०१९ पासून कोरोनाच्या संक्रमणामुळे अवघे जग वेठीस धरले गेले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागही कोरोनाच्या आजारामुळे मेटाकुटीस आला आहे. कोरोनाच्या संकटातच मागील वर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केली. यंदाच्या मृग नक्षत्रापासून पावसाला सुरुवात झाली. यानंतर झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार पर्जन्यमान समाधान कारक राहणार असल्याने मेटाकुटीला आलेला बळीराजासुद्धा या वर्षात पीक चांगले येणार या आशेवर उसनवारी करून बियाणे खरेदी केले आहे. जत तालुक्यातील शिवारात यंदा गतवर्षीपेक्षा लवकर पेरणी झाली आहे. मृग नक्षत्रामध्ये पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शेतकरी सुखावले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस होत असल्याचे सध्या दिसून येत आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अशा स्थितीत आता शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामाची पेरणी केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या खरीप हंगामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा लागली आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पाऊस सांगितल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

चाैकट

गतवर्षी अतिवृष्टीचा फटका

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने गेल्या वर्षी पेरण्या केल्या खऱ्या. मात्र, बोगस बियाणांमुळे बहुतांश शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यानंतर वेळोवेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सरत्या शेवटी हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला. प्रशासनाने पंचनामे करून मदत जाहीर केली. मात्र, शेतकऱ्यांना कमी मदत मिळाली.