शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

वाळवा-शिराळ्यात अच्छे आणि बुरे दिन

By admin | Updated: June 28, 2016 23:16 IST

मंत्रिपदाचे मृगजळ : शिवाजीराव नाईक, सदाभाऊंना भाजपकडून केवळ आश्वासन

अशोक पाटील--इस्लामपूर -काँग्रेस, पुलोद, युती आणि आघाडीच्या मंत्रिमंडळात वाळवा, शिराळा तालुक्याला अव्वल दर्जाचे स्थान होते. आता शिराळा मतदार संघातील शिवाजीराव नाईक आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना आमदारकी मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आले आहेत. परंतु दोन वर्षे झाली तरी, नाईक आणि खोत यांना केवळ मंत्रिपदाच्या आश्वासनाचे गाजरच दाखवले जात आहे. त्यामुळे या दोघांना ‘बुरे दिन’चाही सामना करावा लागत आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे शिराळ्यात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना ‘बुरे दिन’ आल्याचे समाधान शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांत आहे. याउलट गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात ‘अच्छे दिन’ असल्याचे वातावरण आहे. कामेरी येथील जाहीर प्रचार सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असे सांगितले होते. या आश्वासनाला दोन वर्षाहून अधिकचा काळ लोटला तरी, अद्याप त्यांच्या पदरी निराशाच आहे.लोकसभा निवडणुकीपासून स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी रकमेचे गाजर दाखवून लोकप्रियता वाढवून घेतली आहे. त्यातच त्यांनी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून चांगली झुंज दिली. त्यामुळे त्यांना भाजपने मागच्या दाराने का होईना, आमदारकी दिली. वाळवा व शिराळा तालुक्याला आमदारकी मिळाल्याने स्वाभिमानीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यांच्याच कार्यक्षेत्रात येणाऱ्या कारखानदारांनी एफआरपीच्या रकमाही दिलेल्या नाहीत. मात्र खोत यांना मंत्रिपदाची आशा असल्याने ते ऊस दराचे आंदोलन बासनात गुंडाळून भाजपच्या दारात ठाण मांडून बसले आहेत. यामुळे दोन्ही आमदार गटात ‘कभी खुशी, कभी गम’ अशी अवस्था आहे.सदाभाऊ : जरा इकडे लक्ष द्यासांगली येथील वसंतदादा साखर कारखान्याने फेबु्रवारी महिन्यात गळितासाठी नेलेल्या उसाला एफआरपी दर सोडाच, अद्याप एक रुपयाही अदा केलेला नाही. सांगली व सातारा जिल्ह्यातील बिगर सभासद शेतकऱ्यांची ही अवस्था असून, त्यांना वाली कोण?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार सदाभाऊ खोत यांना खरोखरच शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशाबाबत आंदोलन छेडावे, अशी मागणी होत आहे.