शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

खैरावच्या भारत निर्माण योजनेत गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST

जत : जत तालुक्यातील खैराव येथील भारत निर्माण योजना पूर्ण झालेली नसताना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवून बिले उचलली आहेत. ...

जत : जत तालुक्यातील खैराव येथील भारत निर्माण योजना पूर्ण झालेली नसताना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवून बिले उचलली आहेत. याप्रकरणी ठेकेदार, सरपंच, ग्रामसेवकांची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा १२ जुलैला जत पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा खैराव येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चौगुले व ग्रामस्थांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.

खैरावला भारत निर्माण योजना २०१२-१३ मध्ये मंजूर झाली होती. संबंधित ठेकेदाराने कामे न करता ६७ लाखांची बिले उचलली आहेत. कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या योजनेतून ज्या भागात पाणी जायला हवे होते तेथे पाणी गेलेलेच नाही ही वस्तुस्थिती आहे. पाण्याची जी टाकी बांधण्यात आलेली आहे, ती निकृष्ट बांधलेली आहे. पाईपलाईन तीन फूट खाली न घालता वरच ठेवली आहे. भविष्यात ही पाईपलाईन फुटू शकते.

या सर्व कामांची पाहणी करून ठेकेदार, खैरावचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चौगुले व ग्रामस्थांनी केली आहे.