शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोला यंदा सोन्याचा भाव

By admin | Updated: June 16, 2016 01:08 IST

किलोला शंभर रुपये : ‘लाल चिखल’ नव्हे, ‘लाल सोने’!

सांगली : तीव्र पाणीटंचाई व बेभरवशाच्या बाजारपेठेमुळे शेतकरी घायकुतीला आला असतानाच, दरवर्षी मातीमोल दराने विकण्याची वेळ येणाऱ्या टोमॅटोला यंदा मात्र सोन्याचा भाव आला आहे. उत्पादनात झालेली घट व मागणी वाढल्याने सध्या शहरातील बाजारात टोमॅटोला किलोला ८० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अजून महिनाभर असाच चढा दर कायम राहील, असा विश्वास मिरज पूर्व भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनात आघाडी घेत असलेल्या मिरज पूर्व भागात यंदा ‘लॉटरी’ म्हणून घेतलेले टोमॅटोचे पीक चांगलेच साधले आहे. चाबुकस्वारवाडी, सलगरे, बेळंकी, लिंगनूर, खटाव आदी गावांमध्ये भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र असून बहुतांश शेतकरी बाजाराच्या मागणीनुसार भाजीपाला उत्पादन घेतात. सध्या या भागात मिरज, सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, कऱ्हाड, पनवेलसह इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा टोमॅटो खरेदीसाठी राबता आहे. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक धोकादायक पीक म्हणून टोमॅटो ओळखला जातो. दर मिळाला तर ठिक, नाही तर तो फेकून देण्याची वेळ येत असल्याने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळत नाहीत. मात्र, पूर्व भागातील खटाव, लिंगनूर भागात यंदा टोमॅटोचे घेण्यात आलेले उत्पादन फलदायी ठरले आहे. टोमॅटोचे पीकही नाजूक असल्याने थोड्याशा वाऱ्यामुळे प्लॉट जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)टोमॅटोला यंदा सोन्याचा भावकिलोला शंभर रुपये : ‘लाल चिखल’ नव्हे, ‘लाल सोने’!सांगली : तीव्र पाणीटंचाई व बेभरवशाच्या बाजारपेठेमुळे शेतकरी घायकुतीला आला असतानाच, दरवर्षी मातीमोल दराने विकण्याची वेळ येणाऱ्या टोमॅटोला यंदा मात्र सोन्याचा भाव आला आहे. उत्पादनात झालेली घट व मागणी वाढल्याने सध्या शहरातील बाजारात टोमॅटोला किलोला ८० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अजून महिनाभर असाच चढा दर कायम राहील, असा विश्वास मिरज पूर्व भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनात आघाडी घेत असलेल्या मिरज पूर्व भागात यंदा ‘लॉटरी’ म्हणून घेतलेले टोमॅटोचे पीक चांगलेच साधले आहे. चाबुकस्वारवाडी, सलगरे, बेळंकी, लिंगनूर, खटाव आदी गावांमध्ये भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र असून बहुतांश शेतकरी बाजाराच्या मागणीनुसार भाजीपाला उत्पादन घेतात. सध्या या भागात मिरज, सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, कऱ्हाड, पनवेलसह इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा टोमॅटो खरेदीसाठी राबता आहे. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक धोकादायक पीक म्हणून टोमॅटो ओळखला जातो. दर मिळाला तर ठिक, नाही तर तो फेकून देण्याची वेळ येत असल्याने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळत नाहीत. मात्र, पूर्व भागातील खटाव, लिंगनूर भागात यंदा टोमॅटोचे घेण्यात आलेले उत्पादन फलदायी ठरले आहे. टोमॅटोचे पीकही नाजूक असल्याने थोड्याशा वाऱ्यामुळे प्लॉट जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांत खुशी, ग्राहकांत गमरोजच्या आहारात टोमॅटोला महत्त्व असल्याने ग्राहकांकडून नेहमीच खरेदीला प्राधान्य असते. मात्र, यंदा दर ऐंशी ते शंभरावर जाऊन पोहोचल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. याउलट शेतकऱ्यांनी यंदा चांगला दर मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.अडचणींवर मात करून थोडे धाडसानेच यंदा टोमॅटोचे उत्पादन घेतले असून चांगला दर मिळत असल्याने समाधानी आहे. सध्या दिवसआड तोड घेत असून मुंबई बाजारपेठेत माल पाठविला जात आहे. सध्या ६५ ते ७२ रुपयांपर्यंत दर मिळाला असला तरी, अजून दर मिळण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत टोमॅटोची आवक कमी असल्याने अजून जादा दर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. - सुखदेव कोरे, टोमॅटो उत्पादक, बिब्बी मळा, बेळंकी (ता. मिरज).