शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणातून आरक्षण संपविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:18 IST

सांगली : देशात सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट केंद्रातील भाजप सरकारने घातला आहे. त्यामुळे आरक्षणाचा हक्कच हिरावून ...

सांगली : देशात सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट केंद्रातील भाजप सरकारने घातला आहे. त्यामुळे आरक्षणाचा हक्कच हिरावून घेतला जाणार आहे. त्यासाठी विखुरलेल्या ओबीसी, भटके, मुस्लिम, दलित आदींनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन विरोध करूया, असे काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

ते म्हणाले की, गेल्या १५ ते २० वर्षात ओबीसी समाज, मुस्लिम, भटके, दलित समाज काँग्रेसपासून दुरावला आहे. देशात व राज्यात काँग्रेस पक्ष पिछाडीवर गेला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा निम्मा दौरा केला आहे. ओबीसींचे आरक्षण राजकीय क्षेत्रात कमी करण्यात आले असून, इतर विभागात ते कायम आहे. ओबीसींची सामाजिक अवस्था, शैक्षणिक अवस्था, किती आरक्षण आवश्‍यक आदींचा अभ्यास करून आरक्षण दिले जाणार आहे. राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन अनेक सवलती दिल्या आहेत. त्याचे स्वागत करतो. परंतु दुसरीकडे ओबीसींसाठीच्या महाज्योती योजनेसाठी बजेट तोकडे पडत आहे. त्यासाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्याची गरज आहे.

आरक्षणाची मागणी सर्वजण करत आहेत. परंतु मुळात आरक्षण आहे कोठे, हादेखील प्रश्‍न आहे. देशात सर्वत्र खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट मोदींनी घातला आहे. आरएसएसने मोदींच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. अशावेळी मूळ काँग्रेस पुन्हा उभी राहण्याची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी लोकसभेत निर्णय घेणे आवश्‍यक आहे. ५० टक्केच्यावर आरक्षण नेऊन ठेवले तर सर्वांनाच आरक्षण मिळेल. आंदोलन करण्याची गरजच भासणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी बाळासाहेब गुरव, अशोक रजपूत, तुकाराम माळी आदी उपस्थित होते.