शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

खासगीकरणातून आरक्षण संपविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:18 IST

सांगली : देशात सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट केंद्रातील भाजप सरकारने घातला आहे. त्यामुळे आरक्षणाचा हक्कच हिरावून ...

सांगली : देशात सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट केंद्रातील भाजप सरकारने घातला आहे. त्यामुळे आरक्षणाचा हक्कच हिरावून घेतला जाणार आहे. त्यासाठी विखुरलेल्या ओबीसी, भटके, मुस्लिम, दलित आदींनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन विरोध करूया, असे काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

ते म्हणाले की, गेल्या १५ ते २० वर्षात ओबीसी समाज, मुस्लिम, भटके, दलित समाज काँग्रेसपासून दुरावला आहे. देशात व राज्यात काँग्रेस पक्ष पिछाडीवर गेला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा निम्मा दौरा केला आहे. ओबीसींचे आरक्षण राजकीय क्षेत्रात कमी करण्यात आले असून, इतर विभागात ते कायम आहे. ओबीसींची सामाजिक अवस्था, शैक्षणिक अवस्था, किती आरक्षण आवश्‍यक आदींचा अभ्यास करून आरक्षण दिले जाणार आहे. राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन अनेक सवलती दिल्या आहेत. त्याचे स्वागत करतो. परंतु दुसरीकडे ओबीसींसाठीच्या महाज्योती योजनेसाठी बजेट तोकडे पडत आहे. त्यासाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्याची गरज आहे.

आरक्षणाची मागणी सर्वजण करत आहेत. परंतु मुळात आरक्षण आहे कोठे, हादेखील प्रश्‍न आहे. देशात सर्वत्र खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट मोदींनी घातला आहे. आरएसएसने मोदींच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. अशावेळी मूळ काँग्रेस पुन्हा उभी राहण्याची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी लोकसभेत निर्णय घेणे आवश्‍यक आहे. ५० टक्केच्यावर आरक्षण नेऊन ठेवले तर सर्वांनाच आरक्षण मिळेल. आंदोलन करण्याची गरजच भासणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी बाळासाहेब गुरव, अशोक रजपूत, तुकाराम माळी आदी उपस्थित होते.