शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कसबे डिग्रज सोसायटीत सत्तेला मिळाली कलाटणी

By admin | Updated: December 1, 2015 00:11 IST

‘जयंत’ पॅनेलची बाजी : ‘ग्रामविकास’च्या सातजणांचे राजीनामे

कसबे डिग्रज : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबे डिग्रज (ता. मिरज) विकास सोसायटीच्या निवडणुकीनंतर झालेल्या पदाधिकारी निवडीत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. निवडणुकीत ग्रामविकास आघाडीला १३ पैकी ७ जागा आणि जयंत पॅनेलला ६ जागा मिळाल्या होत्या. पण अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत जयंत पॅनेलच्या उमेदवारांना सात मते मिळाली. त्यामुळे सत्ता जयंत पॅनेलकडे गेली, पण हा धक्का सहन न झालेल्या ‘ग्रामविकास’च्या नेत्यांनी सर्वांना राजीनामे देण्यास सांगितले. त्यामुळे सातजणांनी सहकार उपनिबंधकांकडे राजीनामे दिले. त्यामुळे झालेली नूतन निवड किती काळ टिकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कसबे डिग्रज सोसायटी जिंकण्यासाठी थेट आ. जयंत पाटील यांनी लक्ष घालत राष्ट्रवादीतील गटबाजी मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते, पण यश आले नाही. कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आनंदराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे देशमुख, लोंढे, सायमोते, चव्हाण हे गट जयंत विकास आघाडीच्या नावासह आ. पाटील यांचे नेतृत्व मानत एकत्र आले, तर कॉँग्रेसचे माजी जि. प. सदस्य श्रीपाल चौगुले आणि माजी पं. स. सदस्य राष्ट्रवादीचे अजयसिंह चव्हाण ग्रामविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले. या चुरशीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलला १३ पैकी ७ जागा मिळाल्या, तर जयंत आघाडीला ६ जागा मिळाल्या. नुकतीच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. त्यामध्ये ग्रामविकासकडून सर्वाधिक मतांनी विजयी झालेले रमेश काशीद आणि विपूल चौगुले उमेदवार होते, तर जयंत पॅनेलकडून आप्पासाहेब मासुले आणि वंदना रेगे उभे होते. गुप्त मतदान पद्धतीने मतदान झाले आणि नाट्यमय घटना घडल्या. अध्यक्षपदासाठी मासुले आणि उपाध्यक्षपदासाठी रेगे यांनी सात मते मिळवून बाजी मारली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. ए. माळी यांनी काम पाहिले. ‘ग्रामविकास’चा पराभव झाला. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मात्र नेत्यांच्या आदेशानुसार ‘ग्रामविकास’च्या सातही संचालकांनी सहकार उपनिबंधकांकडे राजीनामे दिले.इकडे जयंत पॅनेलने जल्लोष करत राजारामबापू साखर कारखान्यावरील राजारामबापू पुतळ्यास अभिवादन केले. आ. जयंत पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांसह नेत्यांचा सत्कार केला.राजीनामे मंजूर झाल्यानंतर सोसायटीचे संचालक मंडळ अल्पमतात येऊन प्रशासक मंडळाची नेमणूक होण्याचे संकेत दिसत आहेत. याबाबत उपनिबंधकांकडून पुढील आठवड्यात पाच तारखेला संचालक मंडळाची बैठक होणार आहे. जर राजीनामे मंजूर झाले तर, संचालक मंडळाचे नूतन पदाधिकाऱ्यांचे अधिकार काय राहणार, प्रशासक नेमले तर काय होणार, प्रशासक मंडळ कोणाचे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (वार्ताहर)राजकीय संघर्ष : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्षग्रामविकासच्या सातहीजणांनी राजीनामे दिल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार रमेश काशीद व विपुल चौगुले यांची माहिती.जयंत पॅनेलच्या सहाजणांचे संचालक मंडळ टिकणार का, याबद्दल प्रश्नचिन्ह.आनंदराव नलवडे यांचे नेतृत्व मानत राष्ट्रवादीच्या चार-पाच गटांनी पदाधिकारी निवडणूक जिंकली. त्यामुळे आनंदराव नलवडे ठरले किंगमेकर.ग्रामविकासने निवडणुकीत बहुमत मिळवूनही सत्ता गमावली. समर्थक कार्यकर्ते नाराज.प्रशासक मंडळ आले तर नूतन संचालक, पदाधिकारी निवडी टिकणार का, याची चर्चा.