शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

साहित्यातील अस्सल सोने गावातच : केशव देशमुख

By admin | Updated: December 2, 2014 00:19 IST

देशिंग साहित्य संमेलनात प्रतिपादन : कथाकथन, नवोदितांच्या काव्य संमेलनाने रंगत

कवठेमहांकाळ : भोवताली घडत असलेले वास्तव साहित्यात आले पाहिजे. वास्तवपूर्ण लिहिण्यासाठी आजूबाजूला नवलेखकांनी पहावे. साहित्यातील अस्सल सोने गावातच आहे. आधुनिकतेचा बाजार मोठा होत असलेल्या काळात लेखकांनी आपलं कसब पणाला लावावे आणि अत्यंत दर्जेदार लिखाण करावे, असे प्रतिपादन नांदेडच्या रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ कवी डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी व्यक्त केला.तालुक्यातील देशिंग येथील कवी गो. स. चरणकर यांच्या स्मृतिनिमित्त देशिंग-हरोली ग्रामस्थ आणि अग्रणी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित १२ व्या अग्रणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. देशमुख बोलत होते. समाजातील कळीच्या प्रश्नाबाबत लेखकांनी नेहमी जागरूकता दाखवावी. समाज आणि लेखक या दोन वेगळ्या बाबी नसतात. लेखणीला कोणताही मेकअप न करता वास्तव मांडा. रंग न लावता मांडलले वास्तव काळजापर्यंत जाते. साहित्य निर्मिती ही अनुभवातून आणि अभ्यासातून झाली पाहिजे. केवळ कल्पनाविलासातून झालेली साहित्य निर्मिती भूक शमवेल; मात्र भुकेचे उत्तर देऊ शकत नाही, असेही देशमुख म्हणाले.ते म्हणाले, या भागातील लेखक चारुतासागर यांनी मराठी कथेला समृद्ध केले. त्यांनी किती लिहिले यापेक्षा किती कसदार लिहिले, हे पाहणे गरजेचे आहे. गो. स. चरणकर हे या भागातील लोकविद्यापीठ होते. शिक्षण आणि चळवळ हे दोन विषय लेखकांनी टाळू नयेत. सामाजिक लढाईत वाङ्मयीन गुणवत्ता नष्ट होता कामा नये. आपल्या अवतीभोवती घडते ते आणि त्याच भाषेत लिहिण्याची गरज आहे. दुष्काळाच्या सावलीत वावरत असताना लेखकांनी स्वत:च्या आनंदासाठी लिहून कसे चालेल? असा सवालही त्यांनी विचारला. कविसंमेलनाध्यक्ष विजय चोरमारे यांनी आता गंभीरपणे लिहिणाऱ्या नव्या पिढीची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जगण्याचे प्रश्न हे गंभीर होत असताना हलके-फुलके लिहून चालणार नाही. त्यामुळे नवकवींना आपल्या जाणिवा अधिक टोकदार करण्याची गरज आहे. संमेलनाचे उद्घाटक बांधकाम सभापती गजानन कोठावळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अग्रणी प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. देशमुख यांच्याहस्ते भरत खराडे यांना ‘देशिंग भूषण’, प्रा. वैजनाथ महाजन यांना ‘अग्रणी साहित्य साधना’, तर ‘अग्रणी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार’ हिम्मत पाटील यांना, तसेच ‘अग्रणी उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार’ लता ऐवळे यांना देण्यात आला. कवी दयासागर बन्ने यांच्या ‘पडझड’ या कवितासंग्रहाचे, ‘प्रिय हायकू’च्या दुसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन झाले.कविसंमेलनात चंद्रकांत देशमुख, सतीश लोखंडे, लवकुमार मुळे, ऋतुता माने, निर्मला लोंढे, रमजान मुल्ला, मनीषा पाटील, रघुराज मेटकरी, अभिजित पाटील, नामदेव भोसले, गोपाळ पाटील, दयासागर बन्ने, आबासाहेब शिंदे, एम. बी. जमादार, सुलभा कोष्टी यांच्यासह नवोदित कवींनी काव्यवाचन केले. कथाकार नामदेव माळी यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचे बहारदार सत्र झाले. (वार्ताहर)