शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

घाटमाथ्यावरील लेकींनी रोवला यशाचा झेंडा

By admin | Updated: May 25, 2016 23:34 IST

जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील कवठेमहांकाळ तालुक्यात तर दुष्काळाने गंभीर रूप धारण केले आहे.

सांगली : कवठेमहांकाळच्या उत्तरेला दिसणाऱ्या डोंगरांच्या भल्यामोठ्या रांगा आणि भीषण दुष्काळाचा सामना करत असताना, शिक्षणाचे स्वप्न विरून जाण्याच्या परिस्थितीवर मात करत तिसंगीच्या आरती आनंदराव भोसले व कुंडलापूरच्या अस्मिता अनिल देशमुख या विद्यार्थिनींनी बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे ८१ टक्के व ८० टक्के गुण मिळवत आदर्श निर्माण केला आहे. आरतीने अकौंटस्मध्ये ९४ गुण मिळवले आहेत, तर अस्मिताने अर्थशास्त्रासारख्या अवघड विषयात ८८ गुण मिळवले आहेत. आता यापुढे हार न मानता सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी प्रशासन सेवेत जाण्याचा आत्मविश्वास अस्मिताने व्यक्त केला, तर बॅँकिंग क्षेत्रात करिअर करणार असल्याचे आरतीने सांगितले. जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील कवठेमहांकाळ तालुक्यात तर दुष्काळाने गंभीर रूप धारण केले आहे. या परिस्थितीमुळे आपल्या पाल्याला शाळेस पाठविण्यासही पालक धजावत नसताना, पालकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत या दोघींनी बारावीत यश मिळविले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, कुंडलापूर ही गावे नेहमीच दुष्काळाशी सामना करतात. मात्र, याचा बाऊ न करता, या गावांतील दोघींनी एकत्रच कवठेमहांकाळ येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयातून बारावी पूर्ण केली. यात पूर्णत: पावसाच्या भरवशावरच शेती असलेल्या शेतकरी कुटुंबातील अस्मिताने मिळविलेले गुण शहरातील पालकांना किंवा अभ्यासकांना थोडेफार कमी वाटत असले तरी, कुंडलापूर ते कवठेमहांकाळ असा दैनंदिन प्रवास करीत आणि घरी गेल्यानंतर पालकांना मदत करीतच तिने बारावी पूर्ण केली आहे. कुंडलापूर येथे केवळ सातवीपर्यंतचीच शाळा उपलब्ध असल्याने तिने आठवी ते दहावीचे शिक्षणही शेजारच्या तिसंगी येथे पूर्ण केले. आरतीची बारावीही याच परिस्थितीत पूर्ण झाली आहे. कुटुंबाच्या पाठबळावर बारावी पूर्ण करीत असतानाच शेतकरी कुटुंबातील या सावित्रीच्या लेकींनी क्षमता तर सिध्द केलीच, शिवाय केवळ परिस्थितीचा बाऊ करीत ध्येय अर्धवट सोडणाऱ्यांसमोर आदर्शही निर्माण केला आहे. या दोघींना वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक यांची साथ लाभली. (प्रतिनिधी)अस्मिताला व्हायचंय अधिकारीअस्मिताला भविष्यात सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल, असे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठीच तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचा मनोदय बोलताना व्यक्त केला. प्रशासनात जाऊन गरजूंची अडचण दूर करण्याचे ध्येय असल्याचेही तिने यावेळी सांगितले. $$्निरात्र महाविद्यालयाचे यशसांगलीच्या एन. डी. पाटील रात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यंदाच्या बारावी परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. कला शाखेचा निकाल ७५.८६ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ७१.७९ टक्के लागला आहे. या कॉलेजच्या अपर्णा जाधवने कला शाखेत ७५.५३ टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीतही चांगले यश मिळवले आहे.