शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
3
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
4
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
5
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
6
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
7
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
8
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
9
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
10
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
11
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
12
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
13
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
14
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
15
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
16
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
17
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
18
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
19
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?

पाॅझिटिव्हिटी रेट कमी झाल्यावरच लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या स्थिर असली तरी पाॅझिटिव्हिटी रेट अजूनही कमी होणे आवश्यक आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या स्थिर असली तरी पाॅझिटिव्हिटी रेट अजूनही कमी होणे आवश्यक आहे. लॉकडाऊनचे प्रत्येकी १४ दिवसांचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर कोरोना स्थिती किती नियंत्रणात आली याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी केले.

पालकमंत्री पाटील यांनी कोरोना स्थितीचा ऑनलाईन आढावा घेतला. यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे व परिस्थिती लक्षात घेऊन सर्वमान्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या सध्या स्थिर असली व पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २२ टक्क्यांवर असला तरी तो अजूनही कमी होणे आवश्यक आहे. गावपातळीवर दक्षता समित्यांनी केलेल्या नियोजनामुळे अनेक गावातील बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी ज्या गावात अद्यापही रूग्णसंख्येतील वाढ कायम आहे, त्या गावात प्रशासनाने विशेष लक्ष देऊन नियोजन करावे. कोरोना रुग्ण वाढ नियंत्रित होण्यासाठी गावांमध्ये सामूहिक अलगीकरण अत्यंत प्रभावीपणे व्हावे. एखाद्या घरात कोरोना रुग्ण आढळल्यास त्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही अलगीकरणामध्ये ठेवावे, जेणेकरून संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, लॉकडाऊन असतानाही रुग्ण संख्या वाढत आहे, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. तिसऱ्या लाटेचा विचार करता जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ज्ञांची बैठक घ्यावी व आतापासूनच त्याची तयारी केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

आमदार सदाभाऊ खोत, अरुण लाड, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी बैठकीत सहभाग घेतला.

चौकट

तिसरी लाट रोखण्याचे नियोजन हवे

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सध्या कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी वाढ कायम आहे. रूग्णसंख्या अजूनही कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका असल्याने प्रशासनाने आतापासूनच त्याची तयारी करावी.