शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

पाॅझिटिव्हिटी रेट कमी झाल्यावरच लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या स्थिर असली तरी पाॅझिटिव्हिटी रेट अजूनही कमी होणे आवश्यक आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या स्थिर असली तरी पाॅझिटिव्हिटी रेट अजूनही कमी होणे आवश्यक आहे. लॉकडाऊनचे प्रत्येकी १४ दिवसांचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर कोरोना स्थिती किती नियंत्रणात आली याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी केले.

पालकमंत्री पाटील यांनी कोरोना स्थितीचा ऑनलाईन आढावा घेतला. यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे व परिस्थिती लक्षात घेऊन सर्वमान्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या सध्या स्थिर असली व पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २२ टक्क्यांवर असला तरी तो अजूनही कमी होणे आवश्यक आहे. गावपातळीवर दक्षता समित्यांनी केलेल्या नियोजनामुळे अनेक गावातील बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी ज्या गावात अद्यापही रूग्णसंख्येतील वाढ कायम आहे, त्या गावात प्रशासनाने विशेष लक्ष देऊन नियोजन करावे. कोरोना रुग्ण वाढ नियंत्रित होण्यासाठी गावांमध्ये सामूहिक अलगीकरण अत्यंत प्रभावीपणे व्हावे. एखाद्या घरात कोरोना रुग्ण आढळल्यास त्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही अलगीकरणामध्ये ठेवावे, जेणेकरून संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, लॉकडाऊन असतानाही रुग्ण संख्या वाढत आहे, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. तिसऱ्या लाटेचा विचार करता जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ज्ञांची बैठक घ्यावी व आतापासूनच त्याची तयारी केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

आमदार सदाभाऊ खोत, अरुण लाड, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी बैठकीत सहभाग घेतला.

चौकट

तिसरी लाट रोखण्याचे नियोजन हवे

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सध्या कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी वाढ कायम आहे. रूग्णसंख्या अजूनही कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका असल्याने प्रशासनाने आतापासूनच त्याची तयारी करावी.