शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

टँकरच्या पाणी पुरवठ्यात इंधनाचा अडसर

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

जत तालुक्यातील स्थिती : पेट्रोलपंप चालकांकडून उधारी बंद; वेळेत पाणी मिळेना!

जयवंत आदाटे - जत -तालुक्यातील तीन गावांत चार शासकीय टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परंतु या चार टॅँकरमध्ये डिझेल घालण्यावरून वेळोवेळी वाद निर्माण होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून पेट्रोलपंप चालकांना डिझेलची बिले वेळेत अदा केली जात नसल्याने पेट्रोलपंप चालकांनी उधारीवर डिझेल देणे बंद केले आहे. यामुळे टॅँकरमध्ये डिझेल घालणार कोण?, या वादातून अनेकदा गावामध्ये टॅँकरद्वारे वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.उमराणी गावात दोन व खोजानवाडी आणि अमृतवाडी गावात प्रत्येकी एक याप्रमाणे चार शासकीय टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. खासगी टॅँकरसाठी भाड्यामध्ये डिझेलचे बिल धरून एकत्रित बिल काढले जात आहे. शासकीय टॅँकरसाठी भाडे आकारले जात नाही, परंतु त्यासाठी डिझेलची तरतूद करणे आवश्यक असते.यापूर्वी जत शहरातील एका पेट्रोल पंपावर शासनाचे उधारी खाते घालून टॅँकरचालकास ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून पावती दिली जात होती. टॅँकरचालक पेट्रोलपंप मालकास ही पावती दाखवून टॅँकरमध्ये डिझेल भरून घेत होते. त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर पेट्रोलपंप मालकास शासनाकडून एकत्रित बिल दिले जात होते. परंतु मागील दोन-तीन वर्षात शासनाकडून पेट्रोलपंप मालकांना वेळेत बिल दिले नाही. आठ-दहा महिने हेलपाटे मारून झाल्यानंतर त्यांना त्यांचे थकित बिल मिळाले आहे. या कारणामुळे यावर्षी जत शहरातील एकाही पेट्रोलपंप मालकाने पाणी पुरवठा करणाऱ्या शासकीय टॅँकरला उधारीवर डिझेल दिले नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप मालकांची भेट घेऊन त्यांना उधार देण्याची विनंती केली असता ते म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त एक ते दीड महिना उधार देऊ, त्यानंतर उधार देणे शक्य होणार नाही. तालुका पातळीवरील शासकीय अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे जत शहरातील पेट्रोल पंपावर शासकीय टॅँकरसाठी डिझेल मिळेनासे झाले आहे, असा आरोप पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावातील नागरिकांमधून केला जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या शासकीय टॅँकरसाठी डिझेलचा पुरवठा करण्यासाठी आर्थिक तरतूद असते. परंतु त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वेळेवर अनुदान उपलब्ध होत नाही. त्यामुळे पेट्रोलपंप मालकांना त्यांचे थकित बिल वेळेवर देता येत नाही, अशी शासकीय अधिकारी खंत व्यक्त करत आहेत. शासन पाणीटंचाई कामात हयगय करत नाही, अशी घोषणा वेळोवेळी केली जात असली तरी, ती फसवी आहे, असा आरोप अमृतवाडीचे माजी सरपंच विठ्ठल पवार यांनी केला आहे. (वार्ताहर)लोकवर्गणीतून इंधनाचा खर्चपाणी पुरवठा करणारा टँकरचालक, गावातील ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा करून, ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडून गरज भासेल तसे वेळोवेळी रोख पैसे घेऊन सध्या टॅँकरमध्ये डिझेल घालून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.शासनाने पाणीटंचाईसाठी वेळेवर निधी उपलब्ध करून दिला, तर लोकवर्गणी जमा करून पाणी पुरवठा करण्याची वेळ जत पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर यापुढे येणार नाही.