शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या पाणी पुरवठ्यात इंधनाचा अडसर

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

जत तालुक्यातील स्थिती : पेट्रोलपंप चालकांकडून उधारी बंद; वेळेत पाणी मिळेना!

जयवंत आदाटे - जत -तालुक्यातील तीन गावांत चार शासकीय टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परंतु या चार टॅँकरमध्ये डिझेल घालण्यावरून वेळोवेळी वाद निर्माण होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून पेट्रोलपंप चालकांना डिझेलची बिले वेळेत अदा केली जात नसल्याने पेट्रोलपंप चालकांनी उधारीवर डिझेल देणे बंद केले आहे. यामुळे टॅँकरमध्ये डिझेल घालणार कोण?, या वादातून अनेकदा गावामध्ये टॅँकरद्वारे वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.उमराणी गावात दोन व खोजानवाडी आणि अमृतवाडी गावात प्रत्येकी एक याप्रमाणे चार शासकीय टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. खासगी टॅँकरसाठी भाड्यामध्ये डिझेलचे बिल धरून एकत्रित बिल काढले जात आहे. शासकीय टॅँकरसाठी भाडे आकारले जात नाही, परंतु त्यासाठी डिझेलची तरतूद करणे आवश्यक असते.यापूर्वी जत शहरातील एका पेट्रोल पंपावर शासनाचे उधारी खाते घालून टॅँकरचालकास ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून पावती दिली जात होती. टॅँकरचालक पेट्रोलपंप मालकास ही पावती दाखवून टॅँकरमध्ये डिझेल भरून घेत होते. त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर पेट्रोलपंप मालकास शासनाकडून एकत्रित बिल दिले जात होते. परंतु मागील दोन-तीन वर्षात शासनाकडून पेट्रोलपंप मालकांना वेळेत बिल दिले नाही. आठ-दहा महिने हेलपाटे मारून झाल्यानंतर त्यांना त्यांचे थकित बिल मिळाले आहे. या कारणामुळे यावर्षी जत शहरातील एकाही पेट्रोलपंप मालकाने पाणी पुरवठा करणाऱ्या शासकीय टॅँकरला उधारीवर डिझेल दिले नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप मालकांची भेट घेऊन त्यांना उधार देण्याची विनंती केली असता ते म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त एक ते दीड महिना उधार देऊ, त्यानंतर उधार देणे शक्य होणार नाही. तालुका पातळीवरील शासकीय अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे जत शहरातील पेट्रोल पंपावर शासकीय टॅँकरसाठी डिझेल मिळेनासे झाले आहे, असा आरोप पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावातील नागरिकांमधून केला जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या शासकीय टॅँकरसाठी डिझेलचा पुरवठा करण्यासाठी आर्थिक तरतूद असते. परंतु त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वेळेवर अनुदान उपलब्ध होत नाही. त्यामुळे पेट्रोलपंप मालकांना त्यांचे थकित बिल वेळेवर देता येत नाही, अशी शासकीय अधिकारी खंत व्यक्त करत आहेत. शासन पाणीटंचाई कामात हयगय करत नाही, अशी घोषणा वेळोवेळी केली जात असली तरी, ती फसवी आहे, असा आरोप अमृतवाडीचे माजी सरपंच विठ्ठल पवार यांनी केला आहे. (वार्ताहर)लोकवर्गणीतून इंधनाचा खर्चपाणी पुरवठा करणारा टँकरचालक, गावातील ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा करून, ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडून गरज भासेल तसे वेळोवेळी रोख पैसे घेऊन सध्या टॅँकरमध्ये डिझेल घालून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.शासनाने पाणीटंचाईसाठी वेळेवर निधी उपलब्ध करून दिला, तर लोकवर्गणी जमा करून पाणी पुरवठा करण्याची वेळ जत पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर यापुढे येणार नाही.