शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

सांगलीत दुप्पट दर देऊनही फळे मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनात रुग्णाला फळे खाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक पूर्ण सांगली फिरले; पण त्यांना कुठेही फळे मिळाली ...

सांगली : कोरोनात रुग्णाला फळे खाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक पूर्ण सांगली फिरले; पण त्यांना कुठेही फळे मिळाली नाहीत. विष्णूअण्णा फळ मार्केटचे सौदे बंद असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडे फळे नसल्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत.

कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमधील होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधारी यांनी सौद्यावर बंदी घातली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सौदे आणि किरकोळ विक्रेत्याकडील फळ विक्री बंद आहे. काही किरकोळ विक्रेत्यांकडे फळे शिल्लक होती, तीही त्यांनी दुप्पट दराने विक्री करून संपविली आहेत. सौदे बंद असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडेही फळे शिल्लक नाहीत. यामुळे कोरोना रुग्णांसाठी सफरचंद, चिकू, डाळिंब, मोसंबी, ड्रॅगन फ्रूट आदी फळे देण्याची सूचना देऊनही फळे उपलब्ध नसल्यामुळे देता येत नाहीत. नातेवाईक सर्व शहरातून फळांची उपलब्धता करण्यासाठी फिरत आहेत; पण कुठेही फळे मिळत नाहीत. यामुळे फळ मार्केटच्या सौदे बंदचा आणि विक्रीचा कोरोना रुग्णांना फटका बसत आहे.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फळ मार्केट बंद -महेश चव्हाण

जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून कोरोनाची गर्दी टाळण्यासाठी वसंतदादा मार्केटसह विष्णूअण्णा फळ मार्केट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे फळ मार्केटचे सौदे गुरुवारपासून बंद आहेत. पुन्हा एखदा जिल्हाधिकारी यांना फळ मार्केटचे साैदे सुरू करण्याबाबत विनंती करणार आहे, त्यांनी परवानगी दिली तरच सोदे निघतील, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.

चौकट

सांगलीत कुठेही फळे मिळाली नाहीत

माझे पती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. डॉक्टरांनी मोसंबी, किव्ही, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद आदी फळे खाण्याबाबत सूचना दिली आहे. त्यानुसार सर्व सांगलीत फळ उपलब्ध करण्यासाठी फिरूनही कुठे मिळाली नाहीत, रुग्णाला आता काय द्यायचे, हेच आम्हाला कळत नाही. जिल्हाधिकारी यांनी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी फळे उपलब्धतेसाठी काही तरी मार्ग काढावा, अशी मागणी सविता जाधव यांनी केली.

चौकट

आंबा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

रमजानमध्ये फळांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे रुग्णांसाठीही फळे पोषक असल्यामुळे मागणी आहे; परंतु प्रशासनाच्या आदेशामुळे आम्हाला विष्णूअण्णा फळ मार्केटचे सौदे बंद ठेवावे लागले आहेत. विक्रेत्यांकडे फळे कुठून येणार आहेत. अक्षयतृतीयेला आंब्याची मागणी मोठी असल्यामुळे विक्रेत्यांनी आंबे पिकविले आहेत. या आंब्यास मार्केट नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया विष्णूअण्णा होलसेल फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आलदर यांनी दिली.