शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दुप्पट दर देऊनही फळे मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनात रुग्णाला फळे खाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक पूर्ण सांगली फिरले; पण त्यांना कुठेही फळे मिळाली ...

सांगली : कोरोनात रुग्णाला फळे खाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक पूर्ण सांगली फिरले; पण त्यांना कुठेही फळे मिळाली नाहीत. विष्णूअण्णा फळ मार्केटचे सौदे बंद असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडे फळे नसल्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत.

कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमधील होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधारी यांनी सौद्यावर बंदी घातली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सौदे आणि किरकोळ विक्रेत्याकडील फळ विक्री बंद आहे. काही किरकोळ विक्रेत्यांकडे फळे शिल्लक होती, तीही त्यांनी दुप्पट दराने विक्री करून संपविली आहेत. सौदे बंद असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडेही फळे शिल्लक नाहीत. यामुळे कोरोना रुग्णांसाठी सफरचंद, चिकू, डाळिंब, मोसंबी, ड्रॅगन फ्रूट आदी फळे देण्याची सूचना देऊनही फळे उपलब्ध नसल्यामुळे देता येत नाहीत. नातेवाईक सर्व शहरातून फळांची उपलब्धता करण्यासाठी फिरत आहेत; पण कुठेही फळे मिळत नाहीत. यामुळे फळ मार्केटच्या सौदे बंदचा आणि विक्रीचा कोरोना रुग्णांना फटका बसत आहे.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फळ मार्केट बंद -महेश चव्हाण

जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून कोरोनाची गर्दी टाळण्यासाठी वसंतदादा मार्केटसह विष्णूअण्णा फळ मार्केट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे फळ मार्केटचे सौदे गुरुवारपासून बंद आहेत. पुन्हा एखदा जिल्हाधिकारी यांना फळ मार्केटचे साैदे सुरू करण्याबाबत विनंती करणार आहे, त्यांनी परवानगी दिली तरच सोदे निघतील, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.

चौकट

सांगलीत कुठेही फळे मिळाली नाहीत

माझे पती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. डॉक्टरांनी मोसंबी, किव्ही, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद आदी फळे खाण्याबाबत सूचना दिली आहे. त्यानुसार सर्व सांगलीत फळ उपलब्ध करण्यासाठी फिरूनही कुठे मिळाली नाहीत, रुग्णाला आता काय द्यायचे, हेच आम्हाला कळत नाही. जिल्हाधिकारी यांनी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी फळे उपलब्धतेसाठी काही तरी मार्ग काढावा, अशी मागणी सविता जाधव यांनी केली.

चौकट

आंबा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

रमजानमध्ये फळांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे रुग्णांसाठीही फळे पोषक असल्यामुळे मागणी आहे; परंतु प्रशासनाच्या आदेशामुळे आम्हाला विष्णूअण्णा फळ मार्केटचे सौदे बंद ठेवावे लागले आहेत. विक्रेत्यांकडे फळे कुठून येणार आहेत. अक्षयतृतीयेला आंब्याची मागणी मोठी असल्यामुळे विक्रेत्यांनी आंबे पिकविले आहेत. या आंब्यास मार्केट नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया विष्णूअण्णा होलसेल फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आलदर यांनी दिली.