शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

सांगलीत दुप्पट दर देऊनही फळे मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनात रुग्णाला फळे खाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक पूर्ण सांगली फिरले; पण त्यांना कुठेही फळे मिळाली ...

सांगली : कोरोनात रुग्णाला फळे खाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक पूर्ण सांगली फिरले; पण त्यांना कुठेही फळे मिळाली नाहीत. विष्णूअण्णा फळ मार्केटचे सौदे बंद असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडे फळे नसल्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत.

कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमधील होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधारी यांनी सौद्यावर बंदी घातली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सौदे आणि किरकोळ विक्रेत्याकडील फळ विक्री बंद आहे. काही किरकोळ विक्रेत्यांकडे फळे शिल्लक होती, तीही त्यांनी दुप्पट दराने विक्री करून संपविली आहेत. सौदे बंद असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडेही फळे शिल्लक नाहीत. यामुळे कोरोना रुग्णांसाठी सफरचंद, चिकू, डाळिंब, मोसंबी, ड्रॅगन फ्रूट आदी फळे देण्याची सूचना देऊनही फळे उपलब्ध नसल्यामुळे देता येत नाहीत. नातेवाईक सर्व शहरातून फळांची उपलब्धता करण्यासाठी फिरत आहेत; पण कुठेही फळे मिळत नाहीत. यामुळे फळ मार्केटच्या सौदे बंदचा आणि विक्रीचा कोरोना रुग्णांना फटका बसत आहे.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फळ मार्केट बंद -महेश चव्हाण

जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून कोरोनाची गर्दी टाळण्यासाठी वसंतदादा मार्केटसह विष्णूअण्णा फळ मार्केट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे फळ मार्केटचे सौदे गुरुवारपासून बंद आहेत. पुन्हा एखदा जिल्हाधिकारी यांना फळ मार्केटचे साैदे सुरू करण्याबाबत विनंती करणार आहे, त्यांनी परवानगी दिली तरच सोदे निघतील, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.

चौकट

सांगलीत कुठेही फळे मिळाली नाहीत

माझे पती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. डॉक्टरांनी मोसंबी, किव्ही, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद आदी फळे खाण्याबाबत सूचना दिली आहे. त्यानुसार सर्व सांगलीत फळ उपलब्ध करण्यासाठी फिरूनही कुठे मिळाली नाहीत, रुग्णाला आता काय द्यायचे, हेच आम्हाला कळत नाही. जिल्हाधिकारी यांनी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी फळे उपलब्धतेसाठी काही तरी मार्ग काढावा, अशी मागणी सविता जाधव यांनी केली.

चौकट

आंबा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

रमजानमध्ये फळांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे रुग्णांसाठीही फळे पोषक असल्यामुळे मागणी आहे; परंतु प्रशासनाच्या आदेशामुळे आम्हाला विष्णूअण्णा फळ मार्केटचे सौदे बंद ठेवावे लागले आहेत. विक्रेत्यांकडे फळे कुठून येणार आहेत. अक्षयतृतीयेला आंब्याची मागणी मोठी असल्यामुळे विक्रेत्यांनी आंबे पिकविले आहेत. या आंब्यास मार्केट नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया विष्णूअण्णा होलसेल फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आलदर यांनी दिली.