शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

चार दिवस झाले तरी, फडणवीसांचा निरोप नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ...

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी दोन दिवसांत नेत्यांकडे निरोप देतो, असे त्यांनी सांगितले होते. मात्र चार दिवस झाले तरीही फडणवीसांचा निरोप आलेला नाही. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार पाटील विरुद्ध भाजपमधील अन्य नेते अशी दुफळी पडली आहे. यामुळेच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल लांबणीवर पडला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना पदाधिकारी बदल नको आहे. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे महापालिकेत झाले, ते जिल्हा परिषदेत होऊ नये, असे त्यांना वाटते. जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत. त्यांना सामोरे जातांना जिल्ह्याच्या सत्तेचे राजकीय केंद्र असलेली जिल्हा परिषद हातून जाऊ नये, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार त्यांनी पदाधिकारी बदल नकोच, अशी भूमिका फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे.

खासदार पाटील मात्र जिल्हा परिषदेतील बदलावर ठाम आहेत. भाजपच्या सदस्यांची नाराजी दूर करणे गरजेचे आहे. नाही तर आगामी निवडणुकीत याचा वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका खा. पाटील यांनी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे चार दिवसापूर्वी फडणवीस यांनी दोन दिवसांत भाजप नेत्यांकडे निरोप देतो, सांगितले होते. पण, दोन दिवसांचे चार दिवस उलटून गेले तरी फडणवीसांचा निरोप आलेला नाही. यावरून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जाणार की केवळ टोलवाटोलवी करून वेळ मारून नेणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

चौकट

राजीनामे घेण्याबाबत निरोप नाही : पृथ्वीराज देशमुख

जिल्हा परिषदेत पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे पदाधिकारी बदलास विलंब झाला आहे. काही नाराज सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांनी जिल्ह्यातील नेत्यांना निरोप देतो, असे म्हटल्याचे त्या नाराज सदस्यांकडूनच समजले. अद्याप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्याबाबत कोणताच निरोप आलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.