शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

चार दिवस झाले तरी, फडणवीसांचा निरोप नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ...

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी दोन दिवसांत नेत्यांकडे निरोप देतो, असे त्यांनी सांगितले होते. मात्र चार दिवस झाले तरीही फडणवीसांचा निरोप आलेला नाही. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार पाटील विरुद्ध भाजपमधील अन्य नेते अशी दुफळी पडली आहे. यामुळेच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल लांबणीवर पडला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना पदाधिकारी बदल नको आहे. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे महापालिकेत झाले, ते जिल्हा परिषदेत होऊ नये, असे त्यांना वाटते. जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत. त्यांना सामोरे जातांना जिल्ह्याच्या सत्तेचे राजकीय केंद्र असलेली जिल्हा परिषद हातून जाऊ नये, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार त्यांनी पदाधिकारी बदल नकोच, अशी भूमिका फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे.

खासदार पाटील मात्र जिल्हा परिषदेतील बदलावर ठाम आहेत. भाजपच्या सदस्यांची नाराजी दूर करणे गरजेचे आहे. नाही तर आगामी निवडणुकीत याचा वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका खा. पाटील यांनी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे चार दिवसापूर्वी फडणवीस यांनी दोन दिवसांत भाजप नेत्यांकडे निरोप देतो, सांगितले होते. पण, दोन दिवसांचे चार दिवस उलटून गेले तरी फडणवीसांचा निरोप आलेला नाही. यावरून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जाणार की केवळ टोलवाटोलवी करून वेळ मारून नेणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

चौकट

राजीनामे घेण्याबाबत निरोप नाही : पृथ्वीराज देशमुख

जिल्हा परिषदेत पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे पदाधिकारी बदलास विलंब झाला आहे. काही नाराज सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांनी जिल्ह्यातील नेत्यांना निरोप देतो, असे म्हटल्याचे त्या नाराज सदस्यांकडूनच समजले. अद्याप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्याबाबत कोणताच निरोप आलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.