शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवस झाले तरी, फडणवीसांचा निरोप नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ...

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी दोन दिवसांत नेत्यांकडे निरोप देतो, असे त्यांनी सांगितले होते. मात्र चार दिवस झाले तरीही फडणवीसांचा निरोप आलेला नाही. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार पाटील विरुद्ध भाजपमधील अन्य नेते अशी दुफळी पडली आहे. यामुळेच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल लांबणीवर पडला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना पदाधिकारी बदल नको आहे. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे महापालिकेत झाले, ते जिल्हा परिषदेत होऊ नये, असे त्यांना वाटते. जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत. त्यांना सामोरे जातांना जिल्ह्याच्या सत्तेचे राजकीय केंद्र असलेली जिल्हा परिषद हातून जाऊ नये, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार त्यांनी पदाधिकारी बदल नकोच, अशी भूमिका फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे.

खासदार पाटील मात्र जिल्हा परिषदेतील बदलावर ठाम आहेत. भाजपच्या सदस्यांची नाराजी दूर करणे गरजेचे आहे. नाही तर आगामी निवडणुकीत याचा वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका खा. पाटील यांनी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे चार दिवसापूर्वी फडणवीस यांनी दोन दिवसांत भाजप नेत्यांकडे निरोप देतो, सांगितले होते. पण, दोन दिवसांचे चार दिवस उलटून गेले तरी फडणवीसांचा निरोप आलेला नाही. यावरून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जाणार की केवळ टोलवाटोलवी करून वेळ मारून नेणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

चौकट

राजीनामे घेण्याबाबत निरोप नाही : पृथ्वीराज देशमुख

जिल्हा परिषदेत पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे पदाधिकारी बदलास विलंब झाला आहे. काही नाराज सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांनी जिल्ह्यातील नेत्यांना निरोप देतो, असे म्हटल्याचे त्या नाराज सदस्यांकडूनच समजले. अद्याप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्याबाबत कोणताच निरोप आलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.