शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

महापूर व अतिवृष्टीमुळे ४२ हजार हेक्टर शेतीक्षेत्र उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST

शिराळा येथे मोरणा नदीच्या पुरात सिद्धार्थ नलवडे यांची केळीची बाग उद्ध्वस्त झाली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या आठवडाभरातील ...

शिराळा येथे मोरणा नदीच्या पुरात सिद्धार्थ नलवडे यांची केळीची बाग उद्ध्वस्त झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या आठवडाभरातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे एक लाख शेतकऱ्यांची पीकहानी झाली आहे. ४२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. विशेषत: ऊस, सोयाबीन आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या नजरा आता पंचनामे आणि नुकसान भरपाईकडे लागल्या आहेत. नदीकाठच्या शेतीत शेतकऱ्यांची सधन शेती पुराच्या तडाख्यात नष्ट झाली आहे. नदीकाठची पिकाऊ मळीची माती वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांची काठावरची शेती वाहून गेली आहे. हजारो एकरमधील ऊसाच्या सुरळीत पाणी शिरल्याने रोपे मेली आहेत. आठवडाभरापेक्षा जास्त काळा ऊस पाण्यात राहिल्याने तो पुन्हा उभा राहण्याची शक्यता नाही. पलूस, वाळवा, मिकज या ऊसक्षेत्राच्या तालुक्यात हे नुकसान गंभीर स्वरुपाचे आहे.

कृषी विभागाने नजर अंदाजाने नुकसानीची तीव्रता स्पष्ट केली आहे. तालुकानिहाय हानी अशी : मिरज तालुक्यात ११ हजार हेक्टर, वाळव्यात १४ हजार, शिराळ्यात ७ हजार, पलुसमध्ये १० हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये बागायत २४ हजार, जिरायत १५ हजार आणि फळपिके तीन हजार हेक्टर शेतीची हानी झाली आहे.

चौकट

२३ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याखाली

चार तालुक्यांत २३ हजार हेक्टर ऊस पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी नदीकाठी किमान आठवडाभर राहणार आहे, त्यात बुडालेला ऊस पुन्हा फुलण्याची शक्यता नाही.

चौकट

गुंठेवारी शेतकरी झाले भूमीहीन

नदीकाठी अनेक शेतकऱ्यांची पाच-दहा गुंठ्यांची शेती आहे. महापुरात पाण्याच्या प्रचंड वेगाने नदीकाठ कातरला गेला, त्यामुळे पाच-दहा गुंठ्यांची शेतीही त्यात नाहीशी झाली. आता हे शेतकरी चक्क भूमीहीन झाले आहेत. सातबारा उताऱ्यांवर शेती नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र ती दिसेना झाली आहे.

कोट

सध्याचा नुकसानीचा अंदाज नजरपाहणीनुसार आहे. प्रत्यक्ष पंचनामे सुरू होतील तेव्हा तो कमी-जास्त होऊ शकते. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवला आहे.

- बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधीक्षक.