शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

महापूर व अतिवृष्टीमुळे ४२ हजार हेक्टर शेतीक्षेत्र उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST

शिराळा येथे मोरणा नदीच्या पुरात सिद्धार्थ नलवडे यांची केळीची बाग उद्ध्वस्त झाली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या आठवडाभरातील ...

शिराळा येथे मोरणा नदीच्या पुरात सिद्धार्थ नलवडे यांची केळीची बाग उद्ध्वस्त झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या आठवडाभरातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे एक लाख शेतकऱ्यांची पीकहानी झाली आहे. ४२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. विशेषत: ऊस, सोयाबीन आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या नजरा आता पंचनामे आणि नुकसान भरपाईकडे लागल्या आहेत. नदीकाठच्या शेतीत शेतकऱ्यांची सधन शेती पुराच्या तडाख्यात नष्ट झाली आहे. नदीकाठची पिकाऊ मळीची माती वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांची काठावरची शेती वाहून गेली आहे. हजारो एकरमधील ऊसाच्या सुरळीत पाणी शिरल्याने रोपे मेली आहेत. आठवडाभरापेक्षा जास्त काळा ऊस पाण्यात राहिल्याने तो पुन्हा उभा राहण्याची शक्यता नाही. पलूस, वाळवा, मिकज या ऊसक्षेत्राच्या तालुक्यात हे नुकसान गंभीर स्वरुपाचे आहे.

कृषी विभागाने नजर अंदाजाने नुकसानीची तीव्रता स्पष्ट केली आहे. तालुकानिहाय हानी अशी : मिरज तालुक्यात ११ हजार हेक्टर, वाळव्यात १४ हजार, शिराळ्यात ७ हजार, पलुसमध्ये १० हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये बागायत २४ हजार, जिरायत १५ हजार आणि फळपिके तीन हजार हेक्टर शेतीची हानी झाली आहे.

चौकट

२३ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याखाली

चार तालुक्यांत २३ हजार हेक्टर ऊस पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी नदीकाठी किमान आठवडाभर राहणार आहे, त्यात बुडालेला ऊस पुन्हा फुलण्याची शक्यता नाही.

चौकट

गुंठेवारी शेतकरी झाले भूमीहीन

नदीकाठी अनेक शेतकऱ्यांची पाच-दहा गुंठ्यांची शेती आहे. महापुरात पाण्याच्या प्रचंड वेगाने नदीकाठ कातरला गेला, त्यामुळे पाच-दहा गुंठ्यांची शेतीही त्यात नाहीशी झाली. आता हे शेतकरी चक्क भूमीहीन झाले आहेत. सातबारा उताऱ्यांवर शेती नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र ती दिसेना झाली आहे.

कोट

सध्याचा नुकसानीचा अंदाज नजरपाहणीनुसार आहे. प्रत्यक्ष पंचनामे सुरू होतील तेव्हा तो कमी-जास्त होऊ शकते. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवला आहे.

- बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधीक्षक.