शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त व्यावसायिक म्हणताहेत ‘कर्ज देता का कर्ज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST

सांगली : राज्यातील अतिवृष्टी व पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना ६ टक्के व्याजदराने जिल्हा बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याचा निर्णय होऊन ...

सांगली : राज्यातील अतिवृष्टी व पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना ६ टक्के व्याजदराने जिल्हा बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याचा निर्णय होऊन महिना उलटला, तरी शासनाच्या आदेशाचे घोडे अडलेलेच आहे. घोषणेनंतर एकाही व्यावसायिकाला बँकेमार्फत कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांना आता घोषणांच्या पुराने छळण्यास सुरुवात केली आहे.

पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांना ना नफा ना तोटा तत्त्वावर ६ टक्के व्याजदराने कर्जपुरवठ्याचा निर्णय १८ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे याच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता महिना उलटला तरी कागदी घोडे पुढे न सरकल्यामुळे अशा प्रकारचा कर्जपुरवठाच होऊ शकला नाही. जिल्हा बँकेला अद्याप धोरणही ठरविता आलेले नाही. नियमांच्या अडचणींचे बांधही बँकेसमोर आहेत.

या कर्जपुरवठ्याचे स्वरूप काय असेल, याचीही कल्पना अद्याप शासनाने दिली नाही. शासनाने कोणताही निर्णय घेतला तरी जिल्हा बँकेला कर्जपुरवठा करताना बँकिंगचे सर्व नियम लागणार आहेत. विनाअट, जलदगतीने पूरग्रस्त व्यावसायिकांना कर्जपुरवठ्याचे हे धोरण मंदगती कारभारात फसले आहे.

जिल्हा बँकेला शासनाचे स्पष्ट आदेश आल्याशिवाय काहीही करता येत नाही. तसेच रिझर्व्ह बँकेच्या नियमांचेही पालन त्यांना करावे लागणार आहे. त्यामुळे दुहेरी कात्रीत जिल्हा बँका अडकल्या आहेत. सांगली जिल्हा बँकेने यापूर्वीचे नियमांच्या पालनाचे स्पष्टीकरण दिल्याने या निर्णयाचा व्यापाऱ्यांना फार मोठा फायदा मिळण्याची शक्यता कमी आहे.

चौकट

बँकांच्या नोटिसांचा सामना

सांगलीतल पूरग्रस्त व्यापारी, टपरीवाले सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांना बँकांच्या कर्जाचे हप्ते थकल्याबद्दल नोटिसा आल्या आहेत. येथील काही गाळ्यांवर जप्तीची कारवाईसुद्धा यापूर्वी झाली आहे. अशा स्थितीत कमी व्याजदराने कर्जाच्या घोषणेने व्यावसायिकांत आशा निर्माण झाली होती. प्रत्यक्षात एकालाही असा कर्जपुरवठा झाला नाही.

कोट

शासनाने कर्जपुरवठ्याचा निर्णय घेतला, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. व्यापारी उद्ध्वस्त होत असताना त्यांना सावरण्याच्या घोषणाच केल्या गेल्या.

- समीर शहा, अध्यक्ष, व्यापारी एकता असोसिएशन, सांगली