शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवा, नंतर गटा-तटाचं बघू--जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:08 IST

इस्लामपूर : काँग्रेस आघाडी शासनाच्या कारकीर्दीत गावपातळीवरील पदे मिळविण्यासाठी ‘जयंत एक्स्प्रेस’ खचाखच भरत होती.

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : काँग्रेस आघाडी शासनाच्या कारकीर्दीत गावपातळीवरील पदे मिळविण्यासाठी ‘जयंत एक्स्प्रेस’ खचाखच भरत होती. सत्ता गेल्यापासून राष्ट्रवादीचे काही डबे रिकामे झाले आहेत. त्यातच इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीला पराभव दाखवला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत सत्ता मिळवा, त्यानंतर गटा-तटाचं बघू, असा सल्ला आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

वाळवा तालुक्यात राजारामबापू उद्योग समूहामुळे राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. ग्रामीण भागासह इस्लामपूर, आष्टा शहरातील सहकारी संस्थांवर आमदार पाटील यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि माजी आमदार विलासराव शिंदे राष्ट्रवादीत असले तरी, त्यांच्याही सहकार आणि शिक्षण संस्था आहेत.

डांगे यांची ग्रामीण भागात सत्ताकेंद्रे नाहीत. शिंदे यांचा गट स्वतंत्रपणे कार्यरत आहे. त्यातच त्यांचे पुत्र वैभव शिंदे भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे आष्टा आणि परिसरातील कोरेगाव, बागणी, ढवळी, शिगाव, बहाद्दूरवाडी आदी गावातून राष्टÑवादीविरोधक टिमकी वाजवू लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादीमध्ये गटतटाचे राजकारण नेहमीच पेटलेले असते. त्याचा परिणाम आता ग्रामपंचायत निवडणुकीवर होणार असल्याने आमदार पाटील यांनी ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे.

आ. पाटील यांचे खंदे समर्थक पी. आर. पाटील (कुरळप), माणिकराव पाटील (बोरगाव), दिलीपराव पाटील (वाळवा), विनायकराव पाटील (ताकारी), रवींद्र बर्डे (वाटेगाव), जनार्दनकाका पाटील (कासेगाव), विजयबापू पाटील (साखराळे) या नेत्यांवर ग्रामपंचायत निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र बोरगावसारख्या ठिकाणी राज्य पातळीवरील नेते असलेल्या माणिकराव पाटील यांनाही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते चकवा देत आहेत. कोरेगाव येथे राष्ट्रवादीचे बी. के. पाटील आणि आर. के. पाटील हे दोन गट एकमेकांविरोधात नेहमीच असतात. उर्वरीत सर्वच गावांमध्ये राष्ट्रवादीचे एक, दोन आणि काही ठिकाणी तीन-तीन गट सक्रिय आहेत.

राष्ट्रवादीतील गटबाजी आणि भाजपने प्रत्येक गावात सुरु केलेला शिरकाव, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक यांचे गट यामुळे आमदार पाटील यांच्यापुढे निवडणुकीचे मोठे आव्हान उभे राहिले आहेत. यामुळे त्यांनी आधी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवा, नंतर गटातटाचे बघू, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय गट एकत्रराष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. याचा फायदा उठविण्यासाठी भाजप, काँग्रेस, शेतकरी संघटना, महाडिक गट, नाईक गट एकत्र येऊन राष्ट्रवादीला खिंडीत अडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. काही गावातून राष्ट्रवादीचे नाराज गट या विरोधकांना सामील होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीतील सर्वच गटांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे. सरपंचपद पदरात पाडून घेण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी बहुतांशी गावातील कार्यकर्त्यांना गट विसरुन एकत्रित येण्याचा सल्ला दिला आहे. परंतु उमेदवारीबाबत कोणालाही बळजबरी केलेली नाही. राष्ट्रवादीची सर्वच ग्रामपंचायतीवर सत्ता राहील, याची काळजी घेण्यात आली आहे.- विजयबापू पाटील, अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी.