शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवा, नंतर गटा-तटाचं बघू--जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:08 IST

इस्लामपूर : काँग्रेस आघाडी शासनाच्या कारकीर्दीत गावपातळीवरील पदे मिळविण्यासाठी ‘जयंत एक्स्प्रेस’ खचाखच भरत होती.

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : काँग्रेस आघाडी शासनाच्या कारकीर्दीत गावपातळीवरील पदे मिळविण्यासाठी ‘जयंत एक्स्प्रेस’ खचाखच भरत होती. सत्ता गेल्यापासून राष्ट्रवादीचे काही डबे रिकामे झाले आहेत. त्यातच इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीला पराभव दाखवला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत सत्ता मिळवा, त्यानंतर गटा-तटाचं बघू, असा सल्ला आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

वाळवा तालुक्यात राजारामबापू उद्योग समूहामुळे राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. ग्रामीण भागासह इस्लामपूर, आष्टा शहरातील सहकारी संस्थांवर आमदार पाटील यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि माजी आमदार विलासराव शिंदे राष्ट्रवादीत असले तरी, त्यांच्याही सहकार आणि शिक्षण संस्था आहेत.

डांगे यांची ग्रामीण भागात सत्ताकेंद्रे नाहीत. शिंदे यांचा गट स्वतंत्रपणे कार्यरत आहे. त्यातच त्यांचे पुत्र वैभव शिंदे भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे आष्टा आणि परिसरातील कोरेगाव, बागणी, ढवळी, शिगाव, बहाद्दूरवाडी आदी गावातून राष्टÑवादीविरोधक टिमकी वाजवू लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादीमध्ये गटतटाचे राजकारण नेहमीच पेटलेले असते. त्याचा परिणाम आता ग्रामपंचायत निवडणुकीवर होणार असल्याने आमदार पाटील यांनी ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे.

आ. पाटील यांचे खंदे समर्थक पी. आर. पाटील (कुरळप), माणिकराव पाटील (बोरगाव), दिलीपराव पाटील (वाळवा), विनायकराव पाटील (ताकारी), रवींद्र बर्डे (वाटेगाव), जनार्दनकाका पाटील (कासेगाव), विजयबापू पाटील (साखराळे) या नेत्यांवर ग्रामपंचायत निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र बोरगावसारख्या ठिकाणी राज्य पातळीवरील नेते असलेल्या माणिकराव पाटील यांनाही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते चकवा देत आहेत. कोरेगाव येथे राष्ट्रवादीचे बी. के. पाटील आणि आर. के. पाटील हे दोन गट एकमेकांविरोधात नेहमीच असतात. उर्वरीत सर्वच गावांमध्ये राष्ट्रवादीचे एक, दोन आणि काही ठिकाणी तीन-तीन गट सक्रिय आहेत.

राष्ट्रवादीतील गटबाजी आणि भाजपने प्रत्येक गावात सुरु केलेला शिरकाव, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक यांचे गट यामुळे आमदार पाटील यांच्यापुढे निवडणुकीचे मोठे आव्हान उभे राहिले आहेत. यामुळे त्यांनी आधी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवा, नंतर गटातटाचे बघू, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय गट एकत्रराष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. याचा फायदा उठविण्यासाठी भाजप, काँग्रेस, शेतकरी संघटना, महाडिक गट, नाईक गट एकत्र येऊन राष्ट्रवादीला खिंडीत अडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. काही गावातून राष्ट्रवादीचे नाराज गट या विरोधकांना सामील होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीतील सर्वच गटांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे. सरपंचपद पदरात पाडून घेण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी बहुतांशी गावातील कार्यकर्त्यांना गट विसरुन एकत्रित येण्याचा सल्ला दिला आहे. परंतु उमेदवारीबाबत कोणालाही बळजबरी केलेली नाही. राष्ट्रवादीची सर्वच ग्रामपंचायतीवर सत्ता राहील, याची काळजी घेण्यात आली आहे.- विजयबापू पाटील, अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी.