शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

राज्यात पाच हजार कोटींचे कापड उत्पादन बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कडक निर्बंधांमुळे राज्यातील सुमारे १० लाख यंत्रमागांची धडधड बंद झाल्याने लॉकडाऊनच्या २१ दिवसांत यंत्रमागधारकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : कडक निर्बंधांमुळे राज्यातील सुमारे १० लाख यंत्रमागांची धडधड बंद झाल्याने लॉकडाऊनच्या २१ दिवसांत यंत्रमागधारकांना सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या सरासरी १७० कोटी मीटर कापड उत्पादनावर पाणी सोडावे लागले आहे. यंत्रमागावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या काम करणाऱ्या कामगारांची ३२५ कोटींची मजुरी बुडाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या २५० कोटींच्या जीएसटी महसुलावरही पाणी पडले आहे.

कोरोनामुळे लागलेल्या गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमधून जनजीवन सुरळीत होत असतानाच यंदा मार्चपासून पुन्हा दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवला आहे. त्यामुळे राज्यात सुरुवातीला १ एप्रिलपासून निर्बंध व १५ एप्रिलपर्यंतपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला. तो आता १५ मेपर्यंत वाढविला आहे. त्यामुळे जीवनावश्यक उत्पादने वगळता उद्योग बंद करावे लागले.

ज्या यंत्रमाग कारखान्यात कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे, त्यांना उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली. परंतु, राज्यातील विटा, मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी, सांगली या यंत्रमाग केंद्रांवरच्या १० लाख यंत्रमागांचा विचार करता कामगारांच्या निवासाची सोय केवळ दहा ते पंधरा टक्केच कारखान्यांकडे आहे. त्यामुळे सुमारे ८० ते ९० टक्के यंत्रमाग सध्या बंद आहेत. या बंदला शुक्रवारी २१ दिवस झाले.

अजून किती दिवस लॉकडाऊन राहील, हे सांगता येत नाही.

परंतु कापूस, जिनिंग, स्पिनींग, विव्हींग, प्रोसेसिंग, गारमेटिंग ही वस्त्रोद्योग साखळी ठप्प झाली आहे.

देशातील विकेंद्रित विभागात २० लाख यंत्रमाग असून त्यापैकी पन्नास टक्के म्हणजे १० लाख यंत्रमाग एकट्या महाराष्ट्रात आहेत. या २१ दिवसांत सुमारे १७० कोटी मीटर कापड उत्पादन होऊ शकले नाही. त्यामुळे पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे उत्पादन बुडाले आहे. या सर्व यंत्रमागांवर तीन लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामगारांचा रोजगार अवलंबून असून सुमारे ३२५ कोटीच्या रोजगारावर पाणी पडले आहे. केंद्र व राज्य शासनास पाच टक्के दराने मिळणारा २५० कोटी रूपयांचा जीएसटी महसूल मिळाला नाही. २१ दिवसांत वीज वापरापोटी ‘महावितरण’ला मिळणारे ५० कोटींचे वीजविक्रीचे बिल बुडाले आहे.

चौकट

राज्यातील सर्व यंत्रमाग लघुउद्योजकांनी शासनास व प्रशासनास सहकार्याची भूमिका घेतली आहे. या संकटातून बाहेर आल्यानंतर या लघुउद्योगासाठी विशेष सहाय्य योजना जाहीर केली तरच हा उद्योग पूर्वपदावर येईल.

- किरण तारळेकर, अध्यक्ष

विटा यंत्रमाग संघ, विटा