शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आधी धुराडी पेटणार, नंतर ऊस दर जाहीर

By admin | Updated: November 7, 2014 23:34 IST

साखर कारखानदारांची भूमिका : ‘एफआरपी’ देण्याची तयारी; केंद्र-राज्य शासनाकडून पॅकेजची अपेक्षा

अशोक डोंबाळे --सांगली --साखरेचे दर उतरल्यामुळे राज्य बँकेने साखर कारखान्यांंकडील साखरेचे मूल्यांकन कमी केले आहे. यामुळे कारखानदारांनी यंदा दर जाहीर करण्याची घाई केली नाही. आधी धुराडी पेटवून गळीत हंगाम सुरु करायचा आणि त्यानंतर दर जाहीर करण्याची भूमिका जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी घेतली आहे. बहुतांशी कारखानदारांनी ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, केंद्र आणि राज्य शासनाकडून पॅकेज मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.सध्या साखरेला प्रति क्विंटल दोन हजार ६५० ते दोन हजार ७०० रूपयांपर्यंत दर असल्याचे कारखानदार सांगत आहेत. साखरेचे दर उतरल्यामुळे राज्य बँकेने साखरेच्या प्रति क्विंटल पोत्याचे मूल्यांकन दोन हजार ६३० रूपये केले आहे. मूल्यांकनाच्या ८५ टक्केच कर्ज कारखानदारांना बँकेकडून मिळणार आहे. म्हणजेच राज्य बँकेकडून कर्जरूपाने कारखान्यांना प्रति क्विंटल साखरेला दोन हजार २३५ रूपये मिळणार आहेत. या रकमेतून कारखान्याचा प्रक्रिया खर्च वजा जाऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. या सर्व अडचणींमुळे साखर कारखानदारांना उसाला दर देणे खूपच कठीण झाले आहे. यातच केंद्रात आणि राज्यातही साखर कारखानदारांना पोषक असे सरकार नाही. सत्तेत असणाऱ्या प्रमुख नेत्यांचा कारखानदारीशी काहीच संबंध नाही. यामुळे गेल्या वर्षाच्या गळीत हंगामाप्रमाणे साखर निर्यातीला अनुदान, कर्जाचे व्याज माफी आदी पॅकेजही मिळणे कठीण झाले आहे. म्हणूनच साखर कारखानदारांनी दर जाहीर न करताच कारखान्यांची धुराडी पेटविण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांती, सोनहिरा, उदगिरी शुगर, विश्वासराव नाईक आदी कारखान्यांच्या गळितास प्रारंभ झाला आहे. ‘क्रांती’ने शुक्रवारपासून उसाच्या तोडीही सुरु केल्या आहेत. राजारामबापू साखर कारखान्याचाही १२ नोव्हेंबर रोजी गळीत हंगाम प्रारंभ होणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होणार आहेत. चार वर्षात प्रथमच दर जाहीर न करताच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होणार आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपीनुसार दर देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, याबद्दलची त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. केंद्र आणि राज्य शासनाकडून साखर उद्योगाबद्दल एखाद्या पॅकेजची घोषणा होणार का? याची कारखानदार वाट पाहत आहेत.करांच्या बंधनातून कारखाने मुक्त करासाखरेचे सातत्याने दर कमी होत असल्यामुळे ऊस उत्पादकांना दर देणे कठीण झाले आहे. केंद्र शासनाने अनुदान देऊन साखर निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध करांचा बोजा लादला आहे. या करांतून साखर उद्योग मुक्त करण्याची गरज आहे. तरच भविष्यात ऊस उत्पादकांना चांगला दर देणे शक्य होणार आहे. आम्ही काही प्रमाणात चांगला दर देऊ, पण दुष्काळी भागातील कारखान्यांना ते शक्य होणार नाही, असे मत राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.कारखानदारी वाचविण्यासाठी पॅकेजची गरजसाखरेच्या दराचे स्थिर भाव नसल्यामुळे कारखानदारी अडचणीत सापडली आहे. दिवसेंदिवस साखरेचे दर कमी होत असल्यामुळे कारखानदार चिंतेत सापडला आहे. याउलट शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही कमी दर देऊन चालत नाही. साखर उद्योग टिकला पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही चांगला दर हवा असेल, तर साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी शासनाने धोरण ठरविले पाहिजे. जाचक करांतून कारखाने मुक्त करून राज्य बँकेच्या कर्जामध्ये सवलत देण्याची नितांत गरज आहे. एफआरपीप्रमाणे तर दर दिलाच पाहिजे, अशी भूमिका क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांनी मांडली.साखरेच्या दरावर उसाचा दर ठरविणे ही कारखानदारांची भूमिकाच चुकीची आहे. वारंवार साखरेचे दर पडले, हे कारण त्यांनी सांगू नये. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना परवडेल असाच दर कारखान्याने दिला पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान स्वरुपात कारखान्यांना मदत करावी. - रघुनाथदादा पाटीलशेतकरी संघटना