शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

आधी धुराडी पेटणार, नंतर ऊस दर जाहीर

By admin | Updated: November 7, 2014 23:34 IST

साखर कारखानदारांची भूमिका : ‘एफआरपी’ देण्याची तयारी; केंद्र-राज्य शासनाकडून पॅकेजची अपेक्षा

अशोक डोंबाळे --सांगली --साखरेचे दर उतरल्यामुळे राज्य बँकेने साखर कारखान्यांंकडील साखरेचे मूल्यांकन कमी केले आहे. यामुळे कारखानदारांनी यंदा दर जाहीर करण्याची घाई केली नाही. आधी धुराडी पेटवून गळीत हंगाम सुरु करायचा आणि त्यानंतर दर जाहीर करण्याची भूमिका जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी घेतली आहे. बहुतांशी कारखानदारांनी ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, केंद्र आणि राज्य शासनाकडून पॅकेज मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.सध्या साखरेला प्रति क्विंटल दोन हजार ६५० ते दोन हजार ७०० रूपयांपर्यंत दर असल्याचे कारखानदार सांगत आहेत. साखरेचे दर उतरल्यामुळे राज्य बँकेने साखरेच्या प्रति क्विंटल पोत्याचे मूल्यांकन दोन हजार ६३० रूपये केले आहे. मूल्यांकनाच्या ८५ टक्केच कर्ज कारखानदारांना बँकेकडून मिळणार आहे. म्हणजेच राज्य बँकेकडून कर्जरूपाने कारखान्यांना प्रति क्विंटल साखरेला दोन हजार २३५ रूपये मिळणार आहेत. या रकमेतून कारखान्याचा प्रक्रिया खर्च वजा जाऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. या सर्व अडचणींमुळे साखर कारखानदारांना उसाला दर देणे खूपच कठीण झाले आहे. यातच केंद्रात आणि राज्यातही साखर कारखानदारांना पोषक असे सरकार नाही. सत्तेत असणाऱ्या प्रमुख नेत्यांचा कारखानदारीशी काहीच संबंध नाही. यामुळे गेल्या वर्षाच्या गळीत हंगामाप्रमाणे साखर निर्यातीला अनुदान, कर्जाचे व्याज माफी आदी पॅकेजही मिळणे कठीण झाले आहे. म्हणूनच साखर कारखानदारांनी दर जाहीर न करताच कारखान्यांची धुराडी पेटविण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांती, सोनहिरा, उदगिरी शुगर, विश्वासराव नाईक आदी कारखान्यांच्या गळितास प्रारंभ झाला आहे. ‘क्रांती’ने शुक्रवारपासून उसाच्या तोडीही सुरु केल्या आहेत. राजारामबापू साखर कारखान्याचाही १२ नोव्हेंबर रोजी गळीत हंगाम प्रारंभ होणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होणार आहेत. चार वर्षात प्रथमच दर जाहीर न करताच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होणार आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपीनुसार दर देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, याबद्दलची त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. केंद्र आणि राज्य शासनाकडून साखर उद्योगाबद्दल एखाद्या पॅकेजची घोषणा होणार का? याची कारखानदार वाट पाहत आहेत.करांच्या बंधनातून कारखाने मुक्त करासाखरेचे सातत्याने दर कमी होत असल्यामुळे ऊस उत्पादकांना दर देणे कठीण झाले आहे. केंद्र शासनाने अनुदान देऊन साखर निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध करांचा बोजा लादला आहे. या करांतून साखर उद्योग मुक्त करण्याची गरज आहे. तरच भविष्यात ऊस उत्पादकांना चांगला दर देणे शक्य होणार आहे. आम्ही काही प्रमाणात चांगला दर देऊ, पण दुष्काळी भागातील कारखान्यांना ते शक्य होणार नाही, असे मत राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.कारखानदारी वाचविण्यासाठी पॅकेजची गरजसाखरेच्या दराचे स्थिर भाव नसल्यामुळे कारखानदारी अडचणीत सापडली आहे. दिवसेंदिवस साखरेचे दर कमी होत असल्यामुळे कारखानदार चिंतेत सापडला आहे. याउलट शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही कमी दर देऊन चालत नाही. साखर उद्योग टिकला पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही चांगला दर हवा असेल, तर साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी शासनाने धोरण ठरविले पाहिजे. जाचक करांतून कारखाने मुक्त करून राज्य बँकेच्या कर्जामध्ये सवलत देण्याची नितांत गरज आहे. एफआरपीप्रमाणे तर दर दिलाच पाहिजे, अशी भूमिका क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांनी मांडली.साखरेच्या दरावर उसाचा दर ठरविणे ही कारखानदारांची भूमिकाच चुकीची आहे. वारंवार साखरेचे दर पडले, हे कारण त्यांनी सांगू नये. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना परवडेल असाच दर कारखान्याने दिला पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान स्वरुपात कारखान्यांना मदत करावी. - रघुनाथदादा पाटीलशेतकरी संघटना