शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

वित्त आयोगाचा निधी लाटल्यावरून गोंधळ

By admin | Updated: July 31, 2014 00:06 IST

जिल्हा परिषद सभा : काँग्रेस सदस्यांच्या आरोपाने पदाधिकारी संतप्त, आयत्यावेळच्या विषयात गोलमालचा आरोप

सांगली : जिल्हा परिषदेला तेराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीवरील व्याजाची रक्कम सदस्यांना विश्वासात न घेताच पदाधिकारी आणि राष्ट्रवादी सदस्यांनी लाटल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य सूर्यकांत मुटेकर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला. यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. सदस्यांच्या आरोपावरून पदाधिकाऱ्यांचा पाराही वाढला. अध्यक्ष, उपाध्यक्षांनी आम्ही तो निधी विकास कामांवर खर्च केला असून, तो लाटला नसल्याचे सांगितले. अध्यक्ष देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेत काँग्रेसचे मुटेकर म्हणाले की, तेराव्या वित्त आयोगातील निधीवरील व्याजाची रक्कम विकास कामासाठी सर्व सदस्यांना देण्याचा निर्णय झाला होता. तरीही तो निधी खर्च करताना आम्हाला विश्वासात का घेतले नाही. तो निधी परस्पर पदाधिकारी आणि काही मोजक्याच सदस्यांनी का लाटला, असा सवाल करून पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर देवराज पाटील, बसवराज पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून ‘लाटले’ या शब्दावर आक्षेप घेतला. आमच्या घरात निधी खर्च केला नाही. सदस्यांनी जपून शब्द वापरावेत, असे त्यांनी सुनावले. राष्ट्रवादी सदस्यांनीही या शब्दावरून काँग्रेसच्या सदस्यांवर टीका केली. शेवटी सदस्य रणधीर नाईक यांनी हस्तक्षेप केला. मुटेकर यांना शब्दश: कोंडीत पकडू नका, त्यांची भावना समजून घ्या, असे आवाहन करून वादावर पडदा टाकला. पवित्रा बरगाले यांनीही याच विषयावरून जाब विचारला. सभेत आयत्यावेळी विषय घुसडून गोलमाल केला जात असल्याचा आरोप सुरेश मोहिते यांनी केला. तसेच जिल्हा परिषद मालकीच्या ६६ जागांपैकी १७ ठिकाणांची अतिक्रमणे काढली नाहीत. याबद्दल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही सदस्यांनी केला.रणधीर नाईक यांनी ग्रामपंचायतीच्या दफ्तरांची वर्षानुवर्षे तपासणीच होत नाही. म्हणूनच लाखो रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी सांगितले की, तपासणी होती का नाही, याची माहिती घेतली जाईल. विस्तार अधिकारी तपासणी करणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती नेमली जाते. पण, चौकशीच वेळेत होत नाही. अपहाराची रक्कमही वसूल होत नसल्यामुळे घोटाळे करणाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुशच राहिला नसल्याचा आरोपही रणधीर नाईक, सुरेश मोहिते यांनी केला. यावर लोखंडे यांनी, तांदुळवाडी पाणी योजनेतील घोटाळा, येळावी (ता. तासगाव) येथील मृतांच्या नावावर लाभ दिल्याचे प्रकरण व पशुसंवर्धन विभागातील औषध साठ्याप्रकरणी केलेल्या कारवाईचा दाखला दिला. (प्रतिनिधी)