शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

सर्कल आणि तलाठी यांच्यात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:24 IST

इस्लामपूर : उरुण परिसरातील चावडीमध्ये असणारे सर्कल आणि तलाठी यांच्यात वाद उफाळला आहे. या दोघांमध्ये रोजच वादावादी सुरू ...

इस्लामपूर : उरुण परिसरातील चावडीमध्ये असणारे सर्कल आणि तलाठी यांच्यात वाद उफाळला आहे. या दोघांमध्ये रोजच वादावादी सुरू असते. एकेदिवशी तर चक्क दोघे एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडला. याची तक्रारही सामाजिक कार्यकर्ते अंगराज पाटील यांनी आणि अंकुश जाधव यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याकडे केली. तरीसुद्धा या चावडीत या दोघांमध्ये नेहमीच वादावादी होत असल्याने शासकीय कामावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

या दोघांच्या वादामुळे बहुतांश दिवस हे तलाठी महाशय कार्यालयाकडे फिरकतसुद्धा नाहीत. सोमवार, दि. २१ डिसेंबर रोजी असाच प्रकार घडला. बरेच शेतकरी आपले शासकीय उतारे आणण्यासाठी तलाठी कार्यालयात तलाठी महाशयांची वाट बघत थांबले होते. याबाबत शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते अंकुश जाधव यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी पाटील यांनी, त्यांचा वाद मिटवला आहे, ते कार्यालयात येतील. परंतु हे तलाठी महाशय त्यादिवशी फिरकलेच नाहीत. तलाठी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला तरी ते फोन घेत नव्हते. अशा घटना वारंवार घडत आहेत. या दोघांच्या वादामुळे त्यांच्या हाताखाली काम करणारे झिरो कर्मचारीही निघून जातात. त्यामुळे सात-बारा नोंदी आदी कागदपत्रे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागतात, तर काही शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी दिसत नाहीत. याचे कारण विचारले असता, मागच्या तलाठ्यांनी केलेल्या त्या चुका आहेत, त्यांना विचारा, असे उद्धट उत्तर दिले जाते. तरी लोकप्रतिनिधी या नात्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीच याची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.