शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पन्नास हजारावर मराठा बांधव सहभागी होणार

By admin | Updated: September 13, 2016 00:50 IST

कवठेमहांकाळ येथील बैठकीत निर्णय : २७ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील सिद्धनाथ मल्टिपर्पज हॉलमध्ये २७ सप्टेंबरच्या मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चेबांधणीसाठी मराठा समाजबांधवांची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत कवठेमहांकाळ तालुक्यातून ५० हजारांवर मराठा बांधव जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे. २७ सप्टेंबरचा मोर्चा यशस्वी करण्याचाही निर्धार करण्यात आला. या बैठकीला २ हजारावर मराठा समाजबांधव जमले होते.कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील घटनेचे संपूर्ण राज्यभर मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चा २७ सप्टेंबरला निघणार आहे. या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुका मराठा समाजबांधवांची बैठक येथे पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून बैठकीला सुरुवात झाली. प्रत्येक गावातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करून, गावातील मराठा समाजाच्या घरा-घरातून किमान एक तरी मराठा समाजबांधव मराठा क्रांती मोर्चासाठी आणण्याचा निर्धार करण्यात आला. या मराठा क्रांती मोर्चासाठी जास्तीत जास्त महिला वर्ग कसा येईल, याकडेही लक्ष दिले जाणार आहे. पक्ष, संघटना बाजूला ठेवून ‘एक दिवस आपल्या समाजासाठी, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले व तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने मराठा समाज कसा क्रांती मोर्चासाठी सांगलीला येईल, याचे नियोजन करण्यात आले.प्रत्येक मराठा समाजबांधवाने व तरुणांनी २७ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मराठा आरक्षण, शैक्षणिक सुविधा आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी डॉ. संजय पाटील यांनी, मराठा बांधवांनी मोर्चामध्ये आचारसंहितेचे पालन करायचे आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेण्याची आहे. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.आर. एस. पवार, महादेव साळुंखे, महेश खराडे, प्रणिता पवार, भारत डुबुले, रमेश भोसले, वैशाली पाटील, अनिल शिंदे यांच्यासह अनेक मराठा बांधवांनी बैठकीत मनोगत व्यक्त केले. मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही मान्यवरांनी केले.या बैठकीसाठी जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश पाटील, जि. प. माजी सभापती दत्तात्रय पाटील, भानुदास पाटील, आप्पासाहेब शिंदे, जनार्दन पाटील, सम्राट भोसले, नारायण पवार, एम. के. पाटील, युवराज जगदाळे, शिवसेनेचे अनिल पाटील, किशोर पाटील, शिवाजी बोराडे, बाळासाहेब पाटील, रणजित घाडगे, विशाल शिंदे, तुकाराम पाटील, ऋतुराज पवार, दिलीप पाटील, उषा पाटील, अविराजे शिंदे, शोभा पवार आदींसह मराठा समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)व्यापार बंद ठेवावामराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी तालुक्यातील मराठा बांधवांनी, मराठा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, तसेच शाळा, महाविद्यालये यांनाही सुटी देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले.मराठा बांधवांनी मोर्चामध्ये आचारसंहितेचे पालन करायचे आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.