शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

शेतकऱ्यांनी पर्यायी पीकपद्धतीचा अवलंब करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST

विटा : पारंपरिक पिकांना फाटा देऊन कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचा शेतकऱ्यांनी विचार करावा. जैवइंधन आणि सेंद्रीय खतनिर्मिती ...

विटा : पारंपरिक पिकांना फाटा देऊन कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचा शेतकऱ्यांनी विचार करावा. जैवइंधन आणि सेंद्रीय खतनिर्मिती करणारा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प मंगरूळ येथे उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले.

मंगरूळ (ता. खानापूर) येथे सयाजीनंद अ‍ॅग्रो प्रोड्युसरच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पहिल्या जैवइंधन व सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार बाबर बोलत होते. यावेळी कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष अशोकराव शिंदे, कार्यकारी संचालक राहुल शिंदे, पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, बाजार समितीचे सभापती राहुल साळुंखे, कृषी अधिकारी प्रकाश कुंभार, एम.सी.एल.चे वैभव चव्हाण, अजित पाटील उपस्थित होते.

आमदार अनिल बाबर म्हणाले, शेतात पाणी आल्यानंतर जिरायत जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी धडपडत असतात. सध्या ऊस, द्राक्ष, फळबागा यांकडे जास्त कल दिसत आहे. उसाला केंद्र सरकार अनुदान देत असल्याने साखर उत्पादन होत आहे. आपल्यापेक्षा परदेशातील साखर स्वस्त मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसपिकासह फळबागांना पर्याय शोधला पाहिजे.

अशोकराव शिंदे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी वैभव चव्हाण, प्रकाश कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंदराव शेळके, बाळासाहेब जाधव, आनंदराव सुर्वे, अविनाश जाधव, रवींद्र शिंदे, शिवाजी पवार, अजित साळुंखे, नामदेव जाधव उपस्थित होते. कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी आभार मानले.

फोटो - ०३०७२०२१-विटा-मंगरूळ : खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथे सांगली जिल्ह्यातील पहिल्या जैवइंधन निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार अनिल बाबर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अशोकराव शिंदे, सभापती महावीर शिंदे, वैभव चव्हाण, राहुल साळुंखे उपस्थित होते.