शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
4
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
5
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
6
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
7
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
8
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
9
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
10
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
11
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
12
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
13
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
14
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
15
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
16
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
17
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
18
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
19
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
20
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?

शेतकऱ्यांचा प्रतिसाद, कारखानदारांचा ठेंगा

By admin | Updated: January 17, 2016 00:36 IST

म्हैसाळ योजनेची स्थिती : वसुलीस प्रतिसाद वाढणे आवश्यक, आवर्तनाची अनिश्चितता कायम

सांगली : जिल्ह्याच्या पूर्वभागातील टंचाईग्रस्त भागासाठी वरदायी असलेल्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न अजून तरी अधांतरीच आहे. गेल्या आठवड्यात खासदारांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली असताना, साखर कारखानदारांनी मात्र रक्कम भरण्यास ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून पाणी सुटण्याची धाकधूक कायम आहे. दरम्यान, प्रशासनाने सुरु केलेल्या वसुली मोहिमेस प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसात २ लाख ७५ हजाराची वसुली झाली आहे. मिरज पूर्वभागासह कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील टंचाई परिस्थिती गंभीर रूप धारण करत असून, केवळ शेतीलाच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार पाटील आणि जिल्हाधिकारी गायकवाड यांनी पुढाकार घेत मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यात बैठका घेतल्या. शेतकऱ्यांना थकबाकी भरण्यासाठी आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनाही वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याबरोबरच थकबाकी पैकी ५ कोटी २५ लाखांची थकबाकी कारखानदारांनी भरावी व त्यांनी त्याची वसुली शेतकऱ्यांकडून करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे बैठकीस उपस्थित कारखानदारांच्या प्रतिनिधींनी दोन दिवसात ठरवून दिलेली रक्कम भरण्याचे आश्वासन दिले होते मात्र, यास पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरीही अजून प्रतिसाद न मिळाल्याने या रकमेची वसुली कशी करायची, हा प्रश्नच आहे. बैठकीनंतर दोन दिवसात पैसे भरण्याचा शब्द देणाऱ्या कारखानदारांनी आता यात वेगवेगळे मत मांडण्यास सुरुवात केल्याने खासदारांच्या या मध्यस्थीला अपयश आल्याचेच चित्र आहे. म्हैसाळ योजनेच्या क्षेत्रात उसाचे क्षेत्र कमी असून, याउलट द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक असल्याचा युक्तिवाद आता कारखानदार करु लागल्याने थकबाकी भरण्यासाठी मोठ्या रकमेचा भार उचलणारे कारखानदार चालढकल करत असल्याचेच स्पष्ट झाले आहे. या विषयावर म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रातील पाच कारखानदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, महांकालीचे अध्यक्ष विजय सगरे, मनोज शिंदे वगळता इतरांशी संपर्क होऊ शकला नाही. राजकारण नेत्यांचे : भरडणे जनतेचे... केवळ कारखानदारच नव्हे, तर या भागातील राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांचा फटकाही आता योजनेस बसू लागला आहे. खासदार आणि भाजपच्यावतीने वसुलीसाठी प्रयत्न चालवले असतानाच राष्ट्रवादीने मात्र शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुलीस कडाडून विरोध केल्याने थकबाकी वसुलीचे भिजत घोंगडे कायम राहिल्याचे चित्र आहे. यात सर्वसामान्य शेतकरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत असलेले ग्रामस्थ भरडत चालले आहेत. मालगाव, बेडग, बेळंकीतून वसुली या साऱ्या घडामोडीत प्रशासनाने मात्र आपल्यापरीने वसुलीस सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून मिरज पूर्वभागात वसुलीस सुरुवात झाली असून, पूर्व भागातील मालगाव, बेडग आणि बेळंकी या गावात वसुलीस चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसात २ लाख ७५ हजारांची वसुली झाल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.  

ताकारी योजनेसाठीचे नियम अथवा वसुलीची पध्दत म्हैसाळ योजनेला लावणे चुकीचे आहे. कारण म्हैसाळ योजनेच्या क्षेत्रात केवळ ३५ टक्के उसाचे क्षेत्र असून, ६५ टक्के इतर पिके घेतली जातात. तरीही बैठकीत ठरल्याप्रमाणे थकबाकीच्या रकमेबाबत काय करावयाचे, याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु व्हावे, ही सर्वांचीच इच्छा आहे. -विजय सगरे, अध्यक्ष, महांकाली साखर कारखाना, कवठेमहांकाळ शनिवारी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची भेट घेऊन म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांनी केवळ वीजबिल भरण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. पाणीपट्टीची रक्कम पूर्णपणे माफ करावी, अशी आम्ही मागणी केली असून, त्याचा विचार करण्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले आहे. यावर्षीच्या आवर्तनासाठी त्यांनी विजबिलाची रक्कम भरावी, असे आवाहन केले असून, त्यास अनुसरुन तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांची लवकरच बैठक घेणार असून, त्यात शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांवर कोणताही जादा भार न पडता पूर्वीप्रमाणेच पाणी मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. -आमदार सुमनताई पाटील