शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

शेतकऱ्यांचा प्रतिसाद, कारखानदारांचा ठेंगा

By admin | Updated: January 17, 2016 00:36 IST

म्हैसाळ योजनेची स्थिती : वसुलीस प्रतिसाद वाढणे आवश्यक, आवर्तनाची अनिश्चितता कायम

सांगली : जिल्ह्याच्या पूर्वभागातील टंचाईग्रस्त भागासाठी वरदायी असलेल्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न अजून तरी अधांतरीच आहे. गेल्या आठवड्यात खासदारांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली असताना, साखर कारखानदारांनी मात्र रक्कम भरण्यास ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून पाणी सुटण्याची धाकधूक कायम आहे. दरम्यान, प्रशासनाने सुरु केलेल्या वसुली मोहिमेस प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसात २ लाख ७५ हजाराची वसुली झाली आहे. मिरज पूर्वभागासह कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील टंचाई परिस्थिती गंभीर रूप धारण करत असून, केवळ शेतीलाच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार पाटील आणि जिल्हाधिकारी गायकवाड यांनी पुढाकार घेत मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यात बैठका घेतल्या. शेतकऱ्यांना थकबाकी भरण्यासाठी आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनाही वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याबरोबरच थकबाकी पैकी ५ कोटी २५ लाखांची थकबाकी कारखानदारांनी भरावी व त्यांनी त्याची वसुली शेतकऱ्यांकडून करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे बैठकीस उपस्थित कारखानदारांच्या प्रतिनिधींनी दोन दिवसात ठरवून दिलेली रक्कम भरण्याचे आश्वासन दिले होते मात्र, यास पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरीही अजून प्रतिसाद न मिळाल्याने या रकमेची वसुली कशी करायची, हा प्रश्नच आहे. बैठकीनंतर दोन दिवसात पैसे भरण्याचा शब्द देणाऱ्या कारखानदारांनी आता यात वेगवेगळे मत मांडण्यास सुरुवात केल्याने खासदारांच्या या मध्यस्थीला अपयश आल्याचेच चित्र आहे. म्हैसाळ योजनेच्या क्षेत्रात उसाचे क्षेत्र कमी असून, याउलट द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक असल्याचा युक्तिवाद आता कारखानदार करु लागल्याने थकबाकी भरण्यासाठी मोठ्या रकमेचा भार उचलणारे कारखानदार चालढकल करत असल्याचेच स्पष्ट झाले आहे. या विषयावर म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रातील पाच कारखानदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, महांकालीचे अध्यक्ष विजय सगरे, मनोज शिंदे वगळता इतरांशी संपर्क होऊ शकला नाही. राजकारण नेत्यांचे : भरडणे जनतेचे... केवळ कारखानदारच नव्हे, तर या भागातील राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांचा फटकाही आता योजनेस बसू लागला आहे. खासदार आणि भाजपच्यावतीने वसुलीसाठी प्रयत्न चालवले असतानाच राष्ट्रवादीने मात्र शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुलीस कडाडून विरोध केल्याने थकबाकी वसुलीचे भिजत घोंगडे कायम राहिल्याचे चित्र आहे. यात सर्वसामान्य शेतकरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत असलेले ग्रामस्थ भरडत चालले आहेत. मालगाव, बेडग, बेळंकीतून वसुली या साऱ्या घडामोडीत प्रशासनाने मात्र आपल्यापरीने वसुलीस सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून मिरज पूर्वभागात वसुलीस सुरुवात झाली असून, पूर्व भागातील मालगाव, बेडग आणि बेळंकी या गावात वसुलीस चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसात २ लाख ७५ हजारांची वसुली झाल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.  

ताकारी योजनेसाठीचे नियम अथवा वसुलीची पध्दत म्हैसाळ योजनेला लावणे चुकीचे आहे. कारण म्हैसाळ योजनेच्या क्षेत्रात केवळ ३५ टक्के उसाचे क्षेत्र असून, ६५ टक्के इतर पिके घेतली जातात. तरीही बैठकीत ठरल्याप्रमाणे थकबाकीच्या रकमेबाबत काय करावयाचे, याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु व्हावे, ही सर्वांचीच इच्छा आहे. -विजय सगरे, अध्यक्ष, महांकाली साखर कारखाना, कवठेमहांकाळ शनिवारी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची भेट घेऊन म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांनी केवळ वीजबिल भरण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. पाणीपट्टीची रक्कम पूर्णपणे माफ करावी, अशी आम्ही मागणी केली असून, त्याचा विचार करण्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले आहे. यावर्षीच्या आवर्तनासाठी त्यांनी विजबिलाची रक्कम भरावी, असे आवाहन केले असून, त्यास अनुसरुन तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांची लवकरच बैठक घेणार असून, त्यात शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांवर कोणताही जादा भार न पडता पूर्वीप्रमाणेच पाणी मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. -आमदार सुमनताई पाटील