शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

शेतकरी हसले; मार्केट रुसले

By admin | Updated: June 30, 2016 00:04 IST

निर्बंध उठविल्यानंतरचे चित्र : अंमलबजावणीसाठी शेतकरी संघटना न्यायालयात जाणार

सांगली : शेतीमालावरील निर्बंध उठविण्याचे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. उशिरा का होईना त्यांनी निर्बंध उठविल्याबद्दल शेतकरी, ग्राहकांनी स्वागत केले आहे. पुन्हा मंत्री समिती नेमल्यामुळे सरकारला निर्णय बदलण्यास संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकरी, ग्राहकांनी केली आहे. शेतकरी संघटनांनी तर अंमलबाजवणीसाठी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. काही मोजक्या व्यापाऱ्यांनी मात्र निर्णयास विरोध केला आहे. (प्रतिनिधी)मान्यवरांच्या प्रतिक्रियाकायद्याने शेतीमालावरील निर्बंध उठविणे बंधनकारक होते. तरीही सरकारने बंदी उठविण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी गेला. निर्बंध उठविल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु, यासाठी पुन्हा मंत्री समिती नेमण्याची गरजच नव्हती. म्हणूनच या सरकारविरोधात पुन्हा न्यायालयातच आम्हाला जावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पैशाची लूट होत आहे.- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.मुख्यमंत्री, पणनमंत्री यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. शेतकऱ्यांमार्फत त्यांचे आभार मानतो. २८ राज्यांचा अभ्यास केला. यावेळी अडत खरेदीदारांकडूनच घेतली जात होती. काही राज्यांत अडत घेतलीच जात नाही. मग, महाराष्ट्रातच असे निर्बंध का? याचा अभ्यास केला. यातूनच महाराष्ट्रातील शेतीमालावरील निर्बंध उठविले आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.- सदाभाऊ खोत, आमदार.शरद जोशी यांनी अनेक वर्षांपासून शेतीमाल नियमनमुक्त करण्याची मागणी केली होती. या प्रश्नावर आंदोलनेही केली होती. अखेर सरकारने शेतीमालावरील निर्बंध उठवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शासनाने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा त्यासाठी आम्हाला पुन्हा आंदोलने करावी लागतील.- संजय कोले, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना युवा आघाडी.केंद्र शासनाच्या योजनानुसार हा बदल आहे. या बदलामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना थोडा त्रास होईल. परंतु, त्यानंतर त्यांना चांगलाच फायदा होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. यामध्ये बाजार समित्यांचेच नुकसान आहे. ग्राहकांच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर निर्णय आहे. याचे आम्ही स्वागत करतो.- मनोहर सारडा, माजी अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली.शासनाने शेतकरी आणि ग्राहकांच्यादृष्टीने चांगला निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा चांगला व दर्जेदार माल बाजारपेठेत येण्यास मदत होणार आहे. यामुळे ग्राहकांना चांगला आणि कमी किमतीत माल मिळण्यास मदत होणार आहे. दलालांकडून शेतकरी आणि ग्राहकांची मध्येच आर्थिक लूट होत होती, ती थांबण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी मात्र बाजारपेठेपर्यंत माल आणण्यासाठी प्रयत्न करावेत.-डॉ. ज्ञानचंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत.शेतकऱ्यांच्या मालाला बाजार समित्याची हमी होती. बाजार समितीच्या परिसरात शेतीमाल आल्यानंतर तेथे घेणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागत होती. यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता. पैशाचीही हमी होती. निर्बंध उठल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमी राहणार नाही. व्यापाऱ्यांकडून पैसे बुडविले जाण्याची शक्यता असून, तशा घटना द्राक्ष, डाळिंब बागायतदारांबाबतीत घडत आहेत.-अभय मगदूम, माजी अध्यक्ष, अडत व्यापारी असोसिएशन, सांगली.