शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हसले; मार्केट रुसले

By admin | Updated: June 30, 2016 00:04 IST

निर्बंध उठविल्यानंतरचे चित्र : अंमलबजावणीसाठी शेतकरी संघटना न्यायालयात जाणार

सांगली : शेतीमालावरील निर्बंध उठविण्याचे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. उशिरा का होईना त्यांनी निर्बंध उठविल्याबद्दल शेतकरी, ग्राहकांनी स्वागत केले आहे. पुन्हा मंत्री समिती नेमल्यामुळे सरकारला निर्णय बदलण्यास संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकरी, ग्राहकांनी केली आहे. शेतकरी संघटनांनी तर अंमलबाजवणीसाठी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. काही मोजक्या व्यापाऱ्यांनी मात्र निर्णयास विरोध केला आहे. (प्रतिनिधी)मान्यवरांच्या प्रतिक्रियाकायद्याने शेतीमालावरील निर्बंध उठविणे बंधनकारक होते. तरीही सरकारने बंदी उठविण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी गेला. निर्बंध उठविल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु, यासाठी पुन्हा मंत्री समिती नेमण्याची गरजच नव्हती. म्हणूनच या सरकारविरोधात पुन्हा न्यायालयातच आम्हाला जावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पैशाची लूट होत आहे.- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.मुख्यमंत्री, पणनमंत्री यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. शेतकऱ्यांमार्फत त्यांचे आभार मानतो. २८ राज्यांचा अभ्यास केला. यावेळी अडत खरेदीदारांकडूनच घेतली जात होती. काही राज्यांत अडत घेतलीच जात नाही. मग, महाराष्ट्रातच असे निर्बंध का? याचा अभ्यास केला. यातूनच महाराष्ट्रातील शेतीमालावरील निर्बंध उठविले आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.- सदाभाऊ खोत, आमदार.शरद जोशी यांनी अनेक वर्षांपासून शेतीमाल नियमनमुक्त करण्याची मागणी केली होती. या प्रश्नावर आंदोलनेही केली होती. अखेर सरकारने शेतीमालावरील निर्बंध उठवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शासनाने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा त्यासाठी आम्हाला पुन्हा आंदोलने करावी लागतील.- संजय कोले, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना युवा आघाडी.केंद्र शासनाच्या योजनानुसार हा बदल आहे. या बदलामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना थोडा त्रास होईल. परंतु, त्यानंतर त्यांना चांगलाच फायदा होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. यामध्ये बाजार समित्यांचेच नुकसान आहे. ग्राहकांच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर निर्णय आहे. याचे आम्ही स्वागत करतो.- मनोहर सारडा, माजी अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली.शासनाने शेतकरी आणि ग्राहकांच्यादृष्टीने चांगला निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा चांगला व दर्जेदार माल बाजारपेठेत येण्यास मदत होणार आहे. यामुळे ग्राहकांना चांगला आणि कमी किमतीत माल मिळण्यास मदत होणार आहे. दलालांकडून शेतकरी आणि ग्राहकांची मध्येच आर्थिक लूट होत होती, ती थांबण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी मात्र बाजारपेठेपर्यंत माल आणण्यासाठी प्रयत्न करावेत.-डॉ. ज्ञानचंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत.शेतकऱ्यांच्या मालाला बाजार समित्याची हमी होती. बाजार समितीच्या परिसरात शेतीमाल आल्यानंतर तेथे घेणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागत होती. यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता. पैशाचीही हमी होती. निर्बंध उठल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमी राहणार नाही. व्यापाऱ्यांकडून पैसे बुडविले जाण्याची शक्यता असून, तशा घटना द्राक्ष, डाळिंब बागायतदारांबाबतीत घडत आहेत.-अभय मगदूम, माजी अध्यक्ष, अडत व्यापारी असोसिएशन, सांगली.