शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन व्यापारी पुरस्कृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST

इस्लामपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे व्यापारी पुरस्कृत आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. नव्या ...

इस्लामपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे व्यापारी पुरस्कृत आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतमाल कोठेही विकता येतो. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन हे केवळ राजकीय नाट्य असून, त्यामध्ये शेतकरी हिताचा विचार नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्य व देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, यासाठी २८ नोव्हेंबरपासून रघुनाथ पाटील यांनी सुरू केलेली जनप्रबोधन यात्रा आज वाळवा तालुक्यात आली होती. क्रांतिसिंह नाना पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, हणमंतराव पाटील, इकबाल जमादार उपस्थित होते.

पाटील म्हणाले, सरकार, कारखानदार आणि राजू शेट्टी, सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्यांनी एकमेकांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. ऊस उताऱ्यात २ टक्के आणि उतारा काढण्याच्या पद्धतीत १ टक्का चोरी करून शेतकऱ्याचे टनामागे ८५५ रुपयांचे नुकसान केले आहे. तोडणी वाहतुकीत ४०० रुपयांची लूट होते. तसेच कारखान्यात तयार होणारा उपपदार्थांचा हिशेब केल्यास ४ हजार रुपयांहून अधिक दर मिळू शकतो. मात्र शेट्टी, खोत या नेत्यांनी २८५० च्यावर एफआरपी न मागण्याचे पाप केले आहे. ते म्हणाले, शेतमालाला उत्पादन खर्चावर रास्तभाव मिळायला हवा. पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याची निव्वळ घोषणा केली. त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनीच आता शेतमालाचा रास्त भाव पाहिजे का नको? हे ठरवायला हवे. राज्यातील आमदार, खासदारच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यासाठी जबाबदार आहेत. शेतकऱ्यांच्या चोऱ्या कोण करतंय, हे दाखविण्यासाठीच ही प्रबोधन यात्रा सुरू आहे.

यावेळी माणिकराव पाटील, धनपाल माळी, शंकरराव मोहिते, अविनाश पाटील, सर्जेराव पाटील, मारुतराव राठोड, राधाकिसन गडदे उपस्थित होते.