शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन व्यापारी पुरस्कृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST

इस्लामपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे व्यापारी पुरस्कृत आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. नव्या ...

इस्लामपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे व्यापारी पुरस्कृत आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतमाल कोठेही विकता येतो. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन हे केवळ राजकीय नाट्य असून, त्यामध्ये शेतकरी हिताचा विचार नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्य व देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, यासाठी २८ नोव्हेंबरपासून रघुनाथ पाटील यांनी सुरू केलेली जनप्रबोधन यात्रा आज वाळवा तालुक्यात आली होती. क्रांतिसिंह नाना पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, हणमंतराव पाटील, इकबाल जमादार उपस्थित होते.

पाटील म्हणाले, सरकार, कारखानदार आणि राजू शेट्टी, सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्यांनी एकमेकांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. ऊस उताऱ्यात २ टक्के आणि उतारा काढण्याच्या पद्धतीत १ टक्का चोरी करून शेतकऱ्याचे टनामागे ८५५ रुपयांचे नुकसान केले आहे. तोडणी वाहतुकीत ४०० रुपयांची लूट होते. तसेच कारखान्यात तयार होणारा उपपदार्थांचा हिशेब केल्यास ४ हजार रुपयांहून अधिक दर मिळू शकतो. मात्र शेट्टी, खोत या नेत्यांनी २८५० च्यावर एफआरपी न मागण्याचे पाप केले आहे. ते म्हणाले, शेतमालाला उत्पादन खर्चावर रास्तभाव मिळायला हवा. पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याची निव्वळ घोषणा केली. त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनीच आता शेतमालाचा रास्त भाव पाहिजे का नको? हे ठरवायला हवे. राज्यातील आमदार, खासदारच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यासाठी जबाबदार आहेत. शेतकऱ्यांच्या चोऱ्या कोण करतंय, हे दाखविण्यासाठीच ही प्रबोधन यात्रा सुरू आहे.

यावेळी माणिकराव पाटील, धनपाल माळी, शंकरराव मोहिते, अविनाश पाटील, सर्जेराव पाटील, मारुतराव राठोड, राधाकिसन गडदे उपस्थित होते.