शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन व्यापारी पुरस्कृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST

इस्लामपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे व्यापारी पुरस्कृत आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. नव्या ...

इस्लामपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे व्यापारी पुरस्कृत आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतमाल कोठेही विकता येतो. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन हे केवळ राजकीय नाट्य असून, त्यामध्ये शेतकरी हिताचा विचार नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्य व देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, यासाठी २८ नोव्हेंबरपासून रघुनाथ पाटील यांनी सुरू केलेली जनप्रबोधन यात्रा आज वाळवा तालुक्यात आली होती. क्रांतिसिंह नाना पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, हणमंतराव पाटील, इकबाल जमादार उपस्थित होते.

पाटील म्हणाले, सरकार, कारखानदार आणि राजू शेट्टी, सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्यांनी एकमेकांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. ऊस उताऱ्यात २ टक्के आणि उतारा काढण्याच्या पद्धतीत १ टक्का चोरी करून शेतकऱ्याचे टनामागे ८५५ रुपयांचे नुकसान केले आहे. तोडणी वाहतुकीत ४०० रुपयांची लूट होते. तसेच कारखान्यात तयार होणारा उपपदार्थांचा हिशेब केल्यास ४ हजार रुपयांहून अधिक दर मिळू शकतो. मात्र शेट्टी, खोत या नेत्यांनी २८५० च्यावर एफआरपी न मागण्याचे पाप केले आहे. ते म्हणाले, शेतमालाला उत्पादन खर्चावर रास्तभाव मिळायला हवा. पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याची निव्वळ घोषणा केली. त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनीच आता शेतमालाचा रास्त भाव पाहिजे का नको? हे ठरवायला हवे. राज्यातील आमदार, खासदारच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यासाठी जबाबदार आहेत. शेतकऱ्यांच्या चोऱ्या कोण करतंय, हे दाखविण्यासाठीच ही प्रबोधन यात्रा सुरू आहे.

यावेळी माणिकराव पाटील, धनपाल माळी, शंकरराव मोहिते, अविनाश पाटील, सर्जेराव पाटील, मारुतराव राठोड, राधाकिसन गडदे उपस्थित होते.