शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: January 2, 2015 00:17 IST

द्राक्ष बागायतदार धास्तावले : ज्वारी, गहू, हरभरा, करडई पिकांना मात्र दिलासा

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी बुधवारी रात्री तसेच गुरूवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल पिकांसाठी उपयुक्त असला तरी, द्राक्ष आणि डाळिंब या फळपिकांसाठी हानीकारक आहे. त्यामुळे फळ बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे.जत : जत शहर आणि परिसरात बुधवारी रात्री एक व पहाटे पाचच्यादरम्यान तुरळक प्रमाणात पाऊस झाला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळी सात वाजण्याच्यादरम्यान वादळी वारे झाले, परंतु पाऊस पडला नाही. दुपारी हवेत उकाडा तर सायंकाळी गारवा जाणवत होता. रात्री एक वाजण्याच्यादरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. पंधरा-वीस मिनिटे पाऊस झाला आहे. आज (गुरुवार) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन झाले नाही. दमट वातावरण आहे. वातावरणात अचानक बदल होऊन एक आठवड्यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. त्यामुळे फळबागांवर दावण्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट निर्माण होणार आहे, असे मत द्राक्ष उत्पादक शेतकरी सोपान शिंदे (जत) यांनी व्यक्त केले.सोनी : दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने मिरज पूर्वभागातील द्राक्ष बागायतदार हबकला आहे. पावसाने द्राक्षमण्यांना तडा गेला असून पावसामुळे दावण्या रोगाचा फैलावही वाढला असल्याने शेतकऱ्यांना परत फटका बसला आहे.गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून या पावसामुळे जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, तासगाव, कवठेमहांकाळ ,पलूस परिसरातील द्राक्षपट्ट्यात पाऊस पडल्याने द्राक्ष बागायतदारअडचणीत आला आहे. सध्या मिरज पूर्वभागातील द्राक्ष हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तासगाव परिसरात काही प्रमाणात द्राक्षे विक्रीयोग्य झाली असून, पावसामुळे परिपक्व द्राक्षमण्यांना काही प्रमाणात तडे गेले आहेत. दावण्या, भुरी व फळकुजीही झाली असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथे अवकाळी पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादकांतून चिंतेचे वातावरण कायम आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे शेतकरी वैतागला असून, द्राक्ष उत्पादकांचा औषधांचा खर्च गतवर्षीपेक्षा दुप्पट झाला आहे. लिंगनूर : मिरज तालुक्यातील लिंगनूर, बेळंकी, सलगरे परिसरात अवकाळी पावसाने पुन्हा तोंड वर काढले. आज सायंकाळी बेळंकी व कोंगनोळी परिसरातही पंधरा मिनिटे पाऊस पडला. तसेच दोन दिवसांपासून सकाळी धुके व दिवसभर ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांत निर्माण झालेली घबराट कायम आहे. आज लिंगनूर परिसरातही दिवसभर ढगाळ हवामान होते, पण पाऊस झाला नाही. तरीही बागायतदारांत धाकधुक निर्माण झाली आहे. खानापूर : खानापूर पूर्व भागात बुधवारी रात्रीपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षबागायतदार शेतकरी हवालदिल बनला आहे. खानापूर पूर्व भागातील पळशी, हिवरे, करंजे, बेणापूर, बलवडी येथील निर्यातक्षम द्राक्षबागांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारीमध्येही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने यंदाचा हंगाम पूर्ण होणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. गुरुवारीही दिवसभर वातावरण ढगाळ राहून पावसाची रिमझिम सुरूच होती. या पावसाने रब्बीमधील गहू, शाळू पिकांना फायदा होणार आहे, तर हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाने धडाका सुरु केला असून, आज (गुरुवारी) दुपारी दोनच्या सुमारास तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे द्राक्ष बागायतदार, डाळिंब बागायतदार यांचे धाबे दणाणले आहेत.बुधवारी रात्री तालुक्याच्या करोली (टी), अग्रण धुळगाव, हिंगणगाव, रांजणी, कोकळे परिसरात पहाटे अवकाळी पावसाने दणका दिला. तसेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी अवकाळी पावसाच्या तुरळक सरी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, तर द्राक्षे व डाळिंब पिकाला मोठा फटका बसणार आहे.ढालगाव : ढालगाव, नागजसह परिसरातील लंगरपेठ, चुडेखिंडी आदी गावात वादळी वाऱ्यासह आज (गुरुवारी) अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्षबागांसह ज्वारी, मका आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास काही ठिकाणी अर्धा तास पाऊस झाला. जोराचा वारा असल्याने चुडेखिंडीत विजय शितोळे यांचे तीन एकर ज्वारीचे पीक भुईसपाट झाले, तर द्राक्षबागांतील घडात पाणी साचून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच गहू, मका यासारख्या पिकांचेही मोठे नुकसान परिसरात झाले आहे.कवठेएकंद : तासगाव शहरासह तालुक्यातील कवठेएकंद, नागाव कवठे, मणेराजुरी, सावळजसह परिसरात पावसाने आज (गुरुवारी) दुपारी हजेरी लावली. अवेळी पडलेल्या या पावसामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसला.दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. आज दुपारी तासगाव शहरासह परिसरात अर्धा तास पावसाच्या सरी पडल्या. काही भागामध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. प्रामुख्याने काढणीला आलेल्या काळ्या द्राक्षांचे मोठे नुकसान होणार आहे. संकेतस्थळावर पावसाचे अनुमान केले असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (वार्ताहर)