शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी कौतुक केल्याने फडणवीस, चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यास महत्त्व नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST

सांगली : कोरोना नियंत्रणासाठी देशातील इतर राज्यांच्या मानाने चांगले काम करत आहे. तरीही विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. मुळात ...

सांगली : कोरोना नियंत्रणासाठी देशातील इतर राज्यांच्या मानाने चांगले काम करत आहे. तरीही विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता राज्यातील काम उत्कृष्ट असल्याचे सांगितल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे काय बोलतात याला काही महत्त्व उरले नाही, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाविषयक आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असलातरी त्याचा सामना करत उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासन प्राधान्याने काम करत आहे. आजमितीला राज्यभरात ऑक्सिजनचा योग्य पुरवठा, रेमडेसिविरचा इंजेक्शनची मागणीची पूर्तता करण्यात येत आहे. रेमडेसिविरचा पुरवठा करण्याचे अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात आहेत. तरीही राज्य शासन अधिक इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविषयक करत असलेल्या लढाईचे आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कौतुक केले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असतानाही त्यांनी उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. विरोध करतानाही तो सूत्रबद्ध असला पाहिजे. मात्र, भाजपचा विरोध असा वाटत नाही, असेही ते म्हणाले.

चौकट

परदेशातील मदत केव्हा मिळणार

देशातील कोरोना नियंत्रणासाठी जगभरातून मदत येत आहे. विमाने भरून येणाऱ्या या मदतीतील मदत महाराष्ट्राला मिळणेही अपेक्षित आहे. मात्र, अद्याप ती मिळाली नाही. केंद्र दुजाभाव करते, असे म्हणणार नाही; पण आलेल्या मदतीतील योग्य वाटा महाराष्ट्रालाही देण्यात यावा, अशी अपेक्षा असल्याचे जयंत पाटील म्हणाले.