शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

मोदींनी कौतुक केल्याने फडणवीस, चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यास महत्त्व नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST

सांगली : कोरोना नियंत्रणासाठी देशातील इतर राज्यांच्या मानाने चांगले काम करत आहे. तरीही विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. मुळात ...

सांगली : कोरोना नियंत्रणासाठी देशातील इतर राज्यांच्या मानाने चांगले काम करत आहे. तरीही विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता राज्यातील काम उत्कृष्ट असल्याचे सांगितल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे काय बोलतात याला काही महत्त्व उरले नाही, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाविषयक आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असलातरी त्याचा सामना करत उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासन प्राधान्याने काम करत आहे. आजमितीला राज्यभरात ऑक्सिजनचा योग्य पुरवठा, रेमडेसिविरचा इंजेक्शनची मागणीची पूर्तता करण्यात येत आहे. रेमडेसिविरचा पुरवठा करण्याचे अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात आहेत. तरीही राज्य शासन अधिक इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविषयक करत असलेल्या लढाईचे आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कौतुक केले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असतानाही त्यांनी उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. विरोध करतानाही तो सूत्रबद्ध असला पाहिजे. मात्र, भाजपचा विरोध असा वाटत नाही, असेही ते म्हणाले.

चौकट

परदेशातील मदत केव्हा मिळणार

देशातील कोरोना नियंत्रणासाठी जगभरातून मदत येत आहे. विमाने भरून येणाऱ्या या मदतीतील मदत महाराष्ट्राला मिळणेही अपेक्षित आहे. मात्र, अद्याप ती मिळाली नाही. केंद्र दुजाभाव करते, असे म्हणणार नाही; पण आलेल्या मदतीतील योग्य वाटा महाराष्ट्रालाही देण्यात यावा, अशी अपेक्षा असल्याचे जयंत पाटील म्हणाले.