शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मोदींनी कौतुक केल्याने फडणवीस, चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यास महत्त्व नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST

सांगली : कोरोना नियंत्रणासाठी देशातील इतर राज्यांच्या मानाने चांगले काम करत आहे. तरीही विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. मुळात ...

सांगली : कोरोना नियंत्रणासाठी देशातील इतर राज्यांच्या मानाने चांगले काम करत आहे. तरीही विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता राज्यातील काम उत्कृष्ट असल्याचे सांगितल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे काय बोलतात याला काही महत्त्व उरले नाही, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाविषयक आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असलातरी त्याचा सामना करत उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासन प्राधान्याने काम करत आहे. आजमितीला राज्यभरात ऑक्सिजनचा योग्य पुरवठा, रेमडेसिविरचा इंजेक्शनची मागणीची पूर्तता करण्यात येत आहे. रेमडेसिविरचा पुरवठा करण्याचे अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात आहेत. तरीही राज्य शासन अधिक इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविषयक करत असलेल्या लढाईचे आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कौतुक केले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असतानाही त्यांनी उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. विरोध करतानाही तो सूत्रबद्ध असला पाहिजे. मात्र, भाजपचा विरोध असा वाटत नाही, असेही ते म्हणाले.

चौकट

परदेशातील मदत केव्हा मिळणार

देशातील कोरोना नियंत्रणासाठी जगभरातून मदत येत आहे. विमाने भरून येणाऱ्या या मदतीतील मदत महाराष्ट्राला मिळणेही अपेक्षित आहे. मात्र, अद्याप ती मिळाली नाही. केंद्र दुजाभाव करते, असे म्हणणार नाही; पण आलेल्या मदतीतील योग्य वाटा महाराष्ट्रालाही देण्यात यावा, अशी अपेक्षा असल्याचे जयंत पाटील म्हणाले.