शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांनी शेवटच्या टप्प्यातील ऊसाचे बिल थकविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

कवठे एकंद : ऊस उत्पादकांनी साखर कारखान्यांना गळीत हंगामाच्या शेवटी पाठवलेल्या ऊसाचे बिल मिळाले नाही. कारखाना प्रशासनाकडे विचारणा करूनही ...

कवठे एकंद : ऊस उत्पादकांनी साखर कारखान्यांना गळीत हंगामाच्या शेवटी पाठवलेल्या ऊसाचे बिल मिळाले नाही. कारखाना प्रशासनाकडे विचारणा करूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. या शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्याविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

ऊसबिलाअभावी शेतकरी अडचणीत आला असून, अनेक साखर कारखान्यांनी शेवटच्या टप्प्यातील ऊस बिले दिली नाहीत. कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या परिणामांचा फटका शेतीसह अन्य व्यवसायाला बसला आहे. शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, अनेक शेती कामे व सोसायटीचे पीककर्ज भागवणे हे अडचणीचे बनले आहे. एकूणच शेतकऱ्यावर दुष्काळात तेरावा महिना असल्याचे अनुभव येत आहेत. प्रामुख्याने शेतकरी वर्ग मजुरी, व्यापारी, कारखानदार, ग्राहक यांच्यावर अवलंबून असतो. कोरोना महामारीसारख्या काळात सर्वच क्षेत्रात कोरोनाची सबब सांगून पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुष्काळात तेरावा महिना असल्याचे जाणवत आहे.

साखर कारखान्यांना गळीतास ऊस गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत बिले देणे बंधनकारक असतानाही अनेक साखर कारखान्यांनी वेळेत बिले न देता टाळाटाळ केली आहे, यामुळे शेतकरी अधिक अडचणीत आला आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडॉनच्या परिणामाने शेती अडचणीत येऊन शेतातील मशागतीची व खत भरण्याची कामे पैशाअभावी रखडली आहेत. ऊसाची बिले थकविणाऱ्या कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक झाला असून, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.