शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

कारखान्यांनी शेवटच्या टप्प्यातील ऊसाचे बिल थकविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

कवठे एकंद : ऊस उत्पादकांनी साखर कारखान्यांना गळीत हंगामाच्या शेवटी पाठवलेल्या ऊसाचे बिल मिळाले नाही. कारखाना प्रशासनाकडे विचारणा करूनही ...

कवठे एकंद : ऊस उत्पादकांनी साखर कारखान्यांना गळीत हंगामाच्या शेवटी पाठवलेल्या ऊसाचे बिल मिळाले नाही. कारखाना प्रशासनाकडे विचारणा करूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. या शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्याविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

ऊसबिलाअभावी शेतकरी अडचणीत आला असून, अनेक साखर कारखान्यांनी शेवटच्या टप्प्यातील ऊस बिले दिली नाहीत. कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या परिणामांचा फटका शेतीसह अन्य व्यवसायाला बसला आहे. शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, अनेक शेती कामे व सोसायटीचे पीककर्ज भागवणे हे अडचणीचे बनले आहे. एकूणच शेतकऱ्यावर दुष्काळात तेरावा महिना असल्याचे अनुभव येत आहेत. प्रामुख्याने शेतकरी वर्ग मजुरी, व्यापारी, कारखानदार, ग्राहक यांच्यावर अवलंबून असतो. कोरोना महामारीसारख्या काळात सर्वच क्षेत्रात कोरोनाची सबब सांगून पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुष्काळात तेरावा महिना असल्याचे जाणवत आहे.

साखर कारखान्यांना गळीतास ऊस गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत बिले देणे बंधनकारक असतानाही अनेक साखर कारखान्यांनी वेळेत बिले न देता टाळाटाळ केली आहे, यामुळे शेतकरी अधिक अडचणीत आला आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडॉनच्या परिणामाने शेती अडचणीत येऊन शेतातील मशागतीची व खत भरण्याची कामे पैशाअभावी रखडली आहेत. ऊसाची बिले थकविणाऱ्या कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक झाला असून, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.