शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वाढता वाढेना साखर कारखान्यांचा उतारा!

By admin | Updated: December 27, 2015 00:09 IST

जिल्ह्यातील चित्र : आठ कारखान्यांचा उतारा ११ टक्के, तर सात ठिकाणी केवळ साडेआठ ते दहा टक्केच उतारा

अशोक डोंबाळे ल्ल सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या उताऱ्यात दोन वर्षांत घट झाली आहे. सध्या थंडीचा महिना असून, उताऱ्यात वाढ होण्याऐवजी घट दिसून येत आहे. दुष्काळी भागातील कारखान्यांना कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचा उतारा कमी राहतो. पण, ऊस पट्ट्यातील कारखान्यांचा उतारा घटत असल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०१३-१४ मध्ये सरासरी १२.६६ टक्के उतारा होता. १६ साखर कारखान्यांनी आतापर्यंत २५ लाखटन उसाचे गाळप करून तीस लाखांहून अधिक क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. दोन महिन्यात सरासरी १०.८९ टक्के उतारा मिळाला आहे. वाळव्याचा हुतात्मा, राजारामबापू (साखराळे व वाटेगाव शाखा), कारंदवाडीचा सर्वोदय, कुंडलचा क्रांती, वांगीचा सोनहिरा या कारखान्यांचा साडेअकरा टक्क्यावर साखर उतारा आहे, तर सर्वाधिक कमी साखर उतारा आटपाडीच्या माणगंगा कारखान्याचा आहे. त्यांचा उतारा केवळ ८.७७ टक्के आहे. सांगलीच्या वसंतदादा कारखान्याचाही नेहमीपेक्षा कमी उतारा असल्याचे दिसत आहे. शिराळ्याच्या ‘विश्वास’चा सरासरी साखर उतारा १३ टक्केपर्यंत असतो. परंतु, यावर्षी १३ डिसेंबरचा साखर उतारा १०.२७ टक्के आहे. कवठेमहांकाळच्या महांकाली, जतच्या डफळे कारखान्याचा उतारा दहा टक्केपेक्षा कमीच आहे. सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे उतारा आतातरी वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उतारा वाढला नाही तर, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण साखर उताऱ्यावरच एफआरपी (किमान आधारभूत किंमत) ठरविली जात आहे. उतारा वाढला तरच शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळणार आहे. तो घटला तर शेतकऱ्यांना कमी दरावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.