शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

वाढता वाढेना साखर कारखान्यांचा उतारा!

By admin | Updated: December 27, 2015 00:09 IST

जिल्ह्यातील चित्र : आठ कारखान्यांचा उतारा ११ टक्के, तर सात ठिकाणी केवळ साडेआठ ते दहा टक्केच उतारा

अशोक डोंबाळे ल्ल सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या उताऱ्यात दोन वर्षांत घट झाली आहे. सध्या थंडीचा महिना असून, उताऱ्यात वाढ होण्याऐवजी घट दिसून येत आहे. दुष्काळी भागातील कारखान्यांना कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचा उतारा कमी राहतो. पण, ऊस पट्ट्यातील कारखान्यांचा उतारा घटत असल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०१३-१४ मध्ये सरासरी १२.६६ टक्के उतारा होता. १६ साखर कारखान्यांनी आतापर्यंत २५ लाखटन उसाचे गाळप करून तीस लाखांहून अधिक क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. दोन महिन्यात सरासरी १०.८९ टक्के उतारा मिळाला आहे. वाळव्याचा हुतात्मा, राजारामबापू (साखराळे व वाटेगाव शाखा), कारंदवाडीचा सर्वोदय, कुंडलचा क्रांती, वांगीचा सोनहिरा या कारखान्यांचा साडेअकरा टक्क्यावर साखर उतारा आहे, तर सर्वाधिक कमी साखर उतारा आटपाडीच्या माणगंगा कारखान्याचा आहे. त्यांचा उतारा केवळ ८.७७ टक्के आहे. सांगलीच्या वसंतदादा कारखान्याचाही नेहमीपेक्षा कमी उतारा असल्याचे दिसत आहे. शिराळ्याच्या ‘विश्वास’चा सरासरी साखर उतारा १३ टक्केपर्यंत असतो. परंतु, यावर्षी १३ डिसेंबरचा साखर उतारा १०.२७ टक्के आहे. कवठेमहांकाळच्या महांकाली, जतच्या डफळे कारखान्याचा उतारा दहा टक्केपेक्षा कमीच आहे. सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे उतारा आतातरी वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उतारा वाढला नाही तर, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण साखर उताऱ्यावरच एफआरपी (किमान आधारभूत किंमत) ठरविली जात आहे. उतारा वाढला तरच शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळणार आहे. तो घटला तर शेतकऱ्यांना कमी दरावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.