शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पगारावरच जास्त खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST

सांगली : जिल्हा परिषद कृषी विभागाकडे काहीच योजना शिल्लक राहिल्या नसल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामच राहिलेले नाही. यामुळे राज्य शासनाकडील ...

सांगली : जिल्हा परिषद कृषी विभागाकडे काहीच योजना शिल्लक राहिल्या नसल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामच राहिलेले नाही. यामुळे राज्य शासनाकडील कृषीच्या योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे द्याव्यात, अशी मागणी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी शुक्रवारी केली. कृषी विभागाकडील पगारावर वर्षाला पाच कोटींचा खर्च तर विकासकामांवर केवळ तीन कोटींचा खर्च होतो, असेही त्या म्हणाल्या.

कोरे म्हणाल्या की, दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना रद्द होत आहेत. सध्या केवळ स्वीय निधी ५० ते ६० लाख, कृषी स्वावलंबन योजना आणि राष्ट्रीय बायोगॅस अशा तीनच योजना शिल्लक आहेत. यासाठी वार्षिक तीन कोटींपर्यंत निधी येतो. अनेकवेळा दोन वर्षे निधीही मिळत नाही. कृषी विभागाकडील ५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना काहीच काम नसते. परंतु, शासन त्यांच्या पगारावर वार्षिक पाच कोटींपर्यंत खर्च करत आहे. विकासकामांवर तीन ते चार कोटींचा खर्च आणि पगारावर पाच कोटींचा खर्च होत आहे. शासनाने जिल्हा परिषद कृषी विभागाकडील योजना जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित केल्या आहेत. त्या योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग कराव्यात, अशी मागणी कोरे यांनी केली.