शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापनातलं विस्तारणारं अवकाश : अनिकेत बाळकृष्ण साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST

एखादे क्षेत्र निवडून, नियोजनाच्या आखीव चौकटीतून वाटचाल करणे मला कधीच जमले नाही. आवड व समाधानाच्या एका प्रवाहाबरोबर मी प्रामाणिकपणे ...

एखादे क्षेत्र निवडून, नियोजनाच्या आखीव चौकटीतून वाटचाल करणे मला कधीच जमले नाही. आवड व समाधानाच्या एका प्रवाहाबरोबर मी प्रामाणिकपणे चालत राहिलो. हजारो मुलांना माझी अध्यापनाची पद्धत भावली. त्यांच्या यशामधून मला माझ्या कामाचे समाधान मिळत गेले. स्वत:चे करिअर घडविण्याच्या अनेक संधी होत्या, तरीही दुसऱ्याच्या करिअरला आकार देण्याचे काम मी स्वीकारले आणि तेच माझेही करिअर बनले.

- अनिकेत बाळकृष्ण साळुंखे, संचालक, नालंदा करिअर अकॅडमी, सांगली

मंत्रालयात लागलेली कायमस्वरूपी नोकरी, हाती आलेले स्थिर आयुष्य सोडून अनिकेत साळुंखे यांनी सांगलीतच आवडीच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा धाडसी व अनेकांना न पटणारा निर्णय घेतला. कष्टाच्या, प्रामाणिकपणाच्या अनेक वर्षांच्या वाटचालीनंतर त्यांनी अध्यापनात विस्तारणारं स्वत:चं एक अवकाश तयार केलं. याच अवकाशात अनेकांना विविध क्षेत्रांत चमकणाऱ्या ताऱ्यांचं भाग्य प्राप्त झालं. सांगलीच्या अनिकेत साळुंखे यांचा हा प्रवास थक्क करणारा व तितकाच प्रेरणादायीसुद्धा आहे.

सांगलीत २४ जानेवारी १९९० रोजी त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांना घरच्यांसाठी कोणत्या तडजोडी कराव्या लागल्या नाहीत. सांगलीतील प्रज्ञा प्रबोधिनीमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. अकरावी, बारावीला त्यांनी शास्त्र विषय घेतला आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी घेतली. त्यानंतर बहि:स्थ विद्यार्थी म्हणून एम. कॉम. केले. नाशिक येथे सध्या अतिरिक्त पोलीसप्रमुख पदावर कार्यरत असलेल्या शर्मिला घार्गे-वालावलकर या त्यांच्या आतेबहिणीचा त्यांच्या वाटचालीवर मोठा प्रभाव आहे. प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. अकरावी, बारावीत असताना अनिकेत यांचे दोन मित्र जीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या विषयाला वारंवार गैरहजर राहायचे. एकाला विषय आवडत नव्हता, तर दुसऱ्याकडे पैशांची अडचण होती. या दोन्ही मित्रांना चुकविलेल्या तासातील अभ्यासक्रम शिकविण्याचे काम अनिकेत यांच्याकडे आले. शिक्षकांपेक्षा अनिकेत यांची पद्धत त्यांना आवडली. त्यांची त्या विषयात प्रगती झाली. अध्यापनाच्या वाटेवरचा हा पहिला अनुभव त्यांच्या याच क्षेत्रातील करिअरचा पाया घालणारा ठरला.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका संस्थेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. यानिमित्ताने त्यांना अनेक विषयांचा अभ्यास करावा लागला. कोणत्याही विषयाच्या खाेलात जाऊन तो विषय समजून घेण्याची त्यांची कला त्यांच्या अध्यापनाला अधिक प्रभावी बनवून गेली. याच वेळी त्यांनी दिलेल्या एका परीक्षेतून मंत्रालयात साहाय्यक कक्ष अधिकारीपदावर नियुक्ती झाली. ते मुंबईला गेले. मुंबईच्या दाटीवाटीच्या शहरातील शासकीय कार्यालयातील खोली त्यांची घुसमट करू लागली. त्यामुळे कोणालाही न विचारता, न सांगता त्यांनी ही नाेकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अवघ्या काही दिवसांतच मंत्रालय सोडून सांगली गाठले. कुटुंबीयांना हा निर्णय पटला नव्हता. निर्णय घेताना काेणाचा सल्ला घेत नसल्याने संभ्रमाचा प्रसंग त्यांच्यासमोर कधी उभारला नाही. अध्यापनाचा अनुभव असल्याने त्यांनी थेट या आवडीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ४० च्या बॅचपासून त्यांनी करिअर मार्गदर्शनाचे दालन खुले केले. सुरुवातीला १६ तासांहून अधिक वेळ त्यांनी अकॅडमीला दिला. सकाळी सातपासून रात्री दीड वाजेपर्यंत त्यांनी काम केले. मुलांना त्यांच्या भाषेत, सहजतेने शिकविण्याच्या पद्धतीमुळे अकॅडमीचा विस्तार होत गेला. सध्या तीनशेहून अधिक मुले या अकॅडमीशी जोडली गेली. अनेकांचे करिअर यातून घडले. अकॅडमीकडे त्यांनी कधीही उद्योग म्हणून पाहिले नाही. किती पैसे कमविले यापेक्षा संस्था व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख त्यांना अधिक भावतो. त्यामुळे अनेक अत्याधुनिक सुविधांनी त्यांचे ‘नालंदा’ नटले. अभ्यासिका, ग्रंथालय, क्लास यांची रचना त्यांनी अभ्यासाला पोषक व आधुनिक काळाशी समरूप केली. दिल्लीतील मोठ्या अकॅडमीच्या तुलनेत किमान ९० टक्क्यांपर्यंतचे दर्जात्मक शिक्षण व सुविधा देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांची पावलेही त्या दिशेने पडली आहेत. आयुष्याची जोडीदार म्हणून लाभलेल्या त्यांच्या पत्नीही अध्यापिका आहेत. सांगलीच्या कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात त्या नोकरीस आहेत. आयुष्याच्या वाटचालीत त्यांना कुटुंबामुळे कधीही तडजोड करावी लागली नाही. तरीही निवडलेल्या वाटेला कष्टाने फुलविण्याचे काम अनिकेत साळुंखे यांनी केले आणि त्यातूनच ‘नालंदा’चा बहर आज समाजात दरवळत आहे.