शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

रासायनिक खते उतरण्यासाठी संचारबंदीतून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खरीप हंगाम महिन्यावर आल्यामुळे देशभरातून रासायनिक खते, बियाणे घेऊन मालवाहू रेल्वेगाडी येत आहेत. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : खरीप हंगाम महिन्यावर आल्यामुळे देशभरातून रासायनिक खते, बियाणे घेऊन मालवाहू रेल्वेगाडी येत आहेत. या गाड्यांमधील माल उतरून घेणे आणि वाहतुकीसाठी संचारबंदीतून जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सवलत दिली आहे, अशी माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय निलावार यांनी दिली. तसेच दुकानातून खते, बियाणे विकी सकाळी ७ ते ११ या वेळेतच करावी लागणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी मंगळवारपासून सांगली जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे रासायनिक खते, बियाणे आणि औषधे साठवणूक व माल उतरून घेण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून सांगली ॲग्रीकल्चर इनपुट्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष संजय निलावार, आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांची भेट घेऊन संचारबंदीतून कृषी दुकानदारांना सूट देण्याची मागणी केली आहे. तसेच रासायनिक खते, बियाणे घेऊन रेल्वे वॅगन आल्यानंतर नऊ तासांमध्ये माल खाली करावा लागतो. तसेच रेल्वे धक्क्यावरून बारा तासांत माल उचलावा लागत आहे, अन्यथा रेल्वेकडून लाखो रुपये दंड होतो. यातून मार्ग काढण्याची असोसिएशनने मागणी केली होती.

यावर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी रेल्वेतून येणारा माल उतरून घेणे आणि वाहतुकीसाठी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सवलत देण्यात येईल; पण कृषी दुकानदारांकडून मालाच्या विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ हीच वेळ राहील. विक्रीसाठी कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.