शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हरिपूरच्या पेवांचे पोट रिकामे

By admin | Updated: January 17, 2017 00:15 IST

‘कुलूप नसलेली गोदामे’ संकटात : नैसर्गिक रखवालदारी संपुष्टात

शीतल पाटील ल्ल सांगली‘टर्मरिक सिटी’ म्हणून सांगलीची ओळख देशात आहे. हा मान मिळवून देणाऱ्या हळदीच्या रखवालीची जबाबदारी हरिपूरच्या पेवांनी अखंडित सांभाळली. मात्र २००५ च्या महापुरात हजारो पेवे नष्ट झाली. तरीही आज तेवढ्याच प्रमाणात ती शिल्लक आहेत. कुलूप नसलेल्या या गोदामांवर कधीकाळी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत होते. आता मात्र ही पेवे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सांगलीपासून तीन किलोमीटर अंतरावरील हरिपूर हे गाव नावारूपाला आले, ते हळदीच्या पेवांमुळे. चार ते पाच लाख क्विंटल हळकुंडे साठवणुकीची क्षमता असलेली अडीच हजारावर पेवे होती. २६ जुलै ते ६ आॅगस्ट २00५ या कालावधित कृष्णा नदीला आलेल्या महापुराने या ऐतिहासिक पेवांना जलसमाधी दिली. अडीच हजारपैकी हजार पेवे वाचली. मात्र गेल्या दहा वर्षात पेवांचे महत्त्व कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेव बंद करून शेतीकडे मोर्चा वळविला आहे. आजही हरिपुरात ३०० ते ४०० पेव आहेत. पण पूर्वीसारखा त्यांचा हळद साठवणुकीसाठी वापर कमी झाला आहे. सध्या १०० ते १२५ पेवांमध्येच हळद साठविली गेली आहे. कुलूप नसलेल्या या गोदामांवर बँकाही विश्वास ठेवून होत्या. या पेवांवर थेट व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा केला जात होता. पण महापुरानंतर ही स्थिती थोडी बदलली. व्यापाऱ्यांनीही पेवांपेक्षा गोदामांना पसंती दिली.पेव म्हणजे काय?हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते. थोडासा जरी ओलसरपणा लागला तर ती काळपट लाल होते. त्यामुळे पावसाळ्यात हळद साठविण्यासाठी जमिनीमध्येच घागरीच्या आकाराची कोठारे खणण्यात आली. त्यांनाच पेव म्हटले जाते. हरिपूरची पेवे त्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील माती वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाळासारख्या घट्ट असलेल्या या मातीमुळे पेवात पाणी अथवा हवेचा शिरकाव होत नाही. प्राणवायुअभावी तेथे हळदीला कीड लागू शकत नाही. शिवाय हळदीचे वजन वाढून त्याचा रंगही खुलतो. परिणामी चांगल्या प्रतीची हळद चार ते पाच वर्षे टिकून राहते.