शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

हरिपूरच्या पेवांचे पोट रिकामे

By admin | Updated: January 17, 2017 00:15 IST

‘कुलूप नसलेली गोदामे’ संकटात : नैसर्गिक रखवालदारी संपुष्टात

शीतल पाटील ल्ल सांगली‘टर्मरिक सिटी’ म्हणून सांगलीची ओळख देशात आहे. हा मान मिळवून देणाऱ्या हळदीच्या रखवालीची जबाबदारी हरिपूरच्या पेवांनी अखंडित सांभाळली. मात्र २००५ च्या महापुरात हजारो पेवे नष्ट झाली. तरीही आज तेवढ्याच प्रमाणात ती शिल्लक आहेत. कुलूप नसलेल्या या गोदामांवर कधीकाळी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत होते. आता मात्र ही पेवे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सांगलीपासून तीन किलोमीटर अंतरावरील हरिपूर हे गाव नावारूपाला आले, ते हळदीच्या पेवांमुळे. चार ते पाच लाख क्विंटल हळकुंडे साठवणुकीची क्षमता असलेली अडीच हजारावर पेवे होती. २६ जुलै ते ६ आॅगस्ट २00५ या कालावधित कृष्णा नदीला आलेल्या महापुराने या ऐतिहासिक पेवांना जलसमाधी दिली. अडीच हजारपैकी हजार पेवे वाचली. मात्र गेल्या दहा वर्षात पेवांचे महत्त्व कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेव बंद करून शेतीकडे मोर्चा वळविला आहे. आजही हरिपुरात ३०० ते ४०० पेव आहेत. पण पूर्वीसारखा त्यांचा हळद साठवणुकीसाठी वापर कमी झाला आहे. सध्या १०० ते १२५ पेवांमध्येच हळद साठविली गेली आहे. कुलूप नसलेल्या या गोदामांवर बँकाही विश्वास ठेवून होत्या. या पेवांवर थेट व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा केला जात होता. पण महापुरानंतर ही स्थिती थोडी बदलली. व्यापाऱ्यांनीही पेवांपेक्षा गोदामांना पसंती दिली.पेव म्हणजे काय?हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते. थोडासा जरी ओलसरपणा लागला तर ती काळपट लाल होते. त्यामुळे पावसाळ्यात हळद साठविण्यासाठी जमिनीमध्येच घागरीच्या आकाराची कोठारे खणण्यात आली. त्यांनाच पेव म्हटले जाते. हरिपूरची पेवे त्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील माती वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाळासारख्या घट्ट असलेल्या या मातीमुळे पेवात पाणी अथवा हवेचा शिरकाव होत नाही. प्राणवायुअभावी तेथे हळदीला कीड लागू शकत नाही. शिवाय हळदीचे वजन वाढून त्याचा रंगही खुलतो. परिणामी चांगल्या प्रतीची हळद चार ते पाच वर्षे टिकून राहते.