शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

हरिपूरच्या पेवांचे पोट रिकामे

By admin | Updated: January 17, 2017 00:15 IST

‘कुलूप नसलेली गोदामे’ संकटात : नैसर्गिक रखवालदारी संपुष्टात

शीतल पाटील ल्ल सांगली‘टर्मरिक सिटी’ म्हणून सांगलीची ओळख देशात आहे. हा मान मिळवून देणाऱ्या हळदीच्या रखवालीची जबाबदारी हरिपूरच्या पेवांनी अखंडित सांभाळली. मात्र २००५ च्या महापुरात हजारो पेवे नष्ट झाली. तरीही आज तेवढ्याच प्रमाणात ती शिल्लक आहेत. कुलूप नसलेल्या या गोदामांवर कधीकाळी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत होते. आता मात्र ही पेवे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सांगलीपासून तीन किलोमीटर अंतरावरील हरिपूर हे गाव नावारूपाला आले, ते हळदीच्या पेवांमुळे. चार ते पाच लाख क्विंटल हळकुंडे साठवणुकीची क्षमता असलेली अडीच हजारावर पेवे होती. २६ जुलै ते ६ आॅगस्ट २00५ या कालावधित कृष्णा नदीला आलेल्या महापुराने या ऐतिहासिक पेवांना जलसमाधी दिली. अडीच हजारपैकी हजार पेवे वाचली. मात्र गेल्या दहा वर्षात पेवांचे महत्त्व कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेव बंद करून शेतीकडे मोर्चा वळविला आहे. आजही हरिपुरात ३०० ते ४०० पेव आहेत. पण पूर्वीसारखा त्यांचा हळद साठवणुकीसाठी वापर कमी झाला आहे. सध्या १०० ते १२५ पेवांमध्येच हळद साठविली गेली आहे. कुलूप नसलेल्या या गोदामांवर बँकाही विश्वास ठेवून होत्या. या पेवांवर थेट व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा केला जात होता. पण महापुरानंतर ही स्थिती थोडी बदलली. व्यापाऱ्यांनीही पेवांपेक्षा गोदामांना पसंती दिली.पेव म्हणजे काय?हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते. थोडासा जरी ओलसरपणा लागला तर ती काळपट लाल होते. त्यामुळे पावसाळ्यात हळद साठविण्यासाठी जमिनीमध्येच घागरीच्या आकाराची कोठारे खणण्यात आली. त्यांनाच पेव म्हटले जाते. हरिपूरची पेवे त्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील माती वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाळासारख्या घट्ट असलेल्या या मातीमुळे पेवात पाणी अथवा हवेचा शिरकाव होत नाही. प्राणवायुअभावी तेथे हळदीला कीड लागू शकत नाही. शिवाय हळदीचे वजन वाढून त्याचा रंगही खुलतो. परिणामी चांगल्या प्रतीची हळद चार ते पाच वर्षे टिकून राहते.