शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

‘टेंभू’च्या पाण्यासाठी कडेगावात एल्गार

By admin | Updated: April 29, 2017 00:14 IST

‘टेंभू’च्या पाण्यासाठी कडेगावात एल्गार

कडेगाव : टेंभू योजनेचे पाणी शिवाजीनगर तलावातून कालव्याद्वारे सोडावे, तसेच कडेगाव तलावात पुरेसा पाणीसाठा करावा, सुर्ली कालव्यातून शेतीसाठी पुरेसे पाणी द्यावे, या मागणीसाठी धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कडेगाव बस स्थानकाजवळ विजापूर-गुहागर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दीड तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शिवाजीनगर तलावातून पाणी सोडल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.टेंभू योजनेचा राखीव साठा असलेल्या शिवाजीनगर तलावाखालील शेतीपिके पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. शिवाजीनगर तलाव टेंभूच्या पाण्याने तुडुंब भरलेला आहे. योजनेचे आवर्तनही सुरु आहे. यामुळे उपसा होईल तितके पाणी तलावात घेता येत आहे. आम्ही पाणीपट्टी भरतोय, तरीही या तलावातून पाणी का सोडत नाही? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला. यावर तातडीने निर्णय घेत सहाय्यक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे यांनी शिवाजीनगर तलावातून पाणी सोडले.कडेगाव शहरात तीव्र पाणीटंचाई आहे. कडेगाव शहराची पाणीपुरवठा विहीर या तलावालगत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी या तलावात टेंभू योजनेचे पाणी सुर्ली कालव्याद्वारे सोडले आहे. परंतु सुर्ली कालव्याच्या मागील बाजूस शेतकरी पाणी उपसा करतात, त्यामुळे तलावात पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही. हे पाणी ३० एप्रिल रोजी बंद होणार आहे. त्यामुळे कडेगाव शहराचा पाणीप्रश्न सुटणार नाही. यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पाणी सुरु ठेवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावर नरेंद्र घार्गे यांनी, कडेगाव तलावात चार दिवस जादा पाणी सोडणार असल्याचे सांगितले. याशिवाय ९ व ११ व्या किलोमीटरवरच्या वितरिकेतून शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचे आश्वासन घार्गे यांनी दिले.यावेळी चंद्रसेन देशमुख, युवा नेते धनंजय देशमुख, नगरसेवक उदय देशमुख, नितीन शिंदे, विजय गायकवाड, संतोष डांगे, महावीर माळी, रघुनाथ गायकवाड, मानसिंग देशमुख, विवेक भस्मे, युन्नूस पटेल, सुनील गाढवे, संजय तडसरे, राजेंद्र राऊत, राजेंद्र शिंदे, शिवाजी चन्ने, सुरेश शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)टेंभूचा राखीव साठा करा कडेगाव तलाव टेंभू योजनेच्या रिझर्व्ह क्षेत्रात येत नाही. त्यामुळे कडेगाव शहर व परिसरात ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या राखीव क्षेत्रात समावेश करावा आणि हा तलाव टेंभू योजनेचा राखीव साठा म्हणून वापरात यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख यांनी केली. या मागणीबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे यांनी सांगितले.