शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’च्या पाण्यासाठी कडेगावात एल्गार

By admin | Updated: April 29, 2017 00:14 IST

‘टेंभू’च्या पाण्यासाठी कडेगावात एल्गार

कडेगाव : टेंभू योजनेचे पाणी शिवाजीनगर तलावातून कालव्याद्वारे सोडावे, तसेच कडेगाव तलावात पुरेसा पाणीसाठा करावा, सुर्ली कालव्यातून शेतीसाठी पुरेसे पाणी द्यावे, या मागणीसाठी धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कडेगाव बस स्थानकाजवळ विजापूर-गुहागर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दीड तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शिवाजीनगर तलावातून पाणी सोडल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.टेंभू योजनेचा राखीव साठा असलेल्या शिवाजीनगर तलावाखालील शेतीपिके पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. शिवाजीनगर तलाव टेंभूच्या पाण्याने तुडुंब भरलेला आहे. योजनेचे आवर्तनही सुरु आहे. यामुळे उपसा होईल तितके पाणी तलावात घेता येत आहे. आम्ही पाणीपट्टी भरतोय, तरीही या तलावातून पाणी का सोडत नाही? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला. यावर तातडीने निर्णय घेत सहाय्यक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे यांनी शिवाजीनगर तलावातून पाणी सोडले.कडेगाव शहरात तीव्र पाणीटंचाई आहे. कडेगाव शहराची पाणीपुरवठा विहीर या तलावालगत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी या तलावात टेंभू योजनेचे पाणी सुर्ली कालव्याद्वारे सोडले आहे. परंतु सुर्ली कालव्याच्या मागील बाजूस शेतकरी पाणी उपसा करतात, त्यामुळे तलावात पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही. हे पाणी ३० एप्रिल रोजी बंद होणार आहे. त्यामुळे कडेगाव शहराचा पाणीप्रश्न सुटणार नाही. यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पाणी सुरु ठेवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावर नरेंद्र घार्गे यांनी, कडेगाव तलावात चार दिवस जादा पाणी सोडणार असल्याचे सांगितले. याशिवाय ९ व ११ व्या किलोमीटरवरच्या वितरिकेतून शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचे आश्वासन घार्गे यांनी दिले.यावेळी चंद्रसेन देशमुख, युवा नेते धनंजय देशमुख, नगरसेवक उदय देशमुख, नितीन शिंदे, विजय गायकवाड, संतोष डांगे, महावीर माळी, रघुनाथ गायकवाड, मानसिंग देशमुख, विवेक भस्मे, युन्नूस पटेल, सुनील गाढवे, संजय तडसरे, राजेंद्र राऊत, राजेंद्र शिंदे, शिवाजी चन्ने, सुरेश शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)टेंभूचा राखीव साठा करा कडेगाव तलाव टेंभू योजनेच्या रिझर्व्ह क्षेत्रात येत नाही. त्यामुळे कडेगाव शहर व परिसरात ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या राखीव क्षेत्रात समावेश करावा आणि हा तलाव टेंभू योजनेचा राखीव साठा म्हणून वापरात यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख यांनी केली. या मागणीबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे यांनी सांगितले.