शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आठ आण्याची मिरची; बारा आण्याचा मसाला!

By admin | Updated: March 27, 2017 23:59 IST

मसालाही तिखट : गृहिणींचे ‘बजेट’ कोलमडले; मिरचीच्या चौपट मसाल्याचा खर्च; ग्रामीण भागात चटणी तयारीची लगबग

कऱ्हाड : आहारातील महत्त्वाचा घटक कोणता म्हटलं तर तो चटणी म्हणून ओळखला जातो. याशिवाय कोणताच पदार्थ होत नाही. अगदी झणझणीत अन् डोळ्यात पाणी आणणारी चटणी तयार करण्याची लगबग सध्या सर्वत्र गृहिणींकडून सुरू आहे. मात्र, सध्या वाढलेल्या मसाल्यांच्या दरामुळे ही चटणी बनविणे म्हणजे ‘चार आण्याची मिरची; बारा आण्याचा मसाला’ असे आहे. उन्हाळा सुरू झाल्याने सध्या गृहिणी उन्हाळी पदार्थ बनविण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक उन्हाळ्यात गृहिणी वर्षभर पुरेल एवढी चटणी तयार करून घ्यायच्या; पण सध्या मसाल्याचे दर वाढल्याने चार महिने पुरेल एवढीच चटणी बनवित आहेत. मसाल्यांच्या दरवाढीमुळे झणझणीत चटणी बनविताना गृहिणींच्या डोळ्यात पाणी येत आहे. सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. सूर्यनारायणही चांगलीच आग ओकत असल्यामुळे या उन्हाळा ऋतूत पापड, कुरवडी, भातवडी असे पदार्थ बनविण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. पावसाळ्यात हे पदार्थ बनविता येत नाहीत. तसेच हिवाळ्यातही उन्हाचा तडाखा कमी असल्याने हे पदार्थ बनविण्यात अडचणी येतात. त्यामुळे उन्हाळ्यातच असे पदार्थ बनवून ठेवण्याकडे गृहिणींचा कल असतो. घरगुती पदार्थांबरोबर उन्हाळ्यात चटणीही तयार केली जाते. सध्या शहरात बाजारपेठेत विकत मिळणारी रेडिमेड चटणी वापरली जाते. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही घरीच चटणी बनवून ती वापरण्याकडे कल असतो. त्यासाठी बाजारातून मिरच्या खरेदी केल्या जातात. कडक उन्हात त्या मिरच्या वाळविल्या जातात. तसेच गिरणीत किंवा घरगुती पद्धतीनेही चटणी तयार करून घेतली जाते. बाजारात रेडिमेड चटणी मिळत असली तरी घरगुती चटणीची चव व टिकाऊपणा चांगला असतो. त्यामुळेच ही चटणी वापरण्याला ग्रामीण भागात पसंती दिली जाते. सध्या शहरासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारात मिरची तसेच त्यासाठी लागणारा मसाला हा विक्रीसाठी व्यापारी व शेतकऱ्यांकडून दुकाने थाटली गेली आहेत. यातून कोल्हापुरी, बेगडी, देशी, गुंटूर अशा विविध जातींच्या मिरच्या तसेच त्याच्या अधिक पटीने लागणाऱ्या मसाल्यांची विक्री केली जात आहे. या बाजारपेठांमध्ये सध्या गृहिणींकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे.कऱ्हाडात रविवारी व गुरुवारी या दोन दिवशी आठवडी बाजार भरवला जातो. मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडून आणले जाते. वेलची, तमालपत्री, काळीमिरी, लवंग आदी मसाल्यांचा चटणी बनविण्यासाठी वापर केला जातो. सध्या बाजारात मिरचीचा दर ९० ते १६० रुपये किलोपर्यंत आहे. मात्र, मसाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे चटणी तयार करताना गृहीणींच्या डोळ्यात पाणी उभे राहत आहे. (प्रतिनिधी) अठ्ठावीस मसाल्यांचे प्रकार व दर१) खोबरे १०० रुपये एक किलो २) मोठे जिरे ५० ते ६० रुपये पाव किलो ३) काळेमिरे ५० रूपये पन्नास ग्रॅम ४) दालचिनी १० रूपये दहा ग्रॅम ५) लवंग १० रूपये दहा ग्रॅम ६) शहाजिरे १० रूपये दहा ग्रॅम ७) खसखस ४० रूपये ५० ग्रॅम ८) तीळ १० रूपये पन्नास ग्रॅम ९) मेथी १० रूपये पन्नास ग्रॅम १०) मोहरी १० रूपये पन्नास ग्रॅम ११) बडीशेप १० रूपये पन्नास ग्रॅम १२) बादलफूल १० रूपये दहा ग्रॅम १३) रामपत्री १० रूपये दहा ग्रॅम १४) मसाला वेलची २० रूपये दहा ग्रॅम १५) चिरफळ १० रूपये दहा ग्रॅम १६) नाकेश्वर १५ रुपये दहा ग्रॅम १७) जायपत्री २५ रूपये दहा ग्रॅम १८) जायफळ ५ रूपये एक नग १९) दगडफूल १० रूपये दहा ग्रॅम २०) तमालपत्री ५ रूपये दहा गॅ्रम २१) धना ३० रूपये पाव किलो २२) सोरेगड्डे २० रूपये पन्नास ग्रॅम २३) हिंग १० रूपये दहा ग्रॅम २४) हिरवी वेलची २० रूपये दहा ग्रॅम २५) सुंठ २० रूपये पन्नास ग्रॅम २६) ओवा १५ रूपये पन्नास ग्रॅम. मिरची, चटणी विक्रीतून कुटुंब्ग्रामीणमध्ये ‘घरगुती’ तर शहरात ‘रेडिमेड’ चटणीसध्या पूर्वीप्रमाणे आताही ग्रामीण भागात मिरची विकत घेऊन ती कडक उन्हामध्ये वाळवून त्यात विविध प्रकारचे मसाले घालून ती तयार केली जाते. या उलट शहरातील महिलांकडून बचत गटांतून तयार करण्यात आलेली रेडिमेड चटणी विकत घेतली जाते.ाास हातभार...सध्या उन्हाळा ऋतू असल्यामुळे उन्हाळ्यात विविध पदार्थ बनविण्याकडे गृहिणींचा कल असतो. भातवडी, बटाटे वेफर्स, सांडगे, कुरवडी, लोणचे, विविध फळ, भाज्यांच्या चटणी असे घरगुती उन्हाळी पदार्थ हमखास ग्रामीण भागात बनविले जातात. यामध्ये शेतात मिरची पिकवून त्या वाळवून त्याची आठवडी बाजारात विक्री केली जाते. तर शहरात पाच ते दहा महिलांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या बचतगटाच्या माध्यमातून चटणी विक्री करूनही कुटुंबास हातभार लावण्याचे काम केले जाते.