शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
3
Video : पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
4
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
5
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
6
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
7
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
8
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
9
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
10
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
11
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
12
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
13
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
14
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
15
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
16
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
17
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
18
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
19
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
20
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?

पावसाळ्यातही जतसाठी ८० टँकर

By admin | Updated: June 13, 2016 00:10 IST

अत्यल्प पाऊस : तालुक्यातील ५६६ गावांना पाणी पुरवठा

जयवंत आदाटे -- जत तालुक्यातील सत्तर गावे आणि त्याखालील ५६६ वाड्या-वस्त्यांवर ८० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६५ मि.मी. इतके आहे. आजअखेरपर्यंत तालुक्यात फक्त १८ टक्के पावसाची नोंद येथे झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.बिळूर, जत, शेगाव परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे, तर डफळापूर व संख परिसरात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. माडग्याळ आणि उमदी परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. गतवर्षी तालुक्यात फक्त ५७ टक्के पाऊस झाला होता. कडक ऊन व अत्यल्प पाऊस यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. मागील आठ-दहा दिवसात जत तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. सर्वच ओढे-नाले, साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले होते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. त्यामुळे काही भागात समाधानकारक पाऊस पडूनही चारा व पाणी टंचाईची तीव्रता कमी झालेली नाही. तालुक्यातील चारा व पाणीटंचाई कमी होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. परंतु डोण भागातील काळ्या जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही. जमिनीत फक्त पाच ते सहा इंच खोल ओलावा निर्माण झाला आहे. जत, शेगाव, डफळापूर, बनाळी, बिळूर, उमराणी परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरण्या केल्या आहेत. मागील तीन-चार दिवसात अजिबात पाऊस झाला नाही. सकाळ-सायंकाळ हवेत गारवा निर्माण होत आहे. शनिवारी सकाळी काही प्रमाणात धुके पडले होते. दिवसभर ऊन पडत आहे. हवेत उकाडा जाणवत आहे. त्यामुळे खरीप हंगाम पेरणी केलेले शेतकरी हवालदिल होऊ लागले आहेत.मे महिन्यात जत तालुक्यात ८९ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. राज्यात सर्वाधिक टँकर जत तालुक्यात सुरु आहेत, असे प्रशासकीय अधिकारी खासगीत बोलताना सांगत होते. जून महिन्याच्या सुरुवातीस काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे प्रशासनाने बनाळी, बिळूर व जत परिसरातील पिण्याच्या पाण्याचे नऊ टँकर बंद केले आहेत.3असा राबविला उपक्रम...जत तालुक्याची लोकसंख्या तीन लाख २४ हजार इतकी आहे. त्यापैकी एक लाख ९८ हजार ९२८ नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तालुक्याच्या पश्चिम, दक्षिण, उत्तर भागात पाणी व चारा टंचाईची तीव्रता कमी प्रमाणात असली तरी, पूर्व भागात भयानक पाणी आणि चाराटंचाई जाणवत आहे. प्रशासनाने त्यावर उपाययोजना करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.