शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पदाच्या कार्यकाळात अनेकांनी आडकाठी आणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

सांगली : महापौर पदाच्या कारकीर्दीत पूर्णपणे पारदर्शी कारभार केला. काहींनी महासभेत केलेले अनेक ठराव अडविले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ...

सांगली : महापौर पदाच्या कारकीर्दीत पूर्णपणे पारदर्शी कारभार केला. काहींनी महासभेत केलेले अनेक ठराव अडविले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याच्या ठरावावेळी तर मोठा त्रास झाला. अनेकांनी आडकाठी आणली, असा टोला महापौर गीता सुतार यांनी बुधवारी भाजप नेत्यांना लगाविला. शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिल्याचे सांगितले.

महापौर गीता सुतार यांच्या कार्यकाळातील ही शेवटची महासभा होती. सभेच्या शेवटी त्यांनी वर्षभरात सहकार्य केलेल्यांचे आभार मानत असताना, भाजपच्या नेते व पदाधिकाऱ्यांना टोलेही लगाविले. त्या म्हणाल्या की, लग्नानंतर गेली १७ वर्षे सांगलीत राहते, पण कधी राजकारणाशी संबंध आला नाही. भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी मला राजकारणात आणले. महापौरपदाच्या निवडीवेळीही सहकार्य केले. पती सुयोग सुतार यांचीही साथ लाभली. महापालिकेच्या राजकारणात नवखी असल्याने सुरुवातीचा काळ विविध प्रश्नांची माहिती करून घेण्यात गेला. त्यानंतर कोरोनाची महामारी सुरू झाली. या काळात आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी घेत माझ्यावर कुठलाही ताण येऊ दिला नाही. काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांचेही मोठे सहकार्य लाभले. महासभेत आलेल्या विषयांचा अभ्यास केला.

पण काहीवेळा मलाही अडचणींना सामोरे जावे लागले. काही सदस्यांनी महासभेतील ठरावावर सह्या करण्यात आडकाठी आणली. नव्या सदस्यांना ठरावावर सह्या करण्यापासून रोखले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचा ठराव करण्यापासून अडविले गेले; पण काही महिला सदस्यांनी साथ दिल्याने हे ठराव करता आले. महापौरपदाच्या काळात शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी ४७ कोटींचा आराखडा तयार केला होता. पुन्हा संधी मिळाली, तर शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्याची इच्छा आहे, असे सांगताना त्या भावनावश झाल्या. भाजप नेते शेखर इनामदार यांनीही महापौरांच्या कारकीर्दीत सुतार यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. पारदर्शी कारभार करून आपली निवड सार्थ ठरविली असल्याचे सांगितले.

चौकट

सांगली मुंबईपेक्षा भारी होईल

महापौर गीता सुतार म्हणाल्या, महापालिकेतील सगळे नगरसेवक एकत्र आले, तर सांगली मुंबईपेक्षा भारी होईल. तिन्ही शहरात एकही खड्डा राहणार नाही. शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.