शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

महापौर पदाच्या कार्यकाळात अनेकांनी आडकाठी आणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

सांगली : महापौर पदाच्या कारकीर्दीत पूर्णपणे पारदर्शी कारभार केला. काहींनी महासभेत केलेले अनेक ठराव अडविले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ...

सांगली : महापौर पदाच्या कारकीर्दीत पूर्णपणे पारदर्शी कारभार केला. काहींनी महासभेत केलेले अनेक ठराव अडविले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याच्या ठरावावेळी तर मोठा त्रास झाला. अनेकांनी आडकाठी आणली, असा टोला महापौर गीता सुतार यांनी बुधवारी भाजप नेत्यांना लगाविला. शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिल्याचे सांगितले.

महापौर गीता सुतार यांच्या कार्यकाळातील ही शेवटची महासभा होती. सभेच्या शेवटी त्यांनी वर्षभरात सहकार्य केलेल्यांचे आभार मानत असताना, भाजपच्या नेते व पदाधिकाऱ्यांना टोलेही लगाविले. त्या म्हणाल्या की, लग्नानंतर गेली १७ वर्षे सांगलीत राहते, पण कधी राजकारणाशी संबंध आला नाही. भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी मला राजकारणात आणले. महापौरपदाच्या निवडीवेळीही सहकार्य केले. पती सुयोग सुतार यांचीही साथ लाभली. महापालिकेच्या राजकारणात नवखी असल्याने सुरुवातीचा काळ विविध प्रश्नांची माहिती करून घेण्यात गेला. त्यानंतर कोरोनाची महामारी सुरू झाली. या काळात आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी घेत माझ्यावर कुठलाही ताण येऊ दिला नाही. काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांचेही मोठे सहकार्य लाभले. महासभेत आलेल्या विषयांचा अभ्यास केला.

पण काहीवेळा मलाही अडचणींना सामोरे जावे लागले. काही सदस्यांनी महासभेतील ठरावावर सह्या करण्यात आडकाठी आणली. नव्या सदस्यांना ठरावावर सह्या करण्यापासून रोखले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचा ठराव करण्यापासून अडविले गेले; पण काही महिला सदस्यांनी साथ दिल्याने हे ठराव करता आले. महापौरपदाच्या काळात शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी ४७ कोटींचा आराखडा तयार केला होता. पुन्हा संधी मिळाली, तर शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्याची इच्छा आहे, असे सांगताना त्या भावनावश झाल्या. भाजप नेते शेखर इनामदार यांनीही महापौरांच्या कारकीर्दीत सुतार यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. पारदर्शी कारभार करून आपली निवड सार्थ ठरविली असल्याचे सांगितले.

चौकट

सांगली मुंबईपेक्षा भारी होईल

महापौर गीता सुतार म्हणाल्या, महापालिकेतील सगळे नगरसेवक एकत्र आले, तर सांगली मुंबईपेक्षा भारी होईल. तिन्ही शहरात एकही खड्डा राहणार नाही. शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.