शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बिब्ब्या ठरतोय डाळिंब बागांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

बागायतदार संकटात : म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे क्षेत्र वाढले

दादा खोत -सलगरे -मिरज पूर्व भागामध्ये सलगरे, चाबूकस्वारवाडी, बेळंकी या भागामध्ये डाळिंब क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून डाळिंबाला चांगला भाव मिळत होता. त्यामुळे साहजिकच या भागामध्ये नवीन डाळिंब क्षेत्र वाढू लागले होते. परंतु बिब्ब्या या रोगाच्या घातक प्रभावाने संपूर्ण डाळिंब बागाच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हैसाळच्या पाण्यामुळे शेतकरी साहजिकच ऊस व भाजीपाला व पिकाबरोबरच डाळिंबाकडे वळला; परंतु डाळिंबाचे पीक बिब्ब्याच्या विळख्यात सापडल्याने डाळिंबाचे क्षेत्र घटू लागले आहे. शेतकरी उभ्या असलेल्या बागाच तोडून टाकत आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून डाळिंबासाठी मार्केटमध्ये उच्चांकी दर मिळत असल्याने डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढले. डाळिंब पिकावर पानावर येणारे डाळिंब पिकाचे मृगबहार व हस्तबहार असे दोन महत्त्वाचे बहर घेतले जातात. परंतु मृगबहारात ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब छाटण्या घेतल्या, त्या बागांना जुलै-आॅगस्टमधील हवेमध्ये दमटपणा वाढल्यामुळे तेल्या रोगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेल्या रोगावर बुरशीजन्य औषधांचा मारा करूनसुद्धा हा रोग आटोक्यात आला नाही. शिवाय काही शेतकऱ्यांनी आॅरगॅनिक शेती तंत्राचा वापर करून डाळिंब लागवड केली आहे. तसेच बिब्ब्याविरहित टिश्यूकल्चर रोपांचा वापर करूनही रोगाच्या विळख्यातून या वेळेचा मृगबहार वाचू शकला नसल्याने अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कंटाळून बागा काढून टाकणे व इतर लागवडीकडे वळणे पसंत केल्याने डाळिंब पीक धोक्यात आले आहे. डाळिंब हे निश्चितपणे पैसे मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळे बिब्ब्या, तेल्या रोगांवर संशोधन होणे गरजेचे आहे. तरच या तेल्याच्या विळख्यातून बागा वाचू शकतील. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावअल्टरनेरिया, लिक स्पॉट, सर्कोस्पोरा, फळावर येणारे ब्लॅक हॉर्ट, अ‍ॅन्थ्युकॅनोज, फळावर येणारा ब्लाइट, फळावरील सर्कोस्पोरा आणि ब्रोट्रायरिस आदी बुरशीजन्य रोगांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आढळतो. चांगल्या उत्पादनासाठी आंबेमोहर पूर्व छाटणीची गरजबिब्ब्या नियंत्रणासाठी आॅरगॅनिक शेतीतंत्राचा वापर वाढवणेहवामानाचा अचूक अंदाज घेऊन फवारण्यांचे नियोजन करणे