शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

वंचित भागातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यातील जाधवनगर, बलवडी, पलूस तालुक्यातील कुंडलचा काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यातील जाधवनगर, बलवडी, पलूस तालुक्यातील कुंडलचा काही भाग व कोयना वसाहत, पलूस व आंधळी आदी गावांच्या दोन हजार ४०४ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणाऱ्या ताकारी योजनेच्या वितरिका क्रमांक दोनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे वितरिकेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्नही साकार होत आहे. आता २१ फेब्रुवारी रोजी ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होत आहे. यानंतर

लवकरच या वितरिकेची चाचणी होणार आहे. यामुळे लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनाही या चाचणीची उत्सुकता लागली आहे.

वंचित भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या वितरिकेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांच्या कार्यकाळात या वितरिकेला मंजुरी

मिळाली होती. २००५ मध्ये आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजनही झाले होते.

भूसंपादनामधील तक्रारीमुळे या वितरिकेच्या कामाला काही शेतकऱ्यांचा विरोध होता. यामुळे वर्षानुवर्षे हे काम रखडले होते. यावर मार्ग काढण्यासाठी ९ किमी लांबीच्या मुख्य वितरिका व १६ किमी लांबीच्या उपवितरिकांसाठी बंदिस्त पाईपलाईन करण्याचा २०१८ मध्ये

शासन स्तरावर निर्णय झाला. भूसंपादन होणारच नसल्याने शेतकऱ्यांचा विरोधही संपला.

बंदिस्त पाईपलाईनसाठी खुदाई करताना झालेली शेतकऱ्यांची पीक व अन्य नुकसानभरपाई शासनाकडून

बहुतांशी शेतकऱ्यांना दिली आहे. एकंदरित ११ कोटी ८२ लाखांच्या निधीतून हे काम पूर्ण झाल्याने या वितरिकेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खुदाई काम करताना झालेल्या पीक नुकसानभरपाईबाबत काही शेतकऱ्यांच्या तक्रारी असून, त्या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

चौकट

चेंबरद्वारे मिळणार पाणी

मुख्य वितरिकेला जोडलेल्या उपवितरिकांमधून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्रातील आठ गावांमधील वेगवेगळ्या २८ ठिकाणच्या शिवारात जागोजागी चेंबरद्वारे पाणी दिले जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी ८० ते १०० हेक्टर शेतजमिनीला पाणी देणार आहेत.

फोटो ओळ :

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) हद्दीत ताकारी योजनेच्या मुख्य कालव्याला जोडलेल्या क्रमांक दोनची सुरुवात या ठिकाणी होते.