शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

हाॅटेल उघडली म्हणून जीभेचे लाड नको, आला पावसाळा पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू असताना आता पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोके वर काढले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू असताना आता पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. वातावरणातील बदल आणि दमटपणामुळे केवळ व्हायरल इन्फेक्शनसोबतच पावसाळ्यात पोटाशी निगडीत आजारही होऊ शकतात. यामध्ये कॉलरा, डायरिया किंवा जुलाब या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा समावेश आहे. शिवाय हाॅटेलमधील जड पदार्थांमुळेही पोट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाशी लढता लढता या आजारांचीदेखील काळजी घेण्याची गरज आहे.

पावसाळ्यात अनेकदा गढूळ पाण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्यासाठी पाणी उकळून, थंड करून पिणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते. त्यात ओलाव्यामुळे विषाणू हवेत दीर्घकाळ जिवंत राहतात. त्यामुळे उघड्यावरील अन्न, शिळे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार उद्भवतात. पचण्यास जड पदार्थ खाल्ल्यानेही पित्ताचे विकार होतात. त्यामुळे पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

चौकट

पावसाळ्यात हे खायला हवे

१. फळे, मोसंबी, डाळिंबासह सर्वप्रकारची फळे.

२. आहार नेहमी गरमागरम असावा.

३. तूर, मुगाची डाळ, इडली, डोसा, उपमा.

४. डिंकाचे, अहळीवाचे लाडू, तूप.

५. पालेभाज्यांचे सूप, सर्व फळभाज्या, बटाटा व वांग्याचे प्रमाण कमी असावे.

६. जेवणात लिंबाची फोड असावी.

७. गरम दुधात चिमूटभर हळद किंवा सुंठपूड मिसळावी.

चौकट

पावसाळ्यात हे खाणे टाळावे

१. शिळे अन्न, पचायला जड, थंड पदार्थ, दही, लोणी, खव्यापासून बनलेले पदार्थ.

२. मोड आलेली धान्ये, हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ.

३. बेकरीचे पदार्थ, मांस खाणे टाळावे.

४. आयुर्वेदानुसार हिरव्या पालेभाज्या खाण्याचे टाळावे.

चौकट

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात बाहेर फिरायला जावेसे वाटते. अशावेळी बाहेर खाणे होते. पण तिथे आवश्यक ती स्वच्छता पाळली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरचे खाणे टाळावे. विशेषत: उघड्यावरील अन्नामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात अर्धवट शिजलेले अन्न खाल्ले तरी त्याचा त्रास होऊ शकतो. या पदार्थांमुळे आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

चौकट

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

पावसाळ्यात वात दोषाचा प्रकोप होतो. त्याला कफ व पित्ताची साथ मिळते. त्यातून सर्दी, दमा, संधीवात, भूक मंदावणे, उलट्या, त्वचा विकाराचा त्रास होतो. पित्तामुळे अतिसार, ताप, आल्मपित्त होतात. त्यासाठी पावसाळ्यात पचनाला जड पदार्थ खाऊ नये. शिळे व अतिथंड पदार्थही टाळावेत. पावसाळ्यात समतोल आहार व पाणी उकळून पिण्याची गरज आहे.

- डाॅ. अमोल पवार, आयुर्वेदतज्ज्ञ

कोट

पावसाळा व आजार यांचा जवळचा संबंध आहे. सर्दी, पडसे, खोकला, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे पावसाळ्यात आढळून येतात. या आजारांवर घरीच उपचार घेऊ नये. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घ्यावीत. एका रुग्णासाठी आणलेले औषध दुसऱ्या रुग्णाला देऊ नये. रोगप्रतिकारशक्ती मंदावत असल्याने आहाराचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. पिण्याचे पाणी उकळून प्यावे. उघड्यावरील पदार्थ टाळावेत.

- डाॅ. सुहास पाटील, फिजिशियन