शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

हाॅटेल उघडली म्हणून जीभेचे लाड नको, आला पावसाळा पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू असताना आता पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोके वर काढले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू असताना आता पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. वातावरणातील बदल आणि दमटपणामुळे केवळ व्हायरल इन्फेक्शनसोबतच पावसाळ्यात पोटाशी निगडीत आजारही होऊ शकतात. यामध्ये कॉलरा, डायरिया किंवा जुलाब या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा समावेश आहे. शिवाय हाॅटेलमधील जड पदार्थांमुळेही पोट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाशी लढता लढता या आजारांचीदेखील काळजी घेण्याची गरज आहे.

पावसाळ्यात अनेकदा गढूळ पाण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्यासाठी पाणी उकळून, थंड करून पिणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते. त्यात ओलाव्यामुळे विषाणू हवेत दीर्घकाळ जिवंत राहतात. त्यामुळे उघड्यावरील अन्न, शिळे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार उद्भवतात. पचण्यास जड पदार्थ खाल्ल्यानेही पित्ताचे विकार होतात. त्यामुळे पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

चौकट

पावसाळ्यात हे खायला हवे

१. फळे, मोसंबी, डाळिंबासह सर्वप्रकारची फळे.

२. आहार नेहमी गरमागरम असावा.

३. तूर, मुगाची डाळ, इडली, डोसा, उपमा.

४. डिंकाचे, अहळीवाचे लाडू, तूप.

५. पालेभाज्यांचे सूप, सर्व फळभाज्या, बटाटा व वांग्याचे प्रमाण कमी असावे.

६. जेवणात लिंबाची फोड असावी.

७. गरम दुधात चिमूटभर हळद किंवा सुंठपूड मिसळावी.

चौकट

पावसाळ्यात हे खाणे टाळावे

१. शिळे अन्न, पचायला जड, थंड पदार्थ, दही, लोणी, खव्यापासून बनलेले पदार्थ.

२. मोड आलेली धान्ये, हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ.

३. बेकरीचे पदार्थ, मांस खाणे टाळावे.

४. आयुर्वेदानुसार हिरव्या पालेभाज्या खाण्याचे टाळावे.

चौकट

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात बाहेर फिरायला जावेसे वाटते. अशावेळी बाहेर खाणे होते. पण तिथे आवश्यक ती स्वच्छता पाळली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरचे खाणे टाळावे. विशेषत: उघड्यावरील अन्नामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात अर्धवट शिजलेले अन्न खाल्ले तरी त्याचा त्रास होऊ शकतो. या पदार्थांमुळे आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

चौकट

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

पावसाळ्यात वात दोषाचा प्रकोप होतो. त्याला कफ व पित्ताची साथ मिळते. त्यातून सर्दी, दमा, संधीवात, भूक मंदावणे, उलट्या, त्वचा विकाराचा त्रास होतो. पित्तामुळे अतिसार, ताप, आल्मपित्त होतात. त्यासाठी पावसाळ्यात पचनाला जड पदार्थ खाऊ नये. शिळे व अतिथंड पदार्थही टाळावेत. पावसाळ्यात समतोल आहार व पाणी उकळून पिण्याची गरज आहे.

- डाॅ. अमोल पवार, आयुर्वेदतज्ज्ञ

कोट

पावसाळा व आजार यांचा जवळचा संबंध आहे. सर्दी, पडसे, खोकला, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे पावसाळ्यात आढळून येतात. या आजारांवर घरीच उपचार घेऊ नये. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घ्यावीत. एका रुग्णासाठी आणलेले औषध दुसऱ्या रुग्णाला देऊ नये. रोगप्रतिकारशक्ती मंदावत असल्याने आहाराचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. पिण्याचे पाणी उकळून प्यावे. उघड्यावरील पदार्थ टाळावेत.

- डाॅ. सुहास पाटील, फिजिशियन