लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : टायफाईड अथवा विषमज्वर हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार आहे. दूषित अन्न किंवा पाण्यामुळे विषमज्वराचा प्रसार होतो. आजकाल उघड्यावरील पदार्थ विशेषत: पाणीपुरी खाण्याची हौस अनेकांना असते. पण हीच पाणीपुरी टायफाईडलाही निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे पाणीपुरीसह उघड्यावरील पदार्थ खाताना नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.
चौकट
जिल्हा रुग्णालयातील टायफाईडचे रुग्ण
जून : २०
जुलै : ३५
ऑगस्ट : १७
चौकट
आजाराची लक्षणे
- उच्च तापमान दर्शवणारा ताप किंवा कमी-अधिक होणारा ताप, काहींना उलट्या, जुलाबही होतात. पोटदुखी, डोकेदुखी होते.
- मलमूत्र विसर्जन करताना जळजळ जाणवते.
चौकट
ही घ्या काळजी
- अस्वच्छ वातावरणातील अन्नपदार्थांचे सेवन करू नये.
- कुठलेही पाणी पिणे टाळावे.
- अन्नपदार्थ गरम करून खावेत.
- काही महिने बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत.