शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

थकबाकीसाठी वीजपुरवठा बंद करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST

सांगली : राज्यातील शेतीच्या व घरगुती वापराच्या विजेच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ही कारवाई रोखण्याचे आदेश द्यावेत, ...

सांगली : राज्यातील शेतीच्या व घरगुती वापराच्या विजेच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ही कारवाई रोखण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी राज्यपालांकडे केली. राजकारणातील इतर बाबींमध्ये लक्ष घालणाऱ्या राज्यपालांनी जनतेच्या या गंभीर समस्येबाबतही कार्यवाही करायला हवी, असे ते म्हणाले.

राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजपुरवठा तोडणार नसल्याचे सांगितले होते. अधिवेशन संपताच त्यांनी घोषणा मागे घेतली. ऊर्जामंत्र्यांनीही लगेच कारवाई सुरू केली, यातून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. वीज बिलाच्या अनुदानापोटी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये महावितरणकडे पडून आहेत. त्यामुळे शेतीचा वीजपुरवठा खंडित करू नये. पाच-सात वर्षांपूर्वी शेतीचा वीजपुरवठा कोणतीही मागणी नसताना दीडपट अश्वशक्तीने वाढविला, त्याचीही वसुली सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे दिसणारी सध्याची थकबाकी म्हणजे सूज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वीजवापराचा नेमका हिशेब दिल्याशिवाय वीजपुरवठा तोडू नये. कोरोनाच्या काळात लोकांची कमाई बंद झाल्याने या काळातील वीज बिले माफ करून दिलासा द्यावा.

ते म्हणाले की, अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. गव्हाणीत उड्या घेण्याची भाषा करणाऱ्यांनी फक्त वल्गनाच केल्या, कोठेही उडी घेतली नाही. शेतकऱ्यांना पैसे न मिळण्यास हेच लोक जबाबदार आहेत. सरकारनेही कृषिमूल्य आयोगावर शेतकऱ्यांचा प्रतिनिधीही घेतलेला नाही.

चौकट

बच्चू कडूंनी राजीनामा द्यावा

रघुनाथदादा पाटील म्हणाले की, बच्चू कडू स्वत: मंत्री असतानाही वीज बिल कारवाईविरोधात नमती भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत बसण्याऐवजी त्यांनी कडक भूमिका घ्यायला हवी, अन्यथा राजीनामा देऊन बाहेर पडावे.