शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 29, 2017 00:09 IST

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

ओढापात्राची चाळण : कर्नाटकात वाळू पार्सल; महसूल विभागाकडून छापे टाकण्याचे नाटकसंख : महसूल विभाग, उमदी पोलिस ठाणे यांच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील भिवर्गी ओढापात्रात बेकायदेशीर वाळू उपसा रात्रं-दिवस राजरोसपणे सुरू आहे. ओढापात्रात मोठेमोठे खड्डे पडले आहेत. कर्नाटकात ही वाळू पार्सल केली जात आहे. वाळू तस्करीमधून लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जात आहे. महसूल विभागाकडून छापे टाकले जात आहेत, पण वाळू पकडून जुजबी दंड करून, चिरीमिरी घेऊन सोडले जात आहे. काहीवेळा अगोदर छापे पडणार असल्याची सूचना दिली जात आहे. त्यामुळे वाळू वाहने सापडत नाहीत. वाळू तस्करीमुळे काळ्या सोन्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी लक्ष घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पूर्व भागातील भिवर्गी गावची लोकसंख्या चार हजार आहे. गावाजवळ ओढा असून, पात्र मोठे आहे. ओढापात्रातून बांधकामासाठी वाळू मिळते. त्यामुळे वाळू तस्करीचा धंदा जोमात सुरू आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षाने ओढापात्रातून सुमारे ५० ट्रॅक्टरने वाळू तस्करी केली जात आहे. कमी कालावधित जास्त पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. कर्नाटकमध्ये वाळूला जास्त मागणी आहे. कर्नाटकची हद्द जवळ असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू तस्करी केली जाते. मजुरांकडून ट्रॅक्टरमध्ये चाळण लावून वाळू भरली जाते. त्या वाळूचे कर्नाटकमध्ये किंवा शेतामध्ये डेपो मारले जातात. मजूर गाडी भरण्यासाठी २५० ते ३०० रुपये घेतात. डिझेल, मजुरी, ड्रायव्हरचा पगार वजा जाता एका खेपेला ट्रॅक्टरला १२०० ते १५०० रुपये राहतात, तर टिपरला ५ ते ७ हजार रुपये राहतात. ट्रॅक्टरच्या खेपेला दोन हजार ते अडीच हजार रुपये, तर टिपरला ८ ते १० हजार रुपये मिळतात. त्यामुळे हा व्यवसाय सोन्याची अंडी देणारा व्यवसाय आहे.या व्यवसायात गावपुढारी, स्थानिक नेत्यांचा मोठा सहभाग आहे. आज प्रत्येकजण या व्यवसायाकडे आकर्षिला जात आहे. काहीजणांनी वाळूसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणले आहेत. महिन्यावर ठरवून ट्रॅक्टर आणलेले आहेत. पै-पाहुणे, नातेवाईकांची वाहने गुंतविलेली आहेत. त्यामुळे वाळू व्यवसायाची व्याप्ती वाढलेली आहे. (वार्ताहर)पाण्याची पातळी खालावणारबेकायदेशीर वाळू उपशामुळे हजारो वर्षांचा असणारा भूगर्भातील खजिना संपुष्टात येणार आहे. ओढा-पात्रात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बारीक रेतीच्या वाळूमध्ये आहे. वाळूने भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवली जात होती. विहीर, कूपनलिकांना याचा फायदा होत होता. वारेमाप वाळू उपसा केला जात असल्याने याचा मोठा परिणाम पाणी पातळीवर होणार आहे. त्यामुळे सध्या पाण्याची पातळी ६०० ते ७०० फुटांपर्यंत गेली आहे.