शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 29, 2017 00:09 IST

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

ओढापात्राची चाळण : कर्नाटकात वाळू पार्सल; महसूल विभागाकडून छापे टाकण्याचे नाटकसंख : महसूल विभाग, उमदी पोलिस ठाणे यांच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील भिवर्गी ओढापात्रात बेकायदेशीर वाळू उपसा रात्रं-दिवस राजरोसपणे सुरू आहे. ओढापात्रात मोठेमोठे खड्डे पडले आहेत. कर्नाटकात ही वाळू पार्सल केली जात आहे. वाळू तस्करीमधून लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जात आहे. महसूल विभागाकडून छापे टाकले जात आहेत, पण वाळू पकडून जुजबी दंड करून, चिरीमिरी घेऊन सोडले जात आहे. काहीवेळा अगोदर छापे पडणार असल्याची सूचना दिली जात आहे. त्यामुळे वाळू वाहने सापडत नाहीत. वाळू तस्करीमुळे काळ्या सोन्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी लक्ष घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पूर्व भागातील भिवर्गी गावची लोकसंख्या चार हजार आहे. गावाजवळ ओढा असून, पात्र मोठे आहे. ओढापात्रातून बांधकामासाठी वाळू मिळते. त्यामुळे वाळू तस्करीचा धंदा जोमात सुरू आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षाने ओढापात्रातून सुमारे ५० ट्रॅक्टरने वाळू तस्करी केली जात आहे. कमी कालावधित जास्त पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. कर्नाटकमध्ये वाळूला जास्त मागणी आहे. कर्नाटकची हद्द जवळ असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू तस्करी केली जाते. मजुरांकडून ट्रॅक्टरमध्ये चाळण लावून वाळू भरली जाते. त्या वाळूचे कर्नाटकमध्ये किंवा शेतामध्ये डेपो मारले जातात. मजूर गाडी भरण्यासाठी २५० ते ३०० रुपये घेतात. डिझेल, मजुरी, ड्रायव्हरचा पगार वजा जाता एका खेपेला ट्रॅक्टरला १२०० ते १५०० रुपये राहतात, तर टिपरला ५ ते ७ हजार रुपये राहतात. ट्रॅक्टरच्या खेपेला दोन हजार ते अडीच हजार रुपये, तर टिपरला ८ ते १० हजार रुपये मिळतात. त्यामुळे हा व्यवसाय सोन्याची अंडी देणारा व्यवसाय आहे.या व्यवसायात गावपुढारी, स्थानिक नेत्यांचा मोठा सहभाग आहे. आज प्रत्येकजण या व्यवसायाकडे आकर्षिला जात आहे. काहीजणांनी वाळूसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणले आहेत. महिन्यावर ठरवून ट्रॅक्टर आणलेले आहेत. पै-पाहुणे, नातेवाईकांची वाहने गुंतविलेली आहेत. त्यामुळे वाळू व्यवसायाची व्याप्ती वाढलेली आहे. (वार्ताहर)पाण्याची पातळी खालावणारबेकायदेशीर वाळू उपशामुळे हजारो वर्षांचा असणारा भूगर्भातील खजिना संपुष्टात येणार आहे. ओढा-पात्रात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बारीक रेतीच्या वाळूमध्ये आहे. वाळूने भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवली जात होती. विहीर, कूपनलिकांना याचा फायदा होत होता. वारेमाप वाळू उपसा केला जात असल्याने याचा मोठा परिणाम पाणी पातळीवर होणार आहे. त्यामुळे सध्या पाण्याची पातळी ६०० ते ७०० फुटांपर्यंत गेली आहे.