शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 29, 2017 00:09 IST

भिवर्गीत बेसुमार वाळू उपशाकडे दुर्लक्ष

ओढापात्राची चाळण : कर्नाटकात वाळू पार्सल; महसूल विभागाकडून छापे टाकण्याचे नाटकसंख : महसूल विभाग, उमदी पोलिस ठाणे यांच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील भिवर्गी ओढापात्रात बेकायदेशीर वाळू उपसा रात्रं-दिवस राजरोसपणे सुरू आहे. ओढापात्रात मोठेमोठे खड्डे पडले आहेत. कर्नाटकात ही वाळू पार्सल केली जात आहे. वाळू तस्करीमधून लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जात आहे. महसूल विभागाकडून छापे टाकले जात आहेत, पण वाळू पकडून जुजबी दंड करून, चिरीमिरी घेऊन सोडले जात आहे. काहीवेळा अगोदर छापे पडणार असल्याची सूचना दिली जात आहे. त्यामुळे वाळू वाहने सापडत नाहीत. वाळू तस्करीमुळे काळ्या सोन्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी लक्ष घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पूर्व भागातील भिवर्गी गावची लोकसंख्या चार हजार आहे. गावाजवळ ओढा असून, पात्र मोठे आहे. ओढापात्रातून बांधकामासाठी वाळू मिळते. त्यामुळे वाळू तस्करीचा धंदा जोमात सुरू आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षाने ओढापात्रातून सुमारे ५० ट्रॅक्टरने वाळू तस्करी केली जात आहे. कमी कालावधित जास्त पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. कर्नाटकमध्ये वाळूला जास्त मागणी आहे. कर्नाटकची हद्द जवळ असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू तस्करी केली जाते. मजुरांकडून ट्रॅक्टरमध्ये चाळण लावून वाळू भरली जाते. त्या वाळूचे कर्नाटकमध्ये किंवा शेतामध्ये डेपो मारले जातात. मजूर गाडी भरण्यासाठी २५० ते ३०० रुपये घेतात. डिझेल, मजुरी, ड्रायव्हरचा पगार वजा जाता एका खेपेला ट्रॅक्टरला १२०० ते १५०० रुपये राहतात, तर टिपरला ५ ते ७ हजार रुपये राहतात. ट्रॅक्टरच्या खेपेला दोन हजार ते अडीच हजार रुपये, तर टिपरला ८ ते १० हजार रुपये मिळतात. त्यामुळे हा व्यवसाय सोन्याची अंडी देणारा व्यवसाय आहे.या व्यवसायात गावपुढारी, स्थानिक नेत्यांचा मोठा सहभाग आहे. आज प्रत्येकजण या व्यवसायाकडे आकर्षिला जात आहे. काहीजणांनी वाळूसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणले आहेत. महिन्यावर ठरवून ट्रॅक्टर आणलेले आहेत. पै-पाहुणे, नातेवाईकांची वाहने गुंतविलेली आहेत. त्यामुळे वाळू व्यवसायाची व्याप्ती वाढलेली आहे. (वार्ताहर)पाण्याची पातळी खालावणारबेकायदेशीर वाळू उपशामुळे हजारो वर्षांचा असणारा भूगर्भातील खजिना संपुष्टात येणार आहे. ओढा-पात्रात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बारीक रेतीच्या वाळूमध्ये आहे. वाळूने भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवली जात होती. विहीर, कूपनलिकांना याचा फायदा होत होता. वारेमाप वाळू उपसा केला जात असल्याने याचा मोठा परिणाम पाणी पातळीवर होणार आहे. त्यामुळे सध्या पाण्याची पातळी ६०० ते ७०० फुटांपर्यंत गेली आहे.