शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

कुपवाडमधील जि. प. शाळेसमोरील खोकीधारकांना नोटिसा

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

खोकीधारकांत नाराजी : शाळेसमोरील अतिक्रमणे तात्काळ काढून घेण्याचे आदेश

कुपवाड : येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अतिक्रमण केलेल्या ३८ खोकीधारकांना पंचायत समितीकडून कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या खोकीधारकांनी तात्काळ आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढून टाकली जातील, असा इशारा नोटिसीद्वारे त्यांना देण्यात आला आहे. कुपवाड विकास सोसायटी चौकातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक, उर्दू शाळा आणि शाळा क्रमांक दोनच्या जागेवर एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शहरातील ३८ खोकीधारकांकडून व्यवसायासाठी खोकी बसविण्यात आली आहेत. गेल्या वीस वर्षांपासून याठिकाणी या खोकीधारकांचा व्यवसाय सुरू आहे. २००५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे शहर सुशोभिकरणाच्या नावाखाली महापालिकेने शहरातील खोकीधारकांवर कारवाई केली. प्रशासनाने त्यांच्याकडून खोकी पुनर्वसनासाठी रकमा घेतल्या. त्यातील काहीजणांना महापालिकेच्या मिरज रस्त्यावरील पाण्याच्या टाकीच्या चौकात गाळेही देण्यात आले. काहींनी गाळे घेतले, काहींना गाळे मिळाले नाहीत. त्यामुळे खोकी याठिकाणी पुन्हा ठेवण्यात आली. पूर्वी रस्त्यावर महापालिकेच्या जागेत असलेली खोकी नंतर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ठेवण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून हा प्रश्न जिल्हा परिषदेकडे गेला. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष आणि खोकी संघटनेचे पदाधिकारी यांनी खोकी पुनर्वसनाबाबत तीन वर्षापूर्वी बैठकाही घेतल्या. परंतु, त्यावेळी हा प्रश्न सुटला नाही. अखेर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेऊन तिन्ही शाळांच्या आवारातील ३८ खोकीधारकांना कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या खोकीधारकांनी तात्काळ आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढून टाकली जातील, असा इशारा गटशिक्षणाधिकारी यांनी खोकीधारकांना नोटिसीद्वारे दिला आहे. ही खोकी तात्काळ काढून न टाकल्यास पोलीस बंदोबस्तात ही खोकी काढली जातील. नुकसान झाल्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी नोटिसीत नमूद केले आहे. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या युगात या खोक्यांमधून व्यवसाय करून आपला संसार करणाऱ्या खोकीधारकांमध्ये या नोटिसीमुळे नाराजी पसरली आहे. जिल्हा परिषद किंवा महापालिकेने खोक्यांचे त्वरित पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)महापालिकेकडून चालढकल..२००५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शहरातील खोकीधारकांना पुनर्वसनाचे आश्वासन तत्कालीन काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी दिले होते. आता त्यांचीच सत्ता महापालिकेत आहे. तरीही त्यांच्याकडून या खोकीधारकांचे पुनर्वसन केले जात नाही. खोकीधारकांना पोकळ आश्वासने देऊन चालढकल केली जात आहे. याबद्दल खोकीधारकांत नाराजी आहे. जिल्हा परिषदेने तरी खोकीधारकांना गाळे देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी काही खोकीधारकांकडून करण्यात आली आहे.