शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्हा बँकेला १२७ कोटीचा ढोबळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

सांगली : शेतकरी कर्जमाफी आणि कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा बॅँकेने उत्कृष्ट काम केल्याने राज्यातील पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये समावेश ...

सांगली : शेतकरी कर्जमाफी आणि कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा बॅँकेने उत्कृष्ट काम केल्याने राज्यातील पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये समावेश झाला आहे. या वर्षात १२७ कोटी ४७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. वर्षअखेर १२ हजार कोटीपर्यंत व्यवसाय गेला आहे.

पाटील म्हणाले की, बँकेच्या भागभांडवलात गतवर्षीपेक्षा ७.५३ टक्के वाढ आहे. मागील वर्षी ५८०० कोटी ८२ लाख ९३ हजाराच्या ठेवी होत्या. यंदा यात १०.७३ टक्के वाढ होऊन ठेवी ६४२३ कोटी ५४ लाख ७६ हजारापर्यंत गेल्या आहेत. बाहेरील कर्जे २७.१ टक्के वाढीव घेतली आहेत. ही रक्कम ८३१ कोटी ५२ लाख आहे. गुंतवणुकीत १३.८९ टक्के घसरण झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी ११४२ कोटी रुपयांची कर्जे जादा दिली आहे. एकूण ५३५६ कोटी ८४ लाख कर्जाचे वाटप केले आहे. १२७ कोटी ४७ लाखाचा ढोबळ नफा झाला आहे. गतवर्षीपेक्षा ३७.९७ टक्के वाढ आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची वसुली कमी झाली आहे. कोरोनाचा बॅँकेच्या नफ्यावर परिणाम झाला आहे.

उपाध्यक्ष देशमुख म्हणाले, बँकेच्या प्रतिकर्मचारी व्यवसायात यंदा २१.३६ टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने एक कोटी ६० लाखांचा व्यवसाय केला आहे. एनपीएचे प्रमाण ११.९४ टक्केवरून ११.९८ टक्के झाले आहे. एकूण व्यवसाय १२ हजार कोटीपर्यंत झाला आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील, सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, जे. जे. पाटील उपस्थित होते.

चौकट

लवकरच पहिल्या क्रमांकावर

जिल्हा बँकेने केलेल्या चांगल्या कारभारामुळे सध्या बँकेचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. बँक कार्पोरेट पध्दतीने चालविण्याचा प्रयत्न आहे. काहींची थकबाकी वसूल झाली की, बँक राज्यात पहिल्या क्रमांकावर जाईल, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.