शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

जिल्हा बँकेला १२७ कोटीचा ढोबळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

सांगली : शेतकरी कर्जमाफी आणि कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा बॅँकेने उत्कृष्ट काम केल्याने राज्यातील पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये समावेश ...

सांगली : शेतकरी कर्जमाफी आणि कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा बॅँकेने उत्कृष्ट काम केल्याने राज्यातील पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये समावेश झाला आहे. या वर्षात १२७ कोटी ४७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. वर्षअखेर १२ हजार कोटीपर्यंत व्यवसाय गेला आहे.

पाटील म्हणाले की, बँकेच्या भागभांडवलात गतवर्षीपेक्षा ७.५३ टक्के वाढ आहे. मागील वर्षी ५८०० कोटी ८२ लाख ९३ हजाराच्या ठेवी होत्या. यंदा यात १०.७३ टक्के वाढ होऊन ठेवी ६४२३ कोटी ५४ लाख ७६ हजारापर्यंत गेल्या आहेत. बाहेरील कर्जे २७.१ टक्के वाढीव घेतली आहेत. ही रक्कम ८३१ कोटी ५२ लाख आहे. गुंतवणुकीत १३.८९ टक्के घसरण झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी ११४२ कोटी रुपयांची कर्जे जादा दिली आहे. एकूण ५३५६ कोटी ८४ लाख कर्जाचे वाटप केले आहे. १२७ कोटी ४७ लाखाचा ढोबळ नफा झाला आहे. गतवर्षीपेक्षा ३७.९७ टक्के वाढ आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची वसुली कमी झाली आहे. कोरोनाचा बॅँकेच्या नफ्यावर परिणाम झाला आहे.

उपाध्यक्ष देशमुख म्हणाले, बँकेच्या प्रतिकर्मचारी व्यवसायात यंदा २१.३६ टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने एक कोटी ६० लाखांचा व्यवसाय केला आहे. एनपीएचे प्रमाण ११.९४ टक्केवरून ११.९८ टक्के झाले आहे. एकूण व्यवसाय १२ हजार कोटीपर्यंत झाला आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील, सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, जे. जे. पाटील उपस्थित होते.

चौकट

लवकरच पहिल्या क्रमांकावर

जिल्हा बँकेने केलेल्या चांगल्या कारभारामुळे सध्या बँकेचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. बँक कार्पोरेट पध्दतीने चालविण्याचा प्रयत्न आहे. काहींची थकबाकी वसूल झाली की, बँक राज्यात पहिल्या क्रमांकावर जाईल, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.