शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

गाळमिश्रित पाणी घरांमध्ये घुसले

By admin | Updated: January 14, 2015 00:30 IST

इस्लामपुरात प्रकार : महिलांचा संताप

इस्लामपूर : शहरातील महादेवनगर परिसरात असणाऱ्या नगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळमिश्रित पाणी रस्त्याच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत व घरांमधून शिरल्याने येथील नागरिक संतप्त झाले होते. या परिसरातील गटारी मोठ्या कराव्यात, या सहा वर्षांपासूनच्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.आज मंगळवारचा मुहूर्त साधून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टाकी स्वच्छ करण्यासाठीची मोहीम हाती घेतली. दुपारी साडेबारा वाजता टाकीतील गाळमिश्रित पाणी सोडण्यास सुरुवात झाली. या परिसरात गटारींची व्यवस्था अत्यंत अरुंद पध्दतीची असल्याने हे गाळमिश्रित पाणी धो—धो उसळून बघता-बघता पश्चिम बाजूच्या मोकळ्या जागेत आणि सुमारे १५ ते २० घरांत शिरले. या पाण्याचा लोंढा इतका जोरात होता की, सखल भागातील घरांमधून एक फूट उंच हे गाळमिश्रित पाणी भरून राहिले.या अचानकपणे घडलेल्या प्रकाराने घरातील महिलांची भंबेरी उडाली. घरातील साहित्य, वस्तू गाळात बुडाल्या. पहिल्या खोलीपासून स्वयंपाक खोलीपर्यंत हा गाळ पसरल्याने घरातून दुर्गंधी सुटली होती. सायंकाळी पाचपर्यंत हे पाणी गटारींतून वाहत होते.या घटनेची माहिती समजताच पालिकेतील ज्येष्ठ सदस्य बी. ए. पाटील, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. देशमुख यांनी पालिकेच्या स्वच्छता विभागाला बोलावून, परिसरातील स्वच्छता करण्याचे काम सुरु केले. तुंबलेल्या गटारी मोकळ्या करुन पाणी वाहते करण्यात आले. तसेच मोकळ्या जागेत पसरलेला गाळही गटारीत सोडण्यात आला. अखेर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परिसरातील स्वच्छता पूर्ण झाली.या प्रकाराबद्दल परिसरातील नागरिक, महिला संताप व्यक्त करीत होत्या. गेल्या सहा—सात वर्षांपासून येथील गटारी मोठ्या करण्याची मागणी केली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. हे गाळमिश्रित पाणी रस्त्यावरुन वाहत पुन्हा पश्चिम बाजूच्या गटारीत येते. त्यामुळे येथील रस्ताही नेहमी खड्ड्यांनी व्यापलेला असतो. पालिकेने गटारींची चांगली व्यवस्था न करुन दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)