शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

समूह जीवन पध्दतीचा माहिती युगात ऱ्हास

By admin | Updated: December 26, 2014 00:10 IST

जी. के. ऐनापुरे : इस्लामपुरात साहित्य संमेलन उत्साहात

इस्लामपूर : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात समूह जीवनपध्दती संपुष्टात आली आहे. भांडवलदारी समूहातील एका व्यक्तीची गरज दुसऱ्या समूहाची गरज मारते आहे. जाती—जातीत झगडे सुरू आहेत. अशावेळी आपण ज्यांना ‘चळवळी’ म्हणतो, त्या चळवळी गतिमान नसून सरपटत आहेत. समाज मध्यमवर्ग निर्मितीचा कारखाना बनला आहे. त्यामुळे मराठी साहित्याने स्वत:ची भूमिका प्रस्थापित करून अभिरुचीसंपन्न समाज निर्मितीचे प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जी. के. ऐनापुरे यांनी केले.महाराष्ट्र साहित्य परिषद व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन प्रा. ऐनापुरे बोलत होते. ते म्हणाले की, अलीकडे संमेलनांची गरज काय, ती व्हावीत की न व्हावीत यावर चर्चा झडत असतात. व्यक्तिपरत्वे यामध्ये मतभिन्नता असू शकते. संमेलने उत्सवी नसावीत. ती बौध्दिक ऊर्जा पुरविणारी आणि समाजाला दिशा देणारी असावीत. शेतीमधून नवी पिढी शिकली. मात्र शेतीपोटीच्या संवेदना बोथट झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.ज्येष्ठ ग्रामीण कथाकार रंगरावबापू पाटील यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह आणि राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचा ऐनापुरे यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील यांनी स्वागत केले. ‘म.सा.प.’च्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह प्रा. सुभाष खोत यांनी परिचय करुन दिला.प्रा. डॉ. मंगल कोकाटे यांनी आभार, प्रा. दशरथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. विश्वास सायनाकर, दि. बा. पाटील, कवी वसंत पाटील, डॉ. भीमराव पाटील, अ‍ॅड. बी. एस. पाटील, प्रा. वि. द. कदम, प्रा. एम. एस. हसमनीस, शहानवाज मुल्ला, प्रा. डॉ. दीपक स्वामी, प्रा. राजा माळगी, प्रा. एकनाथ पाटील, श्रीमती वैजयंती पेठकर, गुरुवर्य एस. टी. पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)लेखक नाचतात व्यवस्थेच्या तालावर मराठी लेखकांवर कोरडे ओढताना प्रा. ऐनापुरे म्हणाले की, मराठी साहित्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. व्यवस्थेच्या तालावर लेखक नाचत आहेत. त्यामुळे मराठी साहित्याला आता भूमिकाच उरलेली नाही. मराठी साहित्य आधुनिक आणि पारंपरिकही नाही. ते मध्यमवर्गीय अवस्थेत राहिले आहे. नव्या पिढीतील लेखकांनी मराठी साहित्याची नेमकी भूमिका प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करायला हवेत.