शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

अस्वच्छतेचा ठेकेदारी शाप

By admin | Updated: July 3, 2014 01:01 IST

सांगली बसस्थानकाची अवस्था : सर्वत्र घाणीचे साम्राज्य; ठेकेदार अधिकाऱ्यांवर शिरजोर

अशोक डोंबाळे , सांगली : दररोज दहा हजारावर प्रवाशांची वर्दळ आणि पाचशेहून अधिक बसेसची दररोज ये-जा असलेल्या सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकाला अस्वच्छतेचा ठेकेदारी शाप लाभला आहे. वर्षाकाठी लाखो रुपये ठेकेदाराच्या खिशात घालूनही बसस्थानकाचे बकालपण कसे दूर होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काम न करता खिसे भरणारी ठेकेदारी आणि त्याला पाठबळ देणारे अधिकारीच या अस्वच्छतेला जबाबदार असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. प्रवाशी वाढविण्यासाठी धडपडणाऱ्या महामंडळाच्या स्थानकांवर एवढ्या गैरसोयी असतील, तर प्रवासी एसटीकडे कसा वळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीच्या बसस्थानकावर जिल्ह्यातील दहा आगारांतून बसेस येतात; पण मुंबई, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, नांदेड, कोल्हापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून बसेसची ये-जा चालूच आहे. रोज दहा हजारांहून अधिक प्रवासी बसस्थानकावर येत असतात. एवढ्या मोठ्याप्रमाणात प्रवाशांची वर्दळ असतानाही बसस्थानकावरील स्वच्छतेकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. बसस्थानकावरील स्वच्छता करण्यासाठी एका ठेकेदाराची नियुक्ती केली असून, त्याला महिना २३ ते २५ हजार रुपये भाडे दिले जाते. प्रत्यक्षात ठेकेदाराकडून त्याप्रमाणात स्वच्छता केली जात नसल्याचे चित्र आहे. ठेकेदार स्वच्छता व्यवस्थित करतो की नाही, हे पाहूनच त्यांचे बिल काढण्याचा नियम आहे. यासाठी दोन सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि तीन वाहतूक अधिकारी नियंत्रण ठेवण्यासाठी आहेत. प्रवाशांच्या हिताकडे लक्ष देण्याऐवजी काही अधिकारी ठेकेदारांचे हित जपत असल्यामुळे प्रवाशांचा एसटीकडील ओढा कमी होत आहे. अधिकाऱ्यांच्या या बेफिकीरीमुळेच राज्यातील ५७ आगार सलग दहा वर्षे तोट्यात असून, आता ते बंद करण्याचा घाट घातला जात आहे. परंतु, एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी हा उपाय ठरत नसून, ठेकेदारांना पोसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टोळ्यांना आगारातून हद्दपार करण्याची गरज आहे, असा सूरही कर्मचारी वर्गातून व्यक्त होऊ लागला आहे. बिले मंजूरच कशी होतात?ठेकेदार बसस्थानकावरील स्वच्छता करीत नसल्याचे सांगलीचे आगार व्यवस्थापक आर. एस. पाटील सांगत आहेत. तरीही ठेकेदाराचे बिल कनिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजूर करण्यामागचे गौडबंगाल काय?, असाही प्रश्न निर्माण होत आहे. बसस्थानकावर तर तीन-तीन दिवस स्वच्छता होत नाही. अनेकवेळा स्वच्छतेसाठी कामगार पाठविण्याबाबत ठेकेदाराला अधिकारी विनवणी करतात. तरीही ठेकेदार दाद देत नसल्याच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत.