शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

जिल्हा परिषदेतील असंतुष्टांना पंढरीचा विठ्ठलही पावलाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाविषयी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत मंगळवारी चर्चा केली. पंढरपुरात ...

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाविषयी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत मंगळवारी चर्चा केली. पंढरपुरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या फार्महाऊसवर तासभर चर्चेचे गुऱ्हाळ रंगले, निर्णय मात्र झालाच नाही.

पदाधिकारी बदलासाठी बऱ्याच दिवसांपासून हालचाली सुरू असून, सत्ताधारी गटातच दुफळी निर्माण झाली आहे. असंतुष्ट सदस्यांनी अविश्वास ठरावाचा पवित्राही घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात फडणवीस यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांना चर्चेसाठी बोलाविले होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, विलासराव जगताप, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख आदी नेत्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केली. बदलाविषयीची एकूण स्थिती नेत्यांनी फडणवीस यांना सांगितली. पहिल्या टप्प्यात सर्वांची एकत्र बैठक झाली, त्यानंतर फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या काहींच्या भेटी घेतल्या. नेतेमंडळींनी जिल्हा परिषदेतील संख्याबळ, बदलासाठीची सदस्यांची मोहीम, संभाव्य धोके यांची माहिती दिली.

असंतुष्टांनी सुरू केलेल्या अविश्वास मोहिमेविषयीदेखील नेतेमंडळींनी नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांनी भूमिका जाणून घेतली, मात्र बदलाविषयी निश्चित निर्णय दिला नाही. दोन दिवसांत ‘मेसेज’ येईल अशी शक्यता नेत्यांनी व्यक्त केली.

फडणवीसांसोबतच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, याची माहिती घेण्यासाठी काही सदस्यांनीही पंढरपूर गाठले होते, फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण भेट झाली नाही.

चौकट

ताकही फुंकून पिण्याची भूमिका

महापालिकेत पुरेसे संख्याबळ असतानाही भाजप सत्ता हरवून बसला, जिल्हा परिषदेत तर अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊन सत्तेवर आहोत. या स्थितीत पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेत धोका होणार नाही कशावरुन, असा खडा सवाल माजी आमदार विलासराव जगताप यांनी उपस्थित केला. अन्य नेत्यांनीही हाच सूर आळवला. त्यामुळे पक्षाने ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले.

कोट

देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पदाधिकारी बदलातील धोके जाणून घेतले. बैठकीत कोणताही ठोस निर्णय मात्र दिला नाही. दोन-तीन दिवसांत निरोप मिळण्याची शक्यता आहे.

- मकरंद देशपांडे, भाजप नेते.