शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील असंतुष्टांना पंढरीचा विठ्ठलही पावलाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाविषयी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत मंगळवारी चर्चा केली. पंढरपुरात ...

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाविषयी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत मंगळवारी चर्चा केली. पंढरपुरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या फार्महाऊसवर तासभर चर्चेचे गुऱ्हाळ रंगले, निर्णय मात्र झालाच नाही.

पदाधिकारी बदलासाठी बऱ्याच दिवसांपासून हालचाली सुरू असून, सत्ताधारी गटातच दुफळी निर्माण झाली आहे. असंतुष्ट सदस्यांनी अविश्वास ठरावाचा पवित्राही घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात फडणवीस यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांना चर्चेसाठी बोलाविले होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, विलासराव जगताप, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख आदी नेत्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केली. बदलाविषयीची एकूण स्थिती नेत्यांनी फडणवीस यांना सांगितली. पहिल्या टप्प्यात सर्वांची एकत्र बैठक झाली, त्यानंतर फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या काहींच्या भेटी घेतल्या. नेतेमंडळींनी जिल्हा परिषदेतील संख्याबळ, बदलासाठीची सदस्यांची मोहीम, संभाव्य धोके यांची माहिती दिली.

असंतुष्टांनी सुरू केलेल्या अविश्वास मोहिमेविषयीदेखील नेतेमंडळींनी नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांनी भूमिका जाणून घेतली, मात्र बदलाविषयी निश्चित निर्णय दिला नाही. दोन दिवसांत ‘मेसेज’ येईल अशी शक्यता नेत्यांनी व्यक्त केली.

फडणवीसांसोबतच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, याची माहिती घेण्यासाठी काही सदस्यांनीही पंढरपूर गाठले होते, फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण भेट झाली नाही.

चौकट

ताकही फुंकून पिण्याची भूमिका

महापालिकेत पुरेसे संख्याबळ असतानाही भाजप सत्ता हरवून बसला, जिल्हा परिषदेत तर अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊन सत्तेवर आहोत. या स्थितीत पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेत धोका होणार नाही कशावरुन, असा खडा सवाल माजी आमदार विलासराव जगताप यांनी उपस्थित केला. अन्य नेत्यांनीही हाच सूर आळवला. त्यामुळे पक्षाने ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले.

कोट

देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पदाधिकारी बदलातील धोके जाणून घेतले. बैठकीत कोणताही ठोस निर्णय मात्र दिला नाही. दोन-तीन दिवसांत निरोप मिळण्याची शक्यता आहे.

- मकरंद देशपांडे, भाजप नेते.