शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील असंतुष्टांना पंढरीचा विठ्ठलही पावलाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाविषयी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत मंगळवारी चर्चा केली. पंढरपुरात ...

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाविषयी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत मंगळवारी चर्चा केली. पंढरपुरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या फार्महाऊसवर तासभर चर्चेचे गुऱ्हाळ रंगले, निर्णय मात्र झालाच नाही.

पदाधिकारी बदलासाठी बऱ्याच दिवसांपासून हालचाली सुरू असून, सत्ताधारी गटातच दुफळी निर्माण झाली आहे. असंतुष्ट सदस्यांनी अविश्वास ठरावाचा पवित्राही घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात फडणवीस यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांना चर्चेसाठी बोलाविले होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, विलासराव जगताप, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख आदी नेत्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केली. बदलाविषयीची एकूण स्थिती नेत्यांनी फडणवीस यांना सांगितली. पहिल्या टप्प्यात सर्वांची एकत्र बैठक झाली, त्यानंतर फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या काहींच्या भेटी घेतल्या. नेतेमंडळींनी जिल्हा परिषदेतील संख्याबळ, बदलासाठीची सदस्यांची मोहीम, संभाव्य धोके यांची माहिती दिली.

असंतुष्टांनी सुरू केलेल्या अविश्वास मोहिमेविषयीदेखील नेतेमंडळींनी नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांनी भूमिका जाणून घेतली, मात्र बदलाविषयी निश्चित निर्णय दिला नाही. दोन दिवसांत ‘मेसेज’ येईल अशी शक्यता नेत्यांनी व्यक्त केली.

फडणवीसांसोबतच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, याची माहिती घेण्यासाठी काही सदस्यांनीही पंढरपूर गाठले होते, फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण भेट झाली नाही.

चौकट

ताकही फुंकून पिण्याची भूमिका

महापालिकेत पुरेसे संख्याबळ असतानाही भाजप सत्ता हरवून बसला, जिल्हा परिषदेत तर अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊन सत्तेवर आहोत. या स्थितीत पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेत धोका होणार नाही कशावरुन, असा खडा सवाल माजी आमदार विलासराव जगताप यांनी उपस्थित केला. अन्य नेत्यांनीही हाच सूर आळवला. त्यामुळे पक्षाने ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले.

कोट

देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पदाधिकारी बदलातील धोके जाणून घेतले. बैठकीत कोणताही ठोस निर्णय मात्र दिला नाही. दोन-तीन दिवसांत निरोप मिळण्याची शक्यता आहे.

- मकरंद देशपांडे, भाजप नेते.