शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...

सवलतीचा गैरफायदा, बाजारात तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कडक लाॅकडाऊनमधून किराणा साहित्याच्या होलसेल विक्रीला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली खरी, पण पहिल्याच दिवशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कडक लाॅकडाऊनमधून किराणा साहित्याच्या होलसेल विक्रीला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली खरी, पण पहिल्याच दिवशी या सवलतीचा फायदा घेत साहित्य खरेदीसाठी मार्केट यार्ड व गणपती पेठेत तोबा गर्दी झाली होती. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासला गेला. या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत पोलीस, महापालिका व बाजार समिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ७ मेपासून कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात भाजीपाला, किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली. घरपोच सेवाही ठप्प झाली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावल्याने जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारपासून सकाळी सात ते अकरा या वेळेत किराणा मालाची होलसेल दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. या होलसेल व्यापाऱ्यांकडून केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच माल देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

पण, प्रत्यक्षात बुधवारी चित्र मात्र वेगळेच होते. मार्केट यार्डात सकाळी सात वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यार्डाच्या दक्षिणेकडील केवळ एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले होते. प्रवेशद्वारावर दोन कर्मचारीही तैनात केले होते. पण, खरेदीसाठी झालेली गर्दी या दोघांनाही आवरता आलेली नाही. मार्केट यार्डातील बहुुतांश दुकानांसमोर मोठी गर्दी होती. अनेक जण विनामास्कच होते, तर सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नव्हता. किरकोळ दुकानदारासोबत नागरिकांनीही गर्दी केली होती. त्यांनाही किराणा माल देण्यात येत होता. पोलीस व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.

गणपती पेठेतही हीच स्थिती होती. बऱ्याच दिवसांनी गणपती पेठेत वाहतुकीची कोंडी झाली होती. या पेठेत २२ व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी अत्यावश्यक सेवेबाहेरील अनेक दुकाने उघडण्यात आली होती. गणपती पेठेतही खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. महापालिकेच्या पथकानेही कारवाई करण्यात स्वारस्य दाखविले नाही.

चौकट

अत्यावश्यक सेवेबाहेरील दुकाने सुरू

१. मार्केट यार्ड, गणपती पेठेतील किराणा मालाची होलसेल दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असताना दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक सेवेबाहेरील दुकानेही सुरू होती. त्यावर कुणाचेच नियंत्रण नव्हते.

२. सकाळी अकरापर्यंतची वेळ असताना दुपारी एक वाजेपर्यंत खरेदी-विक्री सुरू होती.

३. भाजीपाला, फळविक्रेत्यांना परवानगी नसतानाही काही जणांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. काही विक्रेते हातगाडी घेऊन गल्लीबोळात फिरत होते.

४. शहरात सहायक आयुक्त अशोक कुंभार यांच्या पथकाकडून अकरानंतर दुकाने बंद करण्याची सूचना करण्यात येत होती. पण, त्या सूचनेलाही व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवली होती.