शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे संचालक मुदतवाढीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

सांगली : सांगलीसह जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव गेल्या दीड महिन्यापासून शासनाकडे प्रलंबित आहे. या काळात मुदतवाढ नसतानाही ...

सांगली : सांगलीसह जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव गेल्या दीड महिन्यापासून शासनाकडे प्रलंबित आहे. या काळात मुदतवाढ नसतानाही बाजार समित्यांच्या वाहनांसह कार्यालयाचा वापर सुरू आहे. शासनाने मुदतवाढ नाकारून प्रशासक नियुक्त केल्यास संचालक मंडळाचा खर्च वसूल करावा लागेल, अशी परिस्थिती आहे.

सांगली बाजार समिती संचालक मंडळाची मुदत २६ फेब्रुवारी रोजी संपली आहे. तासगाव, पलूस, वाळवा या बाजार समितीच्या संचालक मंडळाचीही मुदत संपली आहे. मुदतवाढीबाबत राज्य शासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. शेतकरी संघटना सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली आहे. मुदतवाढ नसताना दीड महिना संचालक बाजार समितीचा कारभार कसे करू शकतात, असा मुद्दा उपस्थित केला आहे. यावर पणन संचालक सतीश सोनी यांनी, मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे उत्तर दिले आहे. यामुळे संचालक मंडळाच्या मुदतवाढीमागे नक्की काय आहे, हेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना समजेनासे झाले आहे. दरम्यान, संचालक मंडळही शासन आदेशाच्या प्रतीक्षेत आहे.

चौकट

सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित : दिनकर पाटील

मागील मंगळवारी मुदतवाढीच्या प्रस्तावावर निर्णय अपेक्षित होता. पण, निर्णय झाला नाही. केवळ सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची सही राहिल्यामुळे मुदतवाढीचा आदेश आलेला नाही. सोमवार, १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढीचा आदेश मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.

चौकट

बाजार समित्यांबाबत डीडीआरनेच निर्णय घ्यावा : संजय कोले

सांगलीसह जिल्ह्यातील सर्वच संचालक मंडळांची मुदतवाढ फेब्रुवारी महिन्यात संपली आहे. तरीही या संचालकांना शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील मुदतवाढीबद्दल कोणताच निर्णय घेतला नाही. याबाबत पणनचे पुणे येथील संचालक सतीश सोनी यांच्याशी शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी शुक्रवारी संपर्क साधला होता. या वेळी सोनी त्यांना म्हणाले की, बाजार समित्यांची मुदतवाढ संपल्यानंतर त्यावर जिल्हा उपनिबंधकांनीच निर्णय घेणे अपेक्षित आहे. यामुळे तुम्ही जिल्हा उपनिबंधकांनाच मुदतवाढीबद्दल विचारा. तेच योग्य उत्तर देतील.